AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune : उपमुख्यमंत्र्यांनी मिटवली खरिपाची चिंता, खताचा मुबलक साठा, तुम्ही उत्पादनवाढीसाठी प्रयत्न करा

खरीप हंगामाची लगबग सुरु झाली आहे. गतवर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते. शिवाय यंदा खताची टंचाई भासेल असे सांगितले जात आहे. पण शेतकऱ्यांनी खत आणि बियाणांबाबत निश्चिंत राहून उत्पादन वाढीवर लक्ष केंद्रीत करावे. जिल्ह्यात 27 हजार 600 क्विंटल बियाणे हे मुख्य पिकांसाठी लागते. यामध्ये भात,मका, बाजरी, सोयाबीन,भुईमूग या पिकांचा समावेश असतो.

Pune : उपमुख्यमंत्र्यांनी मिटवली खरिपाची चिंता, खताचा मुबलक साठा, तुम्ही उत्पादनवाढीसाठी प्रयत्न करा
उपमुख्यमंत्री अजित पवारImage Credit source: tv9
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: May 06, 2022 | 2:51 PM
Share

पुणे : खरीप हंगामाच्या अनुशंगाने जिल्हानिहाय (Kharif Season) हंगामपूर्व आढावा बैठका पार पडत आहेत. या दरम्यान, खरीप हंगामासाठीचे सरासरी क्षेत्र , पेरणीसाठी बियाणे आणि खत पुरवठा यासारख्या बाबींचा आढावा घेतला जातो. त्याचअनुशंगाने (Pune) पुणे येथे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री (Ajit Pawar) अजित पवार यांनी बैठक घेतली. खरीप हंगामात ना बियाणांचा तुटवडा भासेल ना खताचा. तशा प्रकारचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. शेतकऱ्यांनी फक्त एकाच खताचा हट्ट करु नये कृषी विभागाने ज्या सूचना जारी केल्या आहेत त्या पध्दतीने जरी पेरा झाला तरी तो उत्पादन वाढीसाठीच असेल. यंदाच्या हंगामात खत-बियाणांची चिंता करु नका तुम्ही फक्त उत्पादन आणि उत्पन्न वाढीवर लक्ष केंद्रीक करा असा सल्ला त्यांनी आढावा बैठकी दरम्यान दिला आहे. खरिपाचे सरासरी क्षेत्र आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या बियाणे आणि खताचाही आढावा बैठकी दमरम्यान घेण्यात आला होता.

खरिपासाठी आवश्यक खत-बियाणे

खरीप हंगामाची लगबग सुरु झाली आहे. गतवर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते. शिवाय यंदा खताची टंचाई भासेल असे सांगितले जात आहे. पण शेतकऱ्यांनी खत आणि बियाणांबाबत निश्चिंत राहून उत्पादन वाढीवर लक्ष केंद्रीत करावे. जिल्ह्यात 27 हजार 600 क्विंटल बियाणे हे मुख्य पिकांसाठी लागते. यामध्ये भात,मका, बाजरी, सोयाबीन,भुईमूग या पिकांचा समावेश असतो. असे असताना सध्या 15 हजार 125 क्विंटल बियाणे हे शिल्लक आहे. त्यामुळे बियाणांची तर चिंता ना्ही शिवाय खतही हंगाम सुरु होण्यापूर्वीच पुरविले जाणार आहे. गतवर्षी 2 लाख 15 हजार मेट्रीक टन एवढ्या खताची मागणी होती. त्यामधील 74 हजार 368 मेट्रीक टन शिल्लक आहे. त्यामुळे खत आणि बियाणांची चिंता करण्याचे कारण नसल्याचे पवार यांनी बैठकीत सांगितले आहे.

4 लाख 10 हजार खातेदारांना पीक कर्ज

सध्या खरीप हंगामातील पीक कर्ज वाटपाला सुरवात झाली आहे. पुणे जिल्ह्यातील 4 लाख 10 हजार खातेदारांना तब्बल 4 हजार कोटींचे कर्ज वितरीत केले जाणार आहे. या कर्जाचा उपयोग याच खरीप हंगामात व्हावा या दृष्टीकोनातून नियोजन केल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे. खरीप पीक कर्ज वाटपाला सुरवात झाली आहे. शेतकऱ्यांना कर्जाचा वापर आणि उद्देश समजावा याच दृष्टीकोनातून लवकर वाटपास सुरवात झाली आहे.

योग्य नियोजन झाले तरच उत्पादनात वाढ

खरीप हंगामात बियाणे, खते आणि पीककर्ज हे वेळेत शेतकऱ्यांना मिळाले तरच उत्पादन वाढणार आहे. यामध्ये बॅंका आणि कृषी अधिकारी यांचे मोठे योगदान असून शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ कशी होईल यासाठीच प्रयत्न असणे गरजेचे आहे. त्याच अनुशंगाने कृषी अधिकाऱ्यांनी कामाला लागावे आणि शेतकऱ्यांनीही गतवर्षी झालेले नुकसान कसे भरुन काढता येईल यावर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार