AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नांदेडच्या कृषी उत्पन्न बाजारपेठेत असं काय घडलं ? ऐन हंगामात हळदीचे व्यवहार बंद पडले

नैसर्गिक संकटावर मात केल्याने हे पीक शेतकऱ्यांच्या पदरी पडलेलं होते. त्यामुळे नांदेड बाजार समितीमध्ये दिवसाकाठी कोट्यावधीची उलाढाल होत होती. मात्र, आठवड्याच्या पहिल्याच दिवसापासून येथील हळदीचे व्यवहार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता हंगामात असा निर्णय म्हणल्यावर नुकसानच की, पण या निर्णयाला जबाबदार आहेत ते खरेदीदार. मोठे खरेदीदार हे व्यापाऱ्यांना वेळेत पैसेच अदा करीत नाहीत.

नांदेडच्या कृषी उत्पन्न बाजारपेठेत असं काय घडलं ? ऐन हंगामात हळदीचे व्यवहार बंद पडले
नांदेड कृषी उत्पन्न बाजार समिती,
| Edited By: | Updated on: Jan 03, 2022 | 2:33 PM
Share

नांदेड : सांगली, हिंगोली जिल्ह्यातील वसमत आणि त्यानंतर हळदीची बाजारपेठ म्हणलं तर नांदेडच्या बाजार समितीचे नाव आपसूकच येतं. गेल्या काही दिवसांपासून हळदीची आवकही वाढलेली आहे. नैसर्गिक संकटावर मात केल्याने हे पीक शेतकऱ्यांच्या पदरी पडलेलं होते. त्यामुळे नांदेड बाजार समितीमध्ये दिवसाकाठी कोट्यावधीची उलाढाल होत होती. मात्र, आठवड्याच्या पहिल्याच दिवसापासून येथील (Turmeric Transaction) हळदीचे व्यवहार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता हंगामात असा निर्णय म्हणल्यावर नुकसानच की, पण या निर्णयाला जबाबदार आहेत ते (Buyers) खरेदीदार. मोठे खरेदीदार हे व्यापाऱ्यांना वेळेत पैसेच अदा करीत नाहीत. त्यामुळे शेतकरी आणि आडते यांच्यात सातत्याने गैरसमज निर्माण होऊ लागल्याने येथील हळदीचे व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय आडत असोसिएशने घेतलेला आहे. त्यामुळे आता यावर काय तोडगा निघतो हे पहावे लागणार आहे.

काय आहे नियम?

हिंगोली जिल्ह्यातील वसमत ही बाजारपेठ केवळ चोख व्यवहरामुळे प्रसिध्द आहे. त्यामुळे परराज्यातही सौंदर्यप्रसाधने तयार करण्यासाठी हळदीची निर्यात केली जाते. मात्र, नांदेड येथील बाजारपेठेत यापेक्षा वेगळेच चित्र आहे. हळदीची खरेदी झाल्यापासून 24 तासांच्या आतमध्ये खरेदीदाराने व्यापाऱ्यांना पैसे देणे बंधनकारक आहे. असे असतानाही महिना-महिना दिवस पैसेच मिळत नाहीत. त्यामुळे शेतकरी आणि आडते यांच्यामध्ये गैरसमज हे वाढत चालले आहेत. त्यामुळे हळद विक्रीचे पैसे हे वेळेत मिळावेत यासाठी काहीतरी नियम करणे गरजेचे आहे. तरच येथील व्यवहार सुरळीत होणार आहेत. अन्यथा बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे आडत असोसिएशनने सांगितले आहे.

लिलाव अन् वजन यंत्रे बंदच

नांदेड येथील नव्या मोंढ्यात हळदीचे व्यवहार होतात. गेल्या काही दिवसांपासून हंगामाला सुरवात झाल्याने आवकही वाढलेली होती. सर्वकाही सुरळीत असतानाच केवळ खरेदीदाराच्या भूमिकेमुळे कोट्यावधींचे व्यवहार हे ठप्प आहेत. सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मोंढ्यातील लिलाव तर बंद होतेच शिवाय वजन काटेही बंद असल्याचे चित्र होते. त्यामुळे शेतकऱ्यांची गर्दी आणि वाहनांची वर्दळ असलेला मोंढा सुनासुना होता. खरेदीदाराच्या या भूमिकेमुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये व्यवहार सुरळीत होत नाहीत. त्यामुळे बाजार समितीच्या प्रशासकानेच यामध्ये हस्तक्षेप करण्याची मागणी होत आहे.

बाजार समिती प्रशासनाची महत्वाची भूमिका

आडते, शेतकरी किंवा खरेरीदार यांच्यामध्ये काही गैरसमज निर्माण झाल्यास मध्यस्तीची भूमिका ही बाजार समितीच्या प्रशासकाची असते. त्यामुळे आताही या समस्येवर तोडगा काढण्याची मागणी होत आहे. असेच शेतकऱ्यांचे पैसे आडत्यांकडे कायम राहिले तर भविष्यात व्यवहरात अडचणी निर्माण होतात. त्यामुळे बाजार समिती प्रशासकाने यामध्ये हस्तक्षेप करुन शेतकऱ्यांचा आणि आडत्यांचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी आहे.

संबंधित बातम्या :

Market Price : नववर्षात सोयाबीनच्या वाढत्या दराने शेतकऱ्यांना दिलासा, विक्री की साठवणूक ! वाचा सविस्तर

निसर्गाचा लहरीपणा त्यात सरकारच्या धोरणांचा फटका, शेतकरीही एक पाऊल पुढेच, वाचा सविस्तर

PM KISAN : शेतकऱ्यांचा ‘सन्मान’ होण्यास सुरवात, अपात्र शेतकऱ्यांच्या खात्याचे काय होणार ?

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.