AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अवकाळीची अवकृपा : पीक नुकसानीचा अहवाल शासनाकडे, शेतकऱ्यांना आता मदतीची प्रतिक्षा

कृषी विभागाने तत्परता दाखवत वर्धा जिल्ह्यातील नुकसानीचा अहवाल अवघ्या दोनच दिवसांमध्ये तयाक करुन जिल्हा प्रशासनाकडे सादर केला होता. त्यानुसार 33 टक्केपेक्षा अधिकचे नुकसान झाले असून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून अहवाल हा शासनाकडे पाठविण्यात आला आहे. त्यामुळे आता प्रत्यक्ष मदतीकडे शेतकऱ्यांचे डोळे लागलेले आहेत.

अवकाळीची अवकृपा : पीक नुकसानीचा अहवाल शासनाकडे, शेतकऱ्यांना आता मदतीची प्रतिक्षा
जानेवारी महिन्याच्या सुरवातीला झालेल्या पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
| Edited By: | Updated on: Jan 11, 2022 | 2:52 PM
Share

वर्धा : रब्बी हंगामातही नैसर्गिक संकट कायम आहे. दर महिन्याला (Untimely rain) अवकाळी, गारपिट आणि ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे जोमात आलेली पिके थेट कोमात जात आहेत. पुन्हा शेतकऱ्यांना हजारो रुपये खर्ची करुन पिकांची जोपासणा करावी लागत आहे. यामध्ये मात्र, (Agricultural Dipartment) कृषी विभागाने तत्परता दाखवत (Wardha District) वर्धा जिल्ह्यातील नुकसानीचा अहवाल अवघ्या दोनच दिवसांमध्ये तयाक करुन जिल्हा प्रशासनाकडे सादर केला होता. त्यानुसार 33 टक्केपेक्षा अधिकचे नुकसान झाले असून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून अहवाल हा शासनाकडे पाठविण्यात आला आहे. त्यामुळे आता प्रत्यक्ष मदतीकडे शेतकऱ्यांचे डोळे लागलेले आहेत.

वर्धा जिल्ह्यात 3 हजार 54 हेक्टरावरील पीक बाधित

जिल्ह्यात 8 आणि 9 जानेवारी रोजीला झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचे सुमारे 3 हजार 54 हेक्टरवर नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने नुकसानीचा अहवाल शासनाकडे पाठविल्याची माहिती असून ३३ टक्क्यांच्यावर नुकसान झाल्याचे अंतिम अहवालात दाखविण्यात आलेले आहे. जिल्ह्यात 1 जानेवारी रोजीपासूनच पावसाळी वातावरण बनलेले होते. त्यातच दोन दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस, गारपीट झाली. यात आर्वी, आष्टी, कारंजा तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

खरीपासह रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान

आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला असून 1 हजार 765 हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच आर्वी तालुक्यात 562 हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले असून कारंजा तालुक्यात 727 हेक्टरवर पिकांचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाने सादर केलेल्या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. यामध्ये गव्हाचे 289 हेक्टरवर नुकसान झाले असून हरभरा 1 हजार 196 हेक्टर, कापूस 84 हेक्टर, तूर 759 हेक्टर, उस 3 हेक्टर, फळपिके 666 हेक्टर, इतर पिकांचे 57 हेक्टरवर नुकसान झाले आहे. खरीप हंगामातील कापूस अंतिम टप्प्यात होता तर रब्बी हंगामातील गहू, हरभरा ही पिके जोमात असतानाच नुकसान झाले आहे.

पावसाने फळपिकाचा दर्जाही खालावला

अवकाळी आणि गारपिटमुळे केवळ रब्बी आणि खरीप हंगामातील पिकांचेच नुकसान झाले नाही तर फळबागांवरही याचा विपरीत परिणाम झालेला आहे. जिल्ह्यात तब्बल 666 हेक्टरावरील फळबागांना फटका बसलेला आहे. यामध्ये आंबा, काजू यासारख्या फळांचा समावेश आहे. पावसामुळे ही फळे डागाळली जाणार आहेत. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी झालेली अवकाळी ही सर्वच पिकांसाठी नुकसानीची ठरलेली आहे. आता नुकसानीचा अहवाल तर सादर करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना प्रतिक्षा आहे मदतीची.

संबंधित बातम्या :

Cotton Production : शेवटी बाकी शून्यच ? कापसाला विक्रमी दर मात्र, उत्पादनात निम्म्यानेच घट

Sesame Prices : संक्रातीच्या सणातही तीळाच्या दरात तेजीच, काय आहेत कारणे?

हमीभाव केंद्र 10 दिवसापुरतेच, आधारभूत किंमतीपेक्षा खुल्या बाजारपेठेत अधिकचा भाव, कसे बदलले तूरीचे दर?

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.