AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खरीप हंगामाची लगबग सुरू, कृषी विभागाचं नियोजन, बियाणांची एक जूनपासून विक्री

गेल्यावर्षी खरीप हंगाम अतिवृष्टीमुळं खराब झाला होता. त्याबरोबर रब्बी हंगाम सुध्दा अवकाळी पावसामुळे खराब गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी करण्यासाठी कर्ज काढली आहे. एक तारखेपासून कृषी विभागाच्या दुकानावर बियाणे खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होईल.

खरीप हंगामाची लगबग सुरू, कृषी विभागाचं नियोजन, बियाणांची एक जूनपासून विक्री
Kharif cropImage Credit source: tv9marathi
| Updated on: May 27, 2023 | 9:22 AM
Share

धुळे : धुळे (dhule) जिल्ह्यात खरीप पिकाची (Kharif crop) पेरणीसाठी लागणाऱ्या कपाशी पिकाची बियाणे एक जून पासून विक्री होणार आहे. प्रमुख पीक असून कपाशीसाठी 2 लाख 60 हजार 17 क्षेत्रावर कपाशीचा पेरा होणार आहे. यासाठी कृषी विभागाच्या (Agricultural department)वतीने 10 लाख 36 हजार बियाणे पाकिटे मागवण्यात आली आहेत. त्याचं वाटप एक जूनपासून होणार आहे, अशी माहिती कृषी अधिकारी कुर्बान तडवी (kurban tadavi)यांनी दिली आहे. जून महिन्यात राज्यात सगळीकडे पाऊस सक्रीय होईल असा हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे. काही जिल्ह्यात पावसाळ्यापुर्वीचं पेरणी झाली आहे. शेतकरी आता पावसाची वाट पाहत आहेत.

खरीप हंगामाची लगबग सुरू

खरीप हंगामाची लगबग सुरू झाली आहे, त्यासाठी आता कृषी विभागाने नियोजन केलं आहे. प्रमुख पीक असलेल्या कपाशीसाठी 10 लाख 36 हजार पाकिटांची मागणी शासनाच्या वतीने करण्यात आली होती, त्यानुसार ही सर्व बियाणे उपलब्ध झाली असून शेतकऱ्यांना एक जूनपासून त्याची विक्री केली जाणार आहे. यापूर्वीच काही शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्यावर कपाशीची पेरणी केली असली, तरी कृषी खात्याच्यावतीने मात्र एक जून नंतरच अधिकृत कपाशीचे बियाणे विक्री केली जाणार आहे. जिल्ह्यात दोन लाख सात हजार इतक्या क्षेत्रावर कपाशीच्या पेरणीचे नियोजन असल्याचं जिल्हा कृषी अधिकारी कुर्बन तडवी यांनी सांगितलं आहे.

गेल्यावर्षी दोन्ही हंगामात शेतकऱ्यांचं नुकसान

गेल्यावर्षी खरीप हंगाम अतिवृष्टीमुळं खराब झाला होता. त्याबरोबर रब्बी हंगाम सुध्दा अवकाळी पावसामुळे खराब गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी करण्यासाठी कर्ज काढली आहे. एक तारखेपासून कृषी विभागाच्या दुकानावर बियाणे खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होईल.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.