पंतप्रधान ठिबक सिंचन योजनेत नवी घोषणा, कुणाला मिळणार लाभ, काय आहेत फायदे ? जाणून घ्या

पंतप्रधान ठिबक सिंचन योजना ही सन 2015 मध्येच सुरु करण्यात आली आहे. मात्र, यामध्ये महत्वाचे बदल करण्यात आले असून आता 2025-26 पर्यंत या योजनेचा शेतकऱ्यांना लाभ घेता येणार आहे. म्हणजेच यामध्ये 2 वर्षांची वाढ करण्यात आली आहे. पाण्याचा अपव्यय टाळता यावा व योग्य वापर करुन शेतकऱ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये म्हणून ही योजना सुरु करण्यात आली होती.

पंतप्रधान ठिबक सिंचन योजनेत नवी घोषणा, कुणाला मिळणार लाभ, काय आहेत फायदे ? जाणून घ्या
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Dec 15, 2021 | 4:20 PM

मुंबई : पंतप्रधान ठिबक सिंचन योजना ही सन 2015 मध्येच सुरु करण्यात आली आहे. मात्र, यामध्ये महत्वाचे बदल करण्यात आले असून आता 2025-26 पर्यंत या योजनेचा शेतकऱ्यांना लाभ घेता येणार आहे. म्हणजेच यामध्ये 2 वर्षांची वाढ करण्यात आली आहे. पाण्याचा अपव्यय टाळता यावा व योग्य वापर करुन शेतकऱ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये म्हणून ही योजना सुरु करण्यात आली होती. शिवाय केंद्र सरकारने या योजनेकरिता 50 हजार कोटींची तरतूदही केली आहे. सिंचनासाठी जर स्प्रिंकलरचा वापर केला तर 80 ते 90 टक्के अनुदान सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणार आहे. शिवाय स्प्रिंकलरमुळे शेतजमिनीचे नुकसान तर होणार नाहीच शिवाय कमी उंचीच्या पिकांसाठी हे प्रभावी आहे.

आता सरकारने काय निर्णय घेतला आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान कृषी सिंचन योजने वाढीव मुदत देण्यात आली आहे. आता ही योजना 2025-26 पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येणार आहे.

योजनेचा कोण लाभ घेऊ शकते

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे शेतजमिन असणे आवश्यक आहे. शेतकरी वैयक्तिक तर लाभ घेऊ शकतोच शिवाय शेती गट, संस्था, सहकारी संस्था, कॉर्पोरेट कंपन्या, शेती उत्पादक कंपन्यांच्या गटांचे सदस्य आणि इतर पात्र संस्थांचे सदस्य यांनाही लाभ घेता येणार आहे. पंतप्रधान ठिबक सिंचन योजना 2021 चा हा अशा शेतकऱ्यांनाही होणार आहे जे गेल्या सात वर्षांपासून भाडेपट्टी करारांतर्गत शेतजमिन करीत आहेत. कंत्राटी पध्दतीने शेती करणाऱ्यांनाही याचा लाभ मिळणार आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी असा करा अर्ज

सर्वप्रथम इच्छूकाला महाडीबीटी ऑनलाइन पोर्टल ओपन करायचे आहे. यामध्ये मुखपृष्ठावर अर्ज करा असा टॅग दिसेल त्याला क्लिक करायचे आहे. त्यानंतर सिंचन साधने सुविधा यावर क्लिक करुन समोरील बाबी निवडा हा पर्याय ओपन करायचा आहे. यामध्ये जिल्हा तालुका गाव आणि वैयक्तिक माहिती भरायची आहे. ही माहिती भरून झाल्यानंतर मुख्य घटक मध्ये सिंचन साधने आणि सुविधा हा घटक निवडायचा आहे.

*यानंतर दिलेली माहिती पूर्ण भरायचे आहे. ज्या पिकासाठी आपल्याला ठिबक सिंचन पाहिजे आहे त्याची माहिती देते भरावी लागणार आहे. यानंतर पूर्वसंमती शिवाय मी योजनेचा लाभ घेणार नाही अशी नोंद करावी लागणार आहे. यानंतर भरलेली माहिती सेव्ह करायचे आहे. यानंतर मुख्य मेनू वर जाऊन ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. मेनू वर आल्यानंतर सर्वात प्रथम ‘अर्ज सादर करा’ यावर क्लिक करायचे आहे. यानंतर तुम्हाला तालुका हे ऑप्शन दिसेल शिवाय तुम्ही ज्यासाठी अर्ज केला आहे त्या योजनेचे नाव देखील येते समोर येईल.

यानंतर प्राथमिक प्रधान्य क्रमांक देऊन अटी-शर्ती त्या मान्य असल्याचे नमूद करावे लागणार आहे. यानंतर आपल्याला अर्ज सादर करावा लागणार आहे. पूर्ण प्रक्रिया पार पडल्यानंतर 23 रुपये 60 पैसे आपल्या अकाउंट मधून भरावे लागणार आहेत याची प्रक्रिया ही ऑनलाइन करता येणार आहे.

संबंधित बातम्या :

आता शेतकऱ्यांची चिंता वाढली, सर्वकाही पोषक असतानाही सोयाबीनचे दर…

दुग्धोत्पादन वाढीसाठी देशी गायींवर कृत्रिम गर्भधारणा, राज्यात संकरीत गायींची संख्या वाढली

पोषक वातावरण असतानाही ऊस लागवड रखडली, काय आहेत कारणे?

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.