AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

e-Shram Yojana : 25 कोटी कामगारांची नोंदणी मात्र, योजनेचा लाभ नेमका कुणाला? वाचा सविस्तर

अल्पभूधारक शेतकऱ्यांपासून ते देशातील मजूरांपर्यंत केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध योजना राबवल्या जात आहेत. देशातील असंघटीत अशा कामगारांच्या हाताला काम मिळावे तसेच सरकारी योजनांचा त्यांना लाभ मिळावा म्हणून 26 ऑगस्ट 2021 रोजी ई-श्रम पोर्टल हे सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर मंत्रालयाकडून ई-श्रम कार्डही देण्यात आले आहे.

e-Shram Yojana : 25 कोटी कामगारांची नोंदणी मात्र, योजनेचा लाभ नेमका कुणाला? वाचा सविस्तर
संग्रहीत छायाचित्र
| Updated on: Feb 27, 2022 | 3:38 PM
Share

मुंबई : अल्पभूधारक शेतकऱ्यांपासून ते देशातील मजूरांपर्यंत (Central Government) केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध योजना राबवल्या जात आहेत. देशातील असंघटीत अशा (Worker) कामगारांच्या हाताला काम मिळावे तसेच सरकारी योजनांचा त्यांना लाभ मिळावा म्हणून 26 ऑगस्ट 2021 रोजी ई-श्रम पोर्टल हे सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर मंत्रालयाकडून (E-Shram Card) ई-श्रम कार्डही देण्यात आले आहे. आतापर्यंत देशातील 25 कोटी कामगारांनी या पोर्टलवर नोंदणी केलेली आहे. भारत सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या माध्यमातून ही योजना राबवली जात आहे. नाव नोंदणी म्हणजेच योजनेचा लाभ असे नाही. जे कामगार सरकारी पेन्शन किंवा पीएम किसान योजनेचा लाभ घेत आहेत. त्यांना या योजनेचा लाभ उत्तर प्रदेश सरकारने दिलेला नाही. त्यामुळे इतर राज्यांमध्ये काय भूमिका घेतली जाणार हे पहावे लागणार आहे.

कामगारांना 2 लाखापर्यंतचा मोफत विमा

ई-श्रम योजनेअंतर्गत ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करणाऱ्या असंघटित क्षेत्रातील कामगारांना दोन लाख रुपयांचा विमा मोफत दिला जात आहे. या योजनेअंतर्गत भारत सरकार देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांनाही मदत करणार आहे. परंतु, अशा शेतकऱ्यांची संख्याही खूप कमी आहे, ज्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.कामगार आणि रोजगार मंत्रालयानुसार, या योजनेअंतर्गत स्थलांतरित मजूर, घरगुती कामगार, शेतमजूर आदी असंघटित क्षेत्राशी संबंधित देशातील कोट्यवधी मजुरांना सरकारी योजनांचा लाभ मिळणार आहे. याशिवाय जे शेतकरी मजुरीचे काम करतात किंवा ज्यांच्याकडे करण्यासाठी शेत जमीन नाही, त्यांनाही या योजनेचा पूर्ण लाभ मिळणार आहे. मात्र, अत्यल्पभूधारकांना याचा लाभ मिळणार नाही.

नाव नोंदणी म्हणजेच योजनेचा लाभ असे नाही

ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकेल, असे नाही. उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने ई-श्रम योजनेअंतर्गत राज्यातील कामगारांना दरमहा 500 रुपये देण्याची घोषणा केली होती. उत्तर प्रदेश सरकारने नोंदणीकृत कामगारांना त्यांच्या बँक खात्यात ई-श्रम पोर्टलवर दोन महिन्यांचे मिळून 1 हजार पाठवले आहेत. या योजनेचा लाभ उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांना घेता येणार नाही. शिवाय जे आधीच कोणत्याही सरकारी पेन्शन योजना किंवा पीएम किसान योजनेचा लाभ घेत आहेत त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येणार नाही.तर, इतर सर्व नोंदणीकृत कामगारांना प्रत्येकी 500-500 रुपये महिना दिले जात आहेत.

संबंधित बातम्या :

Cotton : यंदा कापसाच्या उत्पादनात घट, कापसाचा वापर वाढला अन् क्षेत्र घटले..!

Sugarcane Sludge : अतिरिक्त ऊसावर तोडगा काय? ऊस उत्पादकांसाठी महत्वाची बातमी

ही कसली दुश्मनी? रात्रीतूनच केळी बागा उध्वस्त, दर वाढूनही रावेरच्या शेतकऱ्यांसमोर काय आहे समस्या?

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.