Nanded : पावसाची उसंत, पंचनाम्याला सुरवात, विरोधी पक्षनेत्याच्या दौऱ्याचा परिणाम की मुख्यमंत्र्यांच्या सूचना..!

हंगामाच्या सुरवातील पावसाअभावी याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी धूळपेरणी केली होती. असे असूनही खरीप हंगाम हा अडचणीत होता. मात्र, 1 जुलै रोजी सुरु झालेला पाऊस हा पिके आणि शेतकऱ्यांचे परिश्रम पाण्यात घालूनच गेला. सलग 15 दिवस पावसामध्ये सातत्य राहिले होते. त्यामुळे सोयाबीन, उडीद, मूग या पिकांचे तर नुकसान झालेच पण शेत जमिनही खरडून गेली होती.

Nanded : पावसाची उसंत, पंचनाम्याला सुरवात, विरोधी पक्षनेत्याच्या दौऱ्याचा परिणाम की मुख्यमंत्र्यांच्या सूचना..!
नांदेड जिल्ह्यामध्ये अखेर पंचनाम्यास सुरवात झाली आहे.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 01, 2022 | 10:08 AM

नांदेड : केवळ मराठवाड्यातच नव्हे तर राज्यात पावसाचा सर्वाधिक फटका नांदेडकरांना बसलेला आहे. दरवर्षी नांदेड जिल्ह्यावर वरुणराजाची कृपादृष्टी ही असतेच पण यंदा अपेक्षेपेक्षा जास्त झाल्याने पेरणी झालेली (Crop Damage) पिके तब्बल 15 दिवस पाण्यात होती. शिवाय राज्यात पावसाने उघडीप दिली पण नांदेडात रिमझिम ही सुरुच होती. गेल्या चार दिवसांपासून चित्र बदलत आहे. पावसानेही उसंत घेतली तर आता (Panchanama) पंचनामेही वेगात होऊ लागले आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा पीक पाहणीचा दौरा संपताच प्रशासकीय यंत्रणा हालली असून पंचनाम्याला सुरवात झाली अशी कुजबूज आहे तर दुसरीकडे मुख्यमंत्री यांनी सूचना दिल्यानेच पंचनामे करण्यास (Agricultural Department) कृषी अधिकारी बांधावर येत असल्याचे सांगितले जात आहे. श्रेय कोणीही घेऊ मात्र, शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागून त्यांना नुकसानभरापाईचा आधार मिळावा एवढेच.

3 लाख 20 हजार हेक्टरावरील क्षेत्र बाधित

हंगामाच्या सुरवातील पावसाअभावी याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी धूळपेरणी केली होती. असे असूनही खरीप हंगाम हा अडचणीत होता. मात्र, 1 जुलै रोजी सुरु झालेला पाऊस हा पिके आणि शेतकऱ्यांचे परिश्रम पाण्यात घालूनच गेला. सलग 15 दिवस पावसामध्ये सातत्य राहिले होते. त्यामुळे सोयाबीन, उडीद, मूग या पिकांचे तर नुकसान झालेच पण शेत जमिनही खरडून गेली होती. जिल्ह्यातील तब्बल 3 लाख 20 हजार हेक्टर क्षेत्र हे बाधित झाले आहे. तर आतापर्यंत 1 लाख 60 हेक्टरावरील पिकांचे पंचनामे झाले आहेत. पावसाने उघडीप देताच कृषी विभागाचे अधिकारी हे बांधावर येऊन पंचनामे करीत आहे. ज्या पध्दतीने पंचनामे वेगात होत आहेत त्याचनुसार मदतही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हावी अशी अपेक्षा आहे.

पंचनाम्यावरुनही रंगली राजकीय चर्चा

नांदेड जिल्ह्यात सुरु झालेले पंचनामे कुणामुळे ? अशी चर्चाही आता गावखेड्यांमध्ये रंगू लागली आहे. दोन दिवसांपूर्वीच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माहूर तालुक्यातील पिकांची पाहणी केली होती. तर शेतकऱ्यांशीही संवाद साधला होता. त्यानंतरच या भागात पंचनाम्याला सुरवात झाली आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर असतानाच त्यांनी तीन दिवसांमध्ये पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे पंचनामे नेमके कुणामुळे सुरु झाले याची चर्चा आता रंगू लागली आहे. श्रेय कोणी का घेईना पण गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेला प्रश्न मार्गी लागत आहे.

हे सुद्धा वाचा

सोयाबीनचे सर्वाधिक नुकसान

खरीप हंगामच आर्थिकदष्ट्या शेतकऱ्यांसाठी महत्वाचा आहे. सोयाबीन हे खरीप हंगामातील मुख्य पीक आहे. या पिकावरच शेतकऱ्यांचे उत्पन्न अवलंबून असते. मात्र, गेल्या दोन वर्षापासून निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक परिणाम हा सोयाबीनवर झालेला आहे. गतवर्षी काढणीच्या वेळी तर यंदा पेरणी होताच हे पीक धोक्यात आहे. नांदेड जिल्ह्यात 3 लाख 20 हजार हेक्टरावरील पिकांचे नुकसान झाले असले तरी यामध्ये सर्वाधिक नुकसान हे सोयाबीनचे आहे.

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.