AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nanded : नांदेडमध्ये जनावरांचे सहा गोठे आगीच्या भक्ष्यस्थानी, शेतकऱ्यांच्या काळजाचं पाणी-पाणी, आता रोजीरोटीचा प्रश्न

शेतकऱ्यांवरील संकटाची मालिका काही संपता संपत नाही. कधी अस्मानी तर कधी सुल्तानी संकटाचा सामना हा सुरुच आहे. रब्बी हंगामानंतर सर्वकाही सुरळीत असताना अचानक जिल्ह्यातील सतिगुडा येथील आदिवासींच्या पाड्यावर आगीची घटना घडली. यामध्ये जनावरांच्या गोठ्यांची राखरांगोळी झाली आहे. आता कुठे नैसर्गिक संकटातून शेतकरी सावरत असताना अशा घटनांमुळे नुकसानीचा सामना करावा लागत आहे.

Nanded : नांदेडमध्ये जनावरांचे सहा गोठे आगीच्या भक्ष्यस्थानी, शेतकऱ्यांच्या काळजाचं पाणी-पाणी, आता रोजीरोटीचा प्रश्न
नांदेड जिल्ह्यातील जनावरांचे गोठे आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले आहेत. यामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.Image Credit source: TV9 Marathi
Reporter Rajiv Giri
Reporter Rajiv Giri | Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Apr 12, 2022 | 10:47 AM
Share

नांदेड : शेतकऱ्यांवरील संकटाची मालिका काही संपता संपत नाही. कधी अस्मानी तर कधी सुल्तानी संकटाचा सामना हा सुरुच आहे. रब्बी हंगामानंतर सर्वकाही सुरळीत असताना अचानक (Nanded) जिल्ह्यातील सतिगुडा येथील आदिवासींच्या पाड्यावर आगीची घटना घडली. यामध्ये (Cattel Shed) जनावरांच्या गोठ्यांची राखरांगोळी झाली आहे. आता कुठे (Natural Hazards) नैसर्गिक संकटातून शेतकरी सावरत असताना अशा घटनांमुळे नुकसानीचा सामना करावा लागत आहे. यामुळे भर उन्हाळ्यात जनावरांच्या निवाऱ्याचा तर प्रश्न आहेच पण चार महिने शेतात राबून पिकवलेले धान्य आणि ज्वारीचा कडबाही आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला आहे. वातावरणातील बदलामुळे पीक वावरात उभे असताना धास्ती तर काढणीनंतर असे संकट यामुळे शेतकऱ्यांचे जीवनच बेभरवश्याचे होत आहे.

शेतकऱ्याच्या रोजीरोटीचा प्रश्न

सतिगुडा या आदिवासी पाड्यावरील आगीच्या घटनेत कोणती जिवीतहानी झाली नसली तर येथील सहा शेतकऱ्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण नुकतीच रब्बी हंगामातील ज्वारीची काढणी करुन मळणी प्रक्रिया पार पडली होती. यानंतर शेतकऱ्यांनी गोठ्यातच या धान्याची साठवणूक केली होती. चार महिने मेहनत, काढणी आणि मोडणीची कामे करुन पदरी काय तर केवळ निराशाच अशीच स्थिती येथील शेतकऱ्यांवर ओढावली आहे. योग्य नियोजन करुन शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात उत्पादन वाढवले मात्र, अवघ्या काही क्षणात शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोरच या धान्याची राखरांगोळी झाली यापेक्षा दुर्देव ते काय..

जनावरांचा निवारही गेला अन् चाराही

आदिवासी पाड्यावरील या घटनेत एक-दोन नव्हे तर सहा गोठे जळून खाक झाले आहेत. सुदैवाने यामध्ये जनावरे बांधलेली नव्हती. या घटनेत गोठ्याचे तर नुकसान झालेत पण इतर शेती साहित्याचीही होळी झाली आहे. गोठ्याला लागूनच शेतकऱ्यांनी कडब्याच्या गंजी लावल्या होत्या. रखरखते ऊन आणि वाऱ्यामुळे या आगीने लगतच्या गंजीही कवेत घेतल्या. त्यामुळे आता जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

चार महिने राबून उत्पादन तर नाहीच पण नुकसान अधिक

ज्वारी पेरणीपासून काढणीसाठी चार महिन्याचा कालावधी लागतो. मशागत, पाण्याचे नियोजन एवढे सर्व करुन पुन्हा काढणी, मोडणी आणि मळणीचे काम करुन ज्वारीचे उत्पन्न शेतकऱ्यांच्या पदरी पडते. मात्र, पदरी पडलेले उत्पादन कसे हिरावून घेतले जाते याचे उत्तम उदाहरण समोर आले आहे. या पाड्यावरील शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगाम झालाच नाही असे चित्र आहे.

संबंधित बातम्या :

Nanded : पीक विम्याचा प्रश्न चिघळला, कृषिमंत्र्यांचे भाकीत अखेर खरे ठरले, नांदेडमध्ये असे काय घडले?

Solapur : अतिरिक्त उसामुळे नव्हे तर थकीत बिलासाठी शेतकरी आक्रमक, शेतकऱ्यांकडून गोकूळ शुगरचे गाळपच बंद

Vegetable Market: इंधन दरवाढीमुळे भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले, वाढत्या उन्हामुळे लिंबाचं मार्केट वाढलं

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली