AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बायकोचं मंगळसूत्र गहाण ठेऊन शेती फुलवली, जोमदार पीकही आलं; पण निसर्गाने घात केला आणि नको ते घडलं…

राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस झाला, त्यात अनेक शेतकरी उद्ध्वस्त झाले. पण नाशिकच्या एका शेतकऱ्यांची कहाणी ऐकून तुमच्या डोळ्यात पाणी येईल.

बायकोचं मंगळसूत्र गहाण ठेऊन शेती फुलवली, जोमदार पीकही आलं; पण निसर्गाने घात केला आणि नको ते घडलं...
Image Credit source: TV9 Network
| Edited By: Kiran Balasaheb Tajne | Updated on: Apr 13, 2023 | 4:16 PM
Share

नाशिक : खरंतर शेतकरी हा शेती करत असतांना भांडवल उभं करण्यासाठी कधी हात उसने पैसे घेत असतो तर काही आपल्या पत्नीचे दागिने गहाण ठेऊन कर्ज घेत असतो. त्यातून आपली शेती फुलवत असतो. काबाड कष्ट करून फुलवलेली शेती आपल्या पदरात किती पैसे देईल याची कुठलीही शास्वती नसतांना शेतमाल विकल्यावर आलेल्या पैशातून सोनं सोडवू असं वचन आपल्या पत्नीला देत असतो. मात्र, जर कधी अस्मानी संकट आलं तर अक्षरशः रंगवलेली स्वप्न तशीच राहून जातात. पदरी निराशाच आल्यानं आर्थिक संकट उभं राहतं. त्यामुळे शेतमालावर आखलेली गणितं ही वारंवार अर्धवट राहिल्यानं तो अनेकदा जीवनच संपवण्याची भाषा बोलू लागतो. तर काही जण हे थेट आयुष्य संपवून टाकत असतात.

सध्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. यंदाच्या संपूर्ण वर्षात शेतकऱ्यांवर कधी अस्मानी संकट तर कधी सुलतानी संकट आले आहे. त्यात ते वारंवार ही परिस्थिती निर्माण झाल्याने बळीराजा मेटकुटीला आला आहे.

लासलगाव जवळील चांदवड तालुक्यातील पिंपळद येथील कांदा उत्पादक शेतकरी संजय निवृत्ती टोपे यांनी अडीच एकरात उन्हाळ कांद्याचे पिक घेतले होते. यासाठी 70 हजार रुपये पिक कर्ज, पत्नीचे मंगळसूत्र आणि इतर दागिने गहाण ठेऊन कर्ज घेतले होते.

घेतलेल्या कर्जातून शेतीसाठी भांडवल उभं केलं होतं. त्यात उन्हाळ कांद्याचे पिक घेतले विशेष म्हणजे तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपत पीक जोमदार घेतले. कांदा काढणीला सुरुवात झाली पण भाव नसल्याने साठवण करण्याचा निर्णय घेतला होता.

कांद्याला बाजार भाव नसल्याने बाजार भाव वाढतील तेव्हा हा कांदा विक्री करू या हेतूने चाळीमध्ये साठवण्यासाठी सुरुवात करण्याअगोदरच अस्मानी संकट कोसळले. तीन-चार दिवस सलग गारपीट आणि अवकाळी पाऊस झाला.

यामध्ये काढून ठेवलेला आणि शेतातील कांदा ओला झाल्याने सडू लागल्याने दहा ते पंधरा टक्के ही कांदा हातात येणार नसल्याने चित्र आहे. उत्पादन खर्च तर दूरच वाहतूक आणि मजुरी ही निघणार नसल्याने आर्थिक अडचणीत वाढ झाली आहे.

नुकत्याच आलेल्या अस्मानी संकटाने संपूर्ण स्वप्नांवर पाणी फिरवल्याने कांदा उत्पादक शेतकरी सांगत आहे. लासलगाव येथील कांदा उत्पादक शेतकरी टोपे यांच्याप्रमाणे बहुतांश शेतकऱ्यांची हीच परिस्थिती आहे. त्यामुळे सरकारची मदत किती आणि कधी मिळेल याची प्रतिक्षा बळीराजा करीत आहे.

Follow Us
कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल..
मोठी बातमी! कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल एक कोटी....
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
Mumbai | अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं इमर्जेन्सी लँडिंग
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले.
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले... नेमकी भानगड काय?
CJP चा सरकारला अल्टिमेटम! FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
CJP On Students Protest | CJP चा सरकारला अल्टिमेटम! उद्यापर्यंत FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या'
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या' पोस्टची तुफान चर्चा
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? मोठा खुलासा
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? तुकाराम मुंडेंसोबतच्या भेटीबाबत रोहित पवारांचा खुलासा
फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका...
Bharat Gogawale | फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं, व्हिडीओ व्हायरल होताच...
संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक
Om Birla | संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक; नेमकी कोणत्या विषयावर चर्चा?