Agricultural Pump : निर्णय झाला मात्र, आदेश नसल्यामुळे जोडणी नव्हे तोडणीच सुरु, रब्बी धोक्यातच

कृषीपंपाचा विद्युत पुरवठा खंडीत तर करुच नये शिवाय ज्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे त्यांचा वीज पुरवठा सुरळीत करण्याचा निर्णय अधिवेशनात झाला असला तरी प्रत्यक्षात तसे आदेश स्थानिक पातळीवर मिळालेले नाहीत. त्यामुळे वीज जोडणी तर सोडाच पण तोडणीच सुरु असल्याचे चित्र शेतशिवारात आहे. एकीकडे नांदेड जिल्ह्यात वीजोजडणी केली जात आहे तर दुसरीकडे जालना, उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये आदेश मिळाले नसल्याचे सांगत ही कारवाई सुरु आहे.

Agricultural Pump : निर्णय झाला मात्र, आदेश नसल्यामुळे जोडणी नव्हे तोडणीच सुरु, रब्बी धोक्यातच
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Mar 18, 2022 | 3:53 PM

जालना : कृषीपंपाचा (Power Supply) विद्युत पुरवठा खंडीत तर करुच नये शिवाय ज्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे त्यांचा वीज पुरवठा सुरळीत करण्याचा निर्णय अधिवेशनात झाला असला तरी प्रत्यक्षात तसे आदेश स्थानिक पातळीवर मिळालेले नाहीत. त्यामुळे वीज जोडणी तर सोडाच पण तोडणीच सुरु असल्याचे चित्र शेतशिवारात आहे. एकीकडे नांदेड जिल्ह्यात वीजोजडणी केली जात आहे तर दुसरीकडे (Jalna District) जालना, उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये आदेश मिळाले नसल्याचे सांगत ही कारवाई सुरु आहे. दोन दिवसांपूर्वीच ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी तीन महिन्यासाठी वीज तोडणीची मोहिम स्थगित करण्याचे सांगितले होते. मात्र, अनेक जिल्ह्यामध्ये या निर्णयाची अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळे पाण्याअभावी (Rabi Season) रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान हे सुरुच आहे.

134 कृषीपंपाचा विद्युत पुरवठा खंडीत

कृषीपंपाच्या वाढत्या थकबाकीमुळे ऐन रब्बी हंगामात विद्युत पुरवठा खंडीत करण्याची मोहिम महावितरणने हाती घेतली होती. यामुळे अडचणीत आलेला शेतकरी थकबाकी अदा करेल असा विश्वास महावितरण कंपनीला होता. पण खरिपात झालेले नुकसान आणि रब्बी हंगामातही निसर्गाचा लहरीपणा कायम असल्याने शेतकरी हे वीजबिल अदाच करु शकले नाहीत. त्यामुळे जालना जिल्ह्यातील तब्बल 134 कृषीपंपाचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. अद्यापही वीजजोडणी झाली नसल्याने पिकांचे नुकसान हे सुरुच आहे.

आतापर्यंत कारवाई आता मनामानी

मध्यंतरी वीज पुरवठा खंडीत करण्यासाठी महावितरणचे अधिकारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर येत होते. पण वीज जोडणीचे आदेश दिल्यानंतरही अधिकाऱ्यांकडून त्याची अंमलबजावणी होताना पाहवयास मिळत नाही. तसेच सलग सुट्यामुळे अधिकारी बांधावर तर सोडाच पण कार्यालयातही नाहीत अशी स्थिती आहे. त्यामुळे रब्बी पिकांवरील संकट अद्यापही टळलेले नाही. मात्र, लेखी आदेश मिळाले नसल्याचेही अधिकारी सांगत आहेत.

पीक बहरात असतानाच विद्युत पुरवठा खंडीत

रब्बी हंगामातील पिके ही पोषक वातावरणामुळे बहरात आहेत. मात्र, उत्पादन वाढीसाठी जोमात असलेल्या पिकांना आता पाण्याची गरज आहे. असे असताना कृषीपंपाचा विद्युत पुरवठा सुरु झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. सोयाबीन, हरभरा, ज्वारी हे अंतिम असून एक पाणी दिले तर उत्पादनात भर पडणार आहे. पण कृषीपंपाचा विद्युत पुरवठाच सुरळीत होत नसल्याने शेतकरी हताश आहे.

संबंधित बातम्या :

Soybean Damage : सोयाबीन पिकलं अन् शेतातच कुजलं, हे सर्व रस्त्याअभावी लातुरात घडलं..!

Sugarcane Cane : मराठवाड्याच्या मदतीला पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखाने..! गावनिहाय नियोजनातून मिटेल का अतिरिक्त ऊसाचा प्रश्न?

Grape : द्राक्ष उत्पादकांवर आता दुहेरी संकट, हंगामाच्या अंतिम टप्प्यात सर्वकाही गमावले..!

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.