AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Onion Market : येवला बाजार समितीमध्ये लाल कांद्याचे आगमन, शेतकऱ्यांना दिलासा देणारा भाव

यंदाच्या हंगामात प्रथमच नाशिक जिल्ह्यातील येवला बाजारसमितीमध्ये प्रथमच लाल कांद्याची आवक झाली. केवळ दोनच वाहनांतून कांद्याची आवक झाली असली तरी वाहनांचे जग्गी स्वागत बाजारसमितीच्या आवारात करण्यात आले होते. लाल कांद्याला एक वेगळे महत्व आहे. पहिल्याच दिवशी दाखल झालेल्या कांद्याला तब्बल 2301 रुपये असा दर मिळाला आहे.

Onion Market : येवला बाजार समितीमध्ये लाल कांद्याचे आगमन, शेतकऱ्यांना दिलासा देणारा भाव
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: | Updated on: Nov 25, 2021 | 1:23 PM
Share

लासलगाव : यंदाच्या हंगामात प्रथमच नाशिक जिल्ह्यातील येवला बाजारसमितीमध्ये प्रथमच लाल (Onion Market) कांद्याची आवक झाली. केवळ दोनच वाहनांतून (Onion Arrivals Decrease) कांद्याची आवक झाली असली तरी वाहनांचे जग्गी स्वागत बाजारसमितीच्या आवारात करण्यात आले होते. लाल कांद्याला एक वेगळे महत्व आहे. पहिल्याच दिवशी दाखल झालेल्या कांद्याला तब्बल 2301 रुपये असा दर मिळाला आहे. आवक कमी प्रमाणात असली तरी लाल कांद्याला मिळालेला दर शेतकऱ्यांसाठी समाधानकारक आहे.

नाशिक जिल्ह्यात लासलगाव आणि नाशिक येथील बाजारपेठेतच कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होत असते. पण आता साठणूकीतला लाल कांदा अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे येवला बाजार समितीमध्ये आवक सुरु झाली आहे. खरीपातील लाल कांदा अद्यापही बाजारपेठेत दाखल झालेला नाही. शिवाय साठवणूकीतला कांदाही आता अंतमि टप्प्यात आहे त्यामुळे कांद्याचे दर पुन्हा वाढणार असा अंदाज वर्तवला जात आहे.

कांदा दर वाढीच्या अपेक्षा वाढल्या

साठवणूकीतला कांदा आता अंतिम टप्प्यात आहे. तर यंदा पावसामुळे खरीप हंगामातील कांद्याचे नुकसान झाले आहे. तर मध्यंतरीच्या अवकाळीमुळे कांद्याची काढणी लांबणीवर पडलेली आहे. त्यामुळे बाजारपेठेत कांद्याची आवक ही घटत आहे. मध्यंतरी आयात केलेला कांदा बाजारपेठेत दाखल झाला होता. त्यामुळे कांद्याचे दर हे थेट 1 हजार रुपये क्विंटलवर येऊन ठेपले होते. मात्र, पुन्हा बाजारात कांद्याची आवक ही कमी होत आहे. जिल्ह्यातील शेतकरी हे उन्हाळी कांद्याची साठवणूक करुन ठेवतात व योग्य दर मिळाताच विक्री करतात. मात्र, साठवणुकीतलाही कांदा आता अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे येवला बाजार समितीमध्ये गुरुवारी दाखल झालेल्या कांद्याला 2301 रुपये असा दर मिळालेला आहे.

खरिपातील कांदा वावरातच

खरीप हंगामातील सर्वच पिकांवर पावसाचा परिणाम झाला आहे. यामधून आता कांद्याचीही सुटका झालेली नाही. कारण चार दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे लाल कांद्याच्या काढणीची कामे आता लांबणीवर पडलेली आहेत. दिवाळी झाली की, खरिपातील लाल कांद्याची आवक सुरु होत असते पण पावसामुळे शेती व्यवसयाचे गणितच बिघडले आहे. त्यामुळे नविन कांदा बाजारात दाखल होण्यास अजूनही 15 दिवसाचा कालावधी लागणार असल्याचे सांगितले जात आहे.

आवक घटल्याने दर वाढणार

कांद्याचे दर हे एका रात्रीतून वाढतात. यंदाही वाढत्या दरामुळे केंद्र सरकारने साठवणूकीतला कांदा विक्रीसाठी काढला की, कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली होती. एवढेच नाही कांद्याची आवकही सुरु करण्यात आली होती. त्यामुळे 4 हजारवर पोहचलेला कांदा थेट 1 हजार रुपये क्विंटलवर आला होता. पण आता साठवणूकीतला उन्हाळी कांदा अंतिम टप्प्यात आहे तर खऱिपातील कांदा बाजारात येण्यासाठी बराच आवधी लागणार आहे. त्यामुळे अजून 10 दिवस तरी कांद्याचे दर हे टिकून राहतील असा विश्वास शेतकरी व्यक्त करीत आहेत.

संबंधित बातम्या :

दुग्धजन्य पदार्थामुळे का होईना दुधाचे भाव वाढले, खासगी डेअरी चालकांचा निर्णय

PROTEIN : प्रोटीनसाठी मांसाहार, सप्लिमेंटची गरज नाही, मक्याच्या नव्या वाणात 250 टक्के जास्त प्रोटीन

पपईला वेगळा पर्यांय निवडला मात्र तोही फसला, मग शेतकऱ्याने उभ्या पिकावरच नांगर फिरवला

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.