AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sugarcane Sludge : 46 साखर कारखान्यांचा धुराडी बंद, पश्चिम महाराष्ट्रातील कारखान्यांची मराठवाड्यातील शेतकऱ्यांना खुली ऑफर..!

यंदाचा गाळप हंगाम सुरु होऊन 6 महिन्याचा कालावधी संपला तरी राज्यात तब्बल 80 लाख टन उसाचे गाळप हे शिल्लक आहे. उसाच्या वाढत्या क्षेत्रामुळे यंदा ही परस्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये सर्वाधिक ऊस हा मराठवाड्यात शिल्लक आहे. सध्या राज्यातील 46 साखर कारखान्यांनी आटोपते घेतले असून साखर आयुक्तांच्या परवानगीने कारखाने बंद केले आहेत.

Sugarcane Sludge : 46 साखर कारखान्यांचा धुराडी बंद, पश्चिम महाराष्ट्रातील कारखान्यांची मराठवाड्यातील शेतकऱ्यांना खुली ऑफर..!
साखऱ कारखाना
| Updated on: Apr 19, 2022 | 10:45 AM
Share

पुणे : यंदाचा गाळप हंगाम सुरु होऊन 6 महिन्याचा कालावधी संपला तरी (Maharashtra) राज्यात तब्बल 80 लाख टन (Sugarcane Sludge) उसाचे गाळप हे शिल्लक आहे. उसाच्या वाढत्या क्षेत्रामुळे यंदा ही परस्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये सर्वाधिक ऊस हा (Marathwada) मराठवाड्यात शिल्लक आहे. सध्या राज्यातील 46 साखर कारखान्यांनी आटोपते घेतले असून साखर आयुक्तांच्या परवानगीने कारखाने बंद केले आहेत. मराठवाड्यातील उसाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शेतकऱ्यांनी साखर कारखान्यापर्यंत ऊस घेऊन यावा गाळप करुन दिला जाईल अशी भूमिका काही कारखान्यांनी घेतली आहे. मात्र, मुळात उसतोड कामगार आणि तोडीचा प्रश्न असल्याने हे शक्य होणार नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे पावसाळा सुरु होण्यापूर्वी तरी हा प्रश्न मार्गी लागणार की नाही अशी परस्थिती झाली आहे.

राज्यात 1 हजा 220 लाख टन उसाचे गाळप

ऑक्टोंबर महिन्यापासून यंदाचा गळीत हंगाम सुरु झाला होता. हंगामाच्या सुरवातीपासून क्षमतेपेक्षा अधिकचे गाळप हे साखर कारखान्यांनी केलेले आहे. विशेषत: पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी गाळपात घेतलेली आघाडी ही कायम ठेवली होती. त्यामुळे या विभागातील गाळप पूर्ण झाले असून 46 साखर कारखान्यांची धुराडी देखील बंद झाली आहे. वाढते क्षेत्र अन् अधिकचा उतारा यामुळे 1 हजार 220 लाख टन उसाचे गाळप करुन महाराष्ट्र साखर उत्पादनामध्ये देशात अव्वल स्थानी आहे.

उसतोड मजूर अन् वाहतूकीचा प्रश्न कायम

पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये यंदा अधिकची तोड ही हार्वेस्टरच्या माध्यमातून करण्यात आली आहे. मात्र, मराठवाड्यातील क्षेत्र त्या तुलनेचे नाही. त्यामुळे या भागात उसतोड कामगारांकडूनच अधिकची तोड झाली आहे. आता हंगामाच्या अंतिम टप्प्यात उसतोड कामगारांनीही परतीची वाट धरलेली आहे. त्यामुळे तोडणीसाठी पश्चिम महाराष्ट्रातील हार्वेस्टर मागविले जात आहेत. ऊस गाळपासाठी सर्वात मोठी समस्या म्हणजे उसतोड कामगार हे फडात येण्यासाठीच तयार नाहीत. शिवाय तोडणी झालेला ऊस कारखान्यावर घेऊन जाणेही जिकिरीचे झाले आहे.

198 पैकी 46 साखर कारखाने बंद

राज्यातील 198 साखर कारखान्यापैकी आतापर्यंत 46 साखर कारखान्यांने यंदाच्या हंगामातील गाळप पूर्ण करुन कारखाने हे बंद केले आहेत. महाराष्ट्र ऊस गाळपात आणि साखर उत्पादनातही राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. 46 साखर कारखाने बंद झाले असली तरी या भागातील हार्वेस्टर मराठवाड्यात आणून अतिरिक्त उसाचा प्रश्न मार्गी लावला जाणार आहे.

संबंधित बातम्या :

Beed : उसाच्या शेतामध्ये गांजाचे आंतरपिक, उसापेक्षा गांजाच वाढल्याने फुटले भिंग

Milk Production: दुधाचे दर वाढले अन् उत्पादन घटले, वाढत्या उन्हाचा नेमका परिणाम काय?

Goat rearing : जातिवंत शेळ्यांसाठी कृत्रिम रेतन, देशातील पहिलाच प्रयोग महाराष्ट्रात

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.