AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गायी गुरांनाही विकली ऑफ असावा का हो? ‘या’ गावात देतात, 100 वर्षांपासूनची परंपरा!

माणसांप्रमाणेच गायी-गुरांनाही साप्ताहिक सुटी असावी, असा विचार आपण केलाही नसेल. पण या गावातील लोकांनी 100 वर्षांपूर्वीच हा विचार केला आणि तशी परंपराही सुरु केली.

गायी गुरांनाही विकली ऑफ असावा का हो? 'या' गावात देतात, 100 वर्षांपासूनची परंपरा!
Image Credit source: tv9 marathi
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Apr 05, 2023 | 2:40 PM
Share

नवी दिल्ली : माणसांच्या जगात दररोज कष्ट करणाऱ्या किंवा नोकरीवर जाणाऱ्या लोकांना एक दिवस साप्ताहिक सुटी मिळावी, असा नियम आहे. पण प्राण्यांच्याही जगाचा असा कुणी विचार केलाय का? किंबहुना माणसांच्या गरजांसाठी ज्या प्राण्यांना महिनाभर जुंपलं जातं, त्यांच्या आरोग्याचा कुणी विचार केलाय का.. त्यांना नसेल का साप्ताहिक सुटीची गरज? आपल्यापैकी अनेकांनी केला नसेल हा विचार. पण झारखंडमधील एक दोन नव्हे तर २० पेक्षा जास्त गावांनी हा विचार केलाय. तोसुद्धा आता नव्हे तर तब्बल १०० वर्षांपूर्वी.

कुठे दिला जातो विकली ऑफ?

झारखंड राज्यातील लातेहार जवळील जवळपास २० पेक्षा जास्त गावांमध्ये ही अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे. इथे गाय-बैल किंवा इतर जनावरांकडून रविवारी काम करून घेतलं जात नाही. त्या दिवशी त्यांचा विकली ऑफ समजा. विश्रांती दिली जाते. आठवडाभराचा थकवा घालवण्यासाठी, त्यांना ताजंतवानं होण्यासाठी..

अनेक जन्मांपासूनचं नातं…

लातेहारमधील गावकऱ्यांच्या मते, मनुष्य आणि प्राण्यांच अनेक जन्मांपासूनचं नातं आहे. भारतीय संस्कृतीत याचे अनेक दाखले आहेत. आपले अनेक सण-उत्सवदेखील पशु-प्राण्यांशी जोडलेले आहेत. गायी-गुरांच्या मेहनत आणि सहकार्यामुळेच जगात माणसांची भूक भागली जाते. त्यामुळे एवढी मेहनत घेणाऱ्या गायी गुरांना आठवड्यातून एक दिवस सुटी दिलीच पाहिजे. लातेहार जिल्ह्यातील हरखा, मोंगर, ललगडी आणि पकरारसह इतर अनेक गावांमध्ये ही परंपरा पाळली जाते.

गरज पडल्यास माणसं कामाला जुंपतात..

लातेहार येथील गावकऱ्यांनी सांगितलं की, माणसांना आठवड्यातून एक दिवस आराम नाही मिळाला तर ते आजारी पडतात. त्याचप्रमाणे प्राण्यांनाही जणाव जाणवतो. त्यांना आराम दिला नाही तर ते आजारी पडतात. त्यामुळे आमच्या गावातील ही परंपरा खरोखरच चांगली आहे. रवविारी अनेक ग्रामीण भागात जनावरांना सुटी दिली जाते. गरज पडली तर मासे स्वतः नांगर चालवतात. पण आठवड्यातून एक दिवस कोणत्याही स्थितीत जनावरांना कामाला जुंपत नाहीत.

कधीपासून सुरुवात?

जनावरांना साप्ताहिक सुटी देण्याची या गावांमधली परंपरा १०० वर्षांपूर्वीची आहे. अके दिवशी नांगराला जुंपत असतानाच एका बैलाचा मृत्यू झाला होता. हा मृत्यू का झाला, यावर पंचायत बसली. गरजेपेक्षा जास्त थकवा आणि कामाच्या ताणामुळे बैल मरण पावला, असं कारण पुढे आलं. त्यानंतर येथील पंचायतीने आठवड्यातून एक दिवस जनावरांना सुटी देण्याचा एकमताने निर्णय घेतला. तेव्हापासून ही परंपरा अखंडपणे सुरु आहे.

Follow Us
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर
Buldhana | लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर; कच्च्या मालाचे नमुने तपासणीसाठी जप्त
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून मोठी भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार, नवे नियम लागू
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड
पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
Rohit Pawar | रोहित पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले.....
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले, पश्चात्ताप झाला असेल तर या... रोख कुणाकडे?
काँग्रेसच्या झेंड्याखाली या...राऊतांच्या एका वक्तव्याने चर्चांना उधाण
Sanjay Raut UNCUT | काँग्रेसच्या झेंड्याखाली या... संजय राऊतांच्या त्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ....
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ एवढे टक्के साठा...