AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पीएम किसान योजनेत अनियमितता, पण 222 कोटींची वसुली करणार तरी कोण..?

पात्र नसतानाही ज्या शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेतला आहे अशा शेतकऱ्यांकडून आता ही रक्कम वसुल करण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातीलही 4 लाखाहून अधिक शेतकरी आहेत. जे शेतकरी आहेत पण प्राप्तीकर अदा करतात अशा शेतकऱ्यांना लाभ मिळत नव्हता पण अशाच शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेतला आहे. पण आता या शेतकऱ्यांकडून वसुली करणार कोण असा सवाल उपस्थित झाला आहे.

पीएम किसान योजनेत अनियमितता, पण 222 कोटींची वसुली करणार तरी कोण..?
पंतप्रधान किसान सन्मान योजना
| Edited By: | Updated on: Nov 25, 2021 | 3:43 PM
Share

लातूर : ( P.M. Kisan Samman Yojana) पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेत अनियमितता झाली आहे हे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पात्र नसतानाही ज्या शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेतला आहे अशा (Farmers) शेतकऱ्यांकडून आता ही रक्कम वसुल करण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातीलही 4 लाखाहून अधिक शेतकरी आहेत. जे शेतकरी आहेत पण प्राप्तीकर अदा करतात अशा शेतकऱ्यांना लाभ मिळत नव्हता पण अशाच शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेतला आहे. पण आता या शेतकऱ्यांकडून वसुली करणार कोण असा सवाल उपस्थित झाला आहे. कृषी- महसूल विभागातील अंर्तगत मतभेदामुळे ही वसुली रखडली आहे. राज्यातील अशा अपात्र शेतकऱ्यांकडून 222 कोटी वसुल करण्याचे उद्दीष्ट आहे.

शेतकऱ्यांचा सन्मान म्हणून पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत वर्षाकाठी 6 हजार रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जातात. पण यामध्ये अनेकांनी केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या नियमावलीचे पालन केले नाही. सबंध देशभर अशाच प्रकारे सरकारची फसवणूक करण्यात आली आहे. पण आता ही रक्कम वसुल करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

महसूल की कृषी विभाग करणार वसुली

कृषी योजना किंवा कोणती शासकीय मदत कृषी आणि महसूल विभाग यांचाच सहभाग असतो. पण पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेदरम्यान महसूल विभागाचा सन्मान दुखावला असल्याने या विभागाने यातून लक्ष काढून घेतले आहे. राज्यात 222 कोटी रुपयांची वसुली ही करायची आहे. पण काम करुनही योग्य सन्मान होत नसल्याने महसूल या योजनेच्या कामावर महसूल विभागाने बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे या योजनेचे काम कुणी करायचे या संदर्भात राज्य सरकारनेच सांगावे तशा प्रकारचा प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात आला आहे. मात्र, अद्यापपर्यंच यावर तोडगा निघालेला नाही.

कर भरुनही अनुदान लाटले..

शेतकरी आहेत पण ते कर भरतात त्यांना योजनेचा लाभ घेता येणार नव्हता असे असताना राज्यातील तब्बल 2 लाख 62 हजार शेतकऱ्यांनी नियमाचे पालन न करता ही रक्कम लाटली आहे. योजनेतील अनियमितता कमी करण्याच्या अनुशंगाने आता सरकारने पावले उचलली आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील एकूण 4 लाख 45 हजार शेतकऱ्यांकडून ही रक्कम परत घेतली जाणार आहे. मात्र, प्राप्तिकर भरुनही रक्कम घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ही 2 लाख 62 हजार एवढी आहे. शिवाय इतर कारणांनी अपात्र झालेल्या शेतकऱ्यांची संख्या ही कोटींच्या घरात आहे. हे सर्व होत असताना महसूल आणि कृषी विभागातील मतभेदामुळे वसुली कोणी करायची हा मुद्दा कायम आहे.

यांना नाही मिळत योजनेचा लाभ

*संविधानिक पदावर असणारा किंवा मंत्री असणारा शेतकरी *नगराध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष, आमदार, विधानपरीषद आमदार, लोकसभा आणि राज्यसभा सदस्य *केंद्र आणि राज्य सरकारमधील अधिकारी *प्राप्तिकर भरणारे शेतकरी *10 हजारांपेक्षा जास्त पेन्शन मिळणारे शेतकरी *डॉक्टर, इंजिनिअर, सीए, वकिल

संबंधित बातम्या :

लातूरात स्थिर, अकोल्यात मात्र सोयाबीनची विक्रमी दराकडे वाटचाल ; शेतकऱ्यांसाठी महत्वाचा टप्पा

रास्तारोकोला विरोध, आंदोलकांनी धरला थेट उपमुख्यमंत्र्याच्या घराचा रस्ता, काय झाले नेमके इंदापूरात?

दुग्धजन्य पदार्थामुळे का होईना दुधाचे भाव वाढले, खासगी डेअरी चालकांचा निर्णय

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.