AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Positive News: संकटावर मात करुन द्राक्षाचा गोडवा सातासमुद्रा पार, सर्वाधिक निर्यात नाशिकातून

जिथे उत्पादनाची शाश्वती नव्हती तिथे कशाची आलीयं निर्यात. यंदा द्राक्ष निर्यात सोडा पण बागेचा मालही पदरी पडतो की नाही अशी स्थिती निर्माण झाली होती. लागवडीपासूनच निसर्गाचा लहरीपणा काय असतो याची प्रचिती यंदा द्राक्ष बागायत शेतकऱ्यांना आली होती. महिन्यातून एकदा तरी अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण अन्यथा गारपिट ही ठरलेलीच. त्यामुळे उत्पादनावरील खर्च हा दुपटीने वाढला होता. शिवाय बागा अर्ध्यातून सोडता येत नव्हत्या.

Positive News: संकटावर मात करुन द्राक्षाचा गोडवा सातासमुद्रा पार, सर्वाधिक निर्यात नाशिकातून
प्रतिकूल परस्थितीमधूनही यंदा नाशिक जिल्ह्यातून द्राक्ष निर्यात झाली आहे.Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Mar 21, 2022 | 5:03 PM
Share

लासलगाव : जिथे उत्पादनाची शाश्वती नव्हती तिथे कशाची आलीयं निर्यात. यंदा (Grape Export) द्राक्ष निर्यात सोडा पण बागेचा मालही पदरी पडतो की नाही अशी स्थिती निर्माण झाली होती. लागवडीपासूनच (The vagaries of nature) निसर्गाचा लहरीपणा काय असतो याची प्रचिती यंदा द्राक्ष बागायत शेतकऱ्यांना आली होती. महिन्यातून एकदा तरी अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण अन्यथा गारपिट ही ठरलेलीच. त्यामुळे (Grape Production) उत्पादनावरील खर्च हा दुपटीने वाढला होता. शिवाय बागा अर्ध्यातून सोडता येत नव्हत्या. हे कमी म्हणून की काय निर्यातीच्या दरम्यानच कंटेनरच्या भाड्यामध्ये झालेली वाढ. चोहीबाजूने संकटे असतानाही हंगामाच्या अंतिम टप्प्यात का होईना सकारात्मक बाब घडली आहे. अनेक अडथळ्यांची शर्यत पार करीत यंदा तब्बल 68 हजार 465 मेट्रीक टन द्राक्षाची निर्यात देशातून झाली आहे. यामध्ये सर्वाधिक वाटा हा नाशिक जिल्ह्याचाच राहिला असून त्यापाठोपाठ सांगली जिल्ह्यातून निर्यात झाली आहे. कीड-रोगराई, अवकाळी आणि थंडी यामुळे थेट द्राक्षाच्या दर्जावर परिणाम झाला होता असे असतानाही निर्याती योग्य द्राक्ष तयार करण्यात यश आले आहे. दरवर्षीपेक्षा निर्याचीचे प्रमाण कमी असले तरी ओढावलेल्या परस्थितीतून झालेली निर्यात दिलासादायकच आहे.

5 हजार 68 कंटनेरने निर्यात

राज्यात नाशिक आणि सांगली जिल्ह्यात निर्यातक्षम द्राक्षांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. यामध्ये नाशिक जिल्ह्यात निफाड, दिंडोरी, चांदवड, सटाणा, देवळा आणि मालेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात द्राक्षांची लागवड करण्यात आली आहे.अवकाळी पाऊस, कडाक्याची थंडी यासारखे अनेक संकटावर मात करत द्राक्ष निर्यातीचा हंगाम अंतिम टप्प्यात आलेला असून 18 मार्च पर्यंत 5 हजार 68 कंटेनर मधून 68 हजार 465 मेट्रिक टन द्राक्ष निर्यात झाली आहे.निर्यातदारांकडून ज्या दर्जाची मागणी होत होती त्याची पूर्तता करण्यात यश आल्याचे महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे नाशिक विभागाचे रामनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.

नैसर्गिक संकटावर मात करुन हंगाम अंतिम टप्प्यात

7 जानेवारीपासून द्राक्ष हंगामाला सुरवात होते. तेव्हापासूनच निसर्गाच्या लहरीपणालाही सुरवात झाली होती. महिन्यातून किमान एकदा तरी अवकाळी पाऊस किंवा ढगाळ वातावरण हे ठरलेलेच. त्यामुळे सुरवातीला द्राक्ष बागांवर त्याचा परिणाम झाला. बागा जोपासण्यासाठी शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागली होती. शिवाय वाढत्या थंडीमुळे द्राक्षाला तडे जाऊ नयेत म्हणून रात्रीचा दिवस करुन शेतकऱ्यांनी बागेमध्येच शेकोट्या पेटवून द्राक्षांचे संरक्षण केले होते. तर तोडणीच्या दरम्यान पुन्हा अवकाळीने नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रात हजेरी लावली होती.

यंदाची द्राक्ष निर्यात आकडेवारी (मॅट्रिक टन)

आतापर्यंत  नेदरलॅन्ड –  46,532 मे टन,  युके –   6356 मे टन, जर्मनी –  6061मे टन, पोलंड –  3446 मे टन, डेन्मार्क –  858 मे टन, स्पेन –      736 मे टन अशी निर्यात झाली आहे.

द्राक्ष निर्यात आलेख

2017-18 -188221  मॅट्रिक टन निर्यातीतून   1 हजार 900 करोड उत्पादन मिळाले तर 2018-19 – 246133  मॅट्रिक टन निर्यातीमधून  2 हजार 335 करोड रुपये, 2019 -20 193690  मॅट्रिक टनाच्या निर्यातीमधून 2 हजार 177 करोड रुपये व गतवर्षी 246107 मॅट्रिक टन निर्यातीमधून 2 हजार 298 कोटीचे उत्पन्न मिळाले होते.

संबंधित बातम्या :

Photo Gallery : बीडात यंदाच्या हंगामात 400 एकर ऊस जळून खाक, शेतकऱ्यांच्या काळजाचं पाणी-पाणी

Cotton Crop : कापसाला विक्रमी दर, आता बियाणांसाठीही मोजावे लागणार अधिकचे पैसे, वेध खरिपाचा

Agricultural Pump: अहो खरंच..! शेतकऱ्यांच्या हितासाठी महावितरणचे अधिकारी रस्त्यावर, आता उरले 11 दिवस

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.