पीएम किसान योजनेत महत्वपूर्ण बदल, ‘या’ कागदपत्राशिवाय मिळणार नाही आता लाभ

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पीएम किसान योजनेचा 10 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला आहे. यापूर्वी पीएम किसान योजनेत अनेकांनी पात्र नसतानाही लाभ घेतलेला आहे. त्यामुळे आता नियमात बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे आता आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केल्याशिवाय पीएम किसान योजनेचा 11 वा हप्ता मिळणार नाही.

पीएम किसान योजनेत महत्वपूर्ण बदल, 'या' कागदपत्राशिवाय मिळणार नाही आता लाभ
पंतप्रधान किसान सन्मान योजना
Follow us
| Updated on: Jan 26, 2022 | 7:00 AM

मुंबई : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पीएम किसान योजनेचा 10 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला आहे. यापूर्वी (PM kisan Yojna) पीएम किसान योजनेत अनेकांनी पात्र नसतानाही लाभ घेतलेला आहे. त्यामुळे आता नियमात बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे आता आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केल्याशिवाय पीएम किसान योजनेचा 11 वा हप्ता मिळणार नाही. पीएम किसान योजनेबाबत दस्तऐवजात हा बदल फसव्या कारवायांना आळा घालण्यासाठी (Central Government) सरकारने दस्तऐवज नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. या बदलांतर्गत, केवळ त्या (Farmer) शेतकऱ्यांनाच पीएम किसानचा लाभ मिळणार आहे, जे या योजनेअंतर्गत पात्र आहेत. या दस्तऐवजात बदल होण्यापूर्वी, ज्यांचे अर्ज एकतर बनावट होते किंवा पात्र नव्हते, असे अनेक लोक या योजनेचा लाभ घेत होते. कागदपत्राबाबत पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर माहिती देण्यात आली आहे.

असा झाला नव्याने बदल

पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, नवीन नियमानुसार, सरकारने आता या योजनेत रेशन कार्ड देणे अनिवार्य केले आहे. या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना आता त्यांचा राशन कार्ड क्रमांक, आधार कार्डची सॉफ्ट कॉपी, बँक पासबुक आणि घोषणापत्र सादर करावे लागणार आहेत. या कागदपत्रांशिवाय शेतकरी योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. शिवाय आता KYC ही अदा करावी लागणार आहे.

अपात्र शेतकऱ्यांकडून पैसे परत

शेतकऱ्यांच्या हीतासाठी पीएम किसान योजना ही सुरु करण्यात आलेली आहे. मात्र, योजनेच्या सुरवातीला अनेकजण पात्र नसतानाही योजनेचा लाभ घेतला होता. महाराष्ट्रातही अनाधिकृतपणे अनेकांनी पैसा घेतलेले आहेत. तर उत्तर प्रदेशमध्ये 7 लाख शेतकरी असे आहेत जे या योजनेत पात्र नाहीत. आता त्यांना पीएम किसान सन्मान निधीच्या 10 व्या हप्त्याचे पैसे परत करावे लागणार आहेत. कारण हे शेतकरी या योजनेत अपात्र आढळले आहेत. त्यामुळे अटी व शर्तीनुसार ही रक्कम या शेतकऱ्यांना परत करावी लागणार आहे. पीएम किसान योजनेंतर्गत, प्रत्येकी 2 हाजर रुपयांच्या तीन मासिक हप्त्यांमध्ये दरवर्षी 6 हजार रुपये थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात.

यंदाच्या वर्षात असा होणार हप्ता जारी

पहिला हप्ता – एप्रिल-जुलै

दुसरा हप्ता – ऑगस्ट-नोव्हेंबर

तिसरा हप्ता- डिसेंबर-मार्च

यादीत नाव आहे की नाही हे कसे तपासायचे?

सर्व प्रथम pmkisan.gov.in वेबसाइटवर लॉग इन करा.

उजव्या बाजूला तुम्हाला फार्मर्स कॉर्नर दिसेल.

त्यानंतर Farmers Corner वर क्लिक करा.

आता पर्यायातून Beneficiary Statusवर क्लिक करा.

यानंतर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक, बँक खाते आणि तुमचा मोबाईल नंबर यासारखी काही माहिती द्यावी लागेल.

वरील प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर जर तुमचे नाव यादीत असेल, तर तुम्हाला तुमचे नाव तिथे दिसेल.

संबंधित बातम्या :

Cabbage : केशरी रंगाचा कोबी ; 10 हजाराचा खर्च अन् 80 हजाराचे उत्पादन, उत्पन्न वाढीचा उत्तम मार्ग

सोयाबीनच्या दराचा परिणाम आवकवर, शेतकऱ्यांचा निर्णय फायद्याचा का नुकसानीचा?

Budget 2022 : कृषी क्षेत्राच्या नजरेतून अर्थसंकल्प ; सरकारच्या भूमिकेवरच सर्वकाही अवलंबून..!

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.