AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विज तोडणीचा ‘शॅाक’ शेतकऱ्यांना नाही परवडणार, सांगलीत मोर्चा तर औरंगाबादमध्ये आयुक्तांना निवेदन

वाढत्या थकबाकीमुळे महावितरण कंपनीने आता धडक वसुली मोहिम सुरु केली आहे. कृषीपंपधारकांना तर 24 नोव्हेंबर ही डेडलाईन देण्यात आली होती. आता थेट विद्युत पुरवठाच खंडीत केला जात असल्याने आंदोलने, निदर्शने होत आहेत. सांगली येथे विज कनेक्शन तोडणी बंद झालीच पाहिजे या मागणीसाठी महावितरणच्या कार्यालयासमोरच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ठिय्या देण्यात आला होता. तर दुसरीकडे औरंगाबादमध्ये मनसेच्या वतीने विभागीय आयुक्त यांना निवेदन देण्यात आले आहे.

विज तोडणीचा 'शॅाक' शेतकऱ्यांना नाही परवडणार, सांगलीत मोर्चा तर औरंगाबादमध्ये आयुक्तांना निवेदन
कृषीपंपाचा विद्युत पुरवठी खंडीत करु नये या मागणीचे निवेदन मनसेच्या वतीने औरंगाबाद विभागीय आयुक्त यांना देण्यात आले
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Nov 26, 2021 | 3:41 PM
Share

लातूर : वाढत्या थकबाकीमुळे महावितरण कंपनीने आता धडक वसुली मोहिम सुरु केली आहे. कृषीपंपधारकांना तर 24 नोव्हेंबर ही डेडलाईन देण्यात आली होती. आता थेट विद्युत पुरवठाच खंडीत केला जात असल्याने आंदोलने, निदर्शने होत आहेत. सांगली येथे विज कनेक्शन तोडणी बंद झालीच पाहिजे या मागणीसाठी महावितरणच्या कार्यालयासमोरच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ठिय्या देण्यात आला होता. तर दुसरीकडे औरंगाबादमध्ये मनसेच्या वतीने विभागीय आयुक्त यांना निवेदन देण्यात आले आहे.

महावितरणची सर्वाधिक थकबाकी ही कृषीपंप धारक ग्राहकांकडे आहे. नियमित बिल अदा केले जात नसल्याने थकबाकीत वाढ झाली आहे. आता महावितरण कंपनीने मध्यंतरी थकबाकी अदा करण्याचे अवाहन केले होते. तर आता 24 नोव्हेंबरपासून थेट विद्युत पुरवठाच खंडीत केला जात आहे. या करवाईमुळे आता रोष व्यक्त होऊ लागला आहे,

ऐन रब्बीच्या तोंडावरच वसुली मोहिम

शेतकरी हे महावितरणचे थकीत बील अदा करीत नाहीत. किमान आता रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्याच्या गरजेपोटी तरी विजबिल अदा करतील यामुळे ऐन रब्बी हंगामातच महावितरणकडून वसुली आणि कारवाईची केली जात असते. यंदा मुबलक प्रमाणात पाणीसाठाही आहे. शिवाय पोषक वातावरणामुळे रब्बी हंगामातील उत्पादनही वाढणार आहे. त्यामुळे थेट विजतोडणीची कारवाई करु नये यासाठी शेतकरी संघटना पुढे येत आहेत.

सांगलीत महावितरणच्या कार्यांलयासमोरच ठिय्या

ऐन रब्बी हंगामातच विजतोडणी का याचा जाब विचारण्यासाठी शुक्रवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढला होता. महावितरणच्या परिसरात मोर्चा दाखल होताच पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली. यानंतर मात्र, संतप्त आंदोलकांनी थेट महावितरणचे कार्यालय उघडूनच कार्यालयातच ठिय्या दिला होता. शिवाय कृषी पंपाचा विजपुरवठा खंडीत करु नये अशी मागणी केली.

औरंगाबादमध्ये विभागीय आयुक्तांना मनसेचे निवेदन

मराठवाड्यातही महावितरणची वसुली मोहिम सुरु आहे. लातूर, नांदेड, उस्मानाबाद जिल्ह्यात थकबाकीदारांच्या कृषीपंपाचा विद्युत पुरवठी मध्यंतरी खंडीत करण्यात आला होता. यामुळे रब्बी हंगामातील पिकांवर त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे सक्तीची विज वसुली थांबवावी आणि विद्युत पुरवठाही खंडीत करु नये अशा मागणीचे निवेदन मनसेचे दिलीप धोत्रे, संतोष नागरगोजे, प्रवक्ते प्रकाश महाजन, राज्य उपाध्यक्ष अशोक तावरे यांनी विभागीय आयुक्त यांना दिले आहे.

संबंधित बातम्या :

पेरलं तरच उगवेन..आगामी खरिपासाठी कशी राबवली जातेय बीजोत्पादन प्रक्रिया, शेतकऱ्यांचा सहभागही महत्वाचा

सोयाबीनच्या दरही वाढले अन् आवकही, 7 हजाराकडे वाटचाल

…अखेर कृषी आयुक्तांचे भाकित खरे ठरले, काय होते केंद्र सरकारला लिहलेल्या पत्रात?

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल