AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nanded : नांदेडमध्ये जनावरांचे सहा गोठे आगीच्या भक्ष्यस्थानी, शेतकऱ्यांच्या काळजाचं पाणी-पाणी, आता रोजीरोटीचा प्रश्न

शेतकऱ्यांवरील संकटाची मालिका काही संपता संपत नाही. कधी अस्मानी तर कधी सुल्तानी संकटाचा सामना हा सुरुच आहे. रब्बी हंगामानंतर सर्वकाही सुरळीत असताना अचानक जिल्ह्यातील सतिगुडा येथील आदिवासींच्या पाड्यावर आगीची घटना घडली. यामध्ये जनावरांच्या गोठ्यांची राखरांगोळी झाली आहे. आता कुठे नैसर्गिक संकटातून शेतकरी सावरत असताना अशा घटनांमुळे नुकसानीचा सामना करावा लागत आहे.

Nanded : नांदेडमध्ये जनावरांचे सहा गोठे आगीच्या भक्ष्यस्थानी, शेतकऱ्यांच्या काळजाचं पाणी-पाणी, आता रोजीरोटीचा प्रश्न
नांदेड जिल्ह्यातील जनावरांचे गोठे आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले आहेत. यामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.Image Credit source: TV9 Marathi
Reporter Rajiv Giri
Reporter Rajiv Giri | Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Apr 12, 2022 | 10:47 AM
Share

नांदेड : शेतकऱ्यांवरील संकटाची मालिका काही संपता संपत नाही. कधी अस्मानी तर कधी सुल्तानी संकटाचा सामना हा सुरुच आहे. रब्बी हंगामानंतर सर्वकाही सुरळीत असताना अचानक (Nanded) जिल्ह्यातील सतिगुडा येथील आदिवासींच्या पाड्यावर आगीची घटना घडली. यामध्ये (Cattel Shed) जनावरांच्या गोठ्यांची राखरांगोळी झाली आहे. आता कुठे (Natural Hazards) नैसर्गिक संकटातून शेतकरी सावरत असताना अशा घटनांमुळे नुकसानीचा सामना करावा लागत आहे. यामुळे भर उन्हाळ्यात जनावरांच्या निवाऱ्याचा तर प्रश्न आहेच पण चार महिने शेतात राबून पिकवलेले धान्य आणि ज्वारीचा कडबाही आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला आहे. वातावरणातील बदलामुळे पीक वावरात उभे असताना धास्ती तर काढणीनंतर असे संकट यामुळे शेतकऱ्यांचे जीवनच बेभरवश्याचे होत आहे.

शेतकऱ्याच्या रोजीरोटीचा प्रश्न

सतिगुडा या आदिवासी पाड्यावरील आगीच्या घटनेत कोणती जिवीतहानी झाली नसली तर येथील सहा शेतकऱ्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण नुकतीच रब्बी हंगामातील ज्वारीची काढणी करुन मळणी प्रक्रिया पार पडली होती. यानंतर शेतकऱ्यांनी गोठ्यातच या धान्याची साठवणूक केली होती. चार महिने मेहनत, काढणी आणि मोडणीची कामे करुन पदरी काय तर केवळ निराशाच अशीच स्थिती येथील शेतकऱ्यांवर ओढावली आहे. योग्य नियोजन करुन शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात उत्पादन वाढवले मात्र, अवघ्या काही क्षणात शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोरच या धान्याची राखरांगोळी झाली यापेक्षा दुर्देव ते काय..

जनावरांचा निवारही गेला अन् चाराही

आदिवासी पाड्यावरील या घटनेत एक-दोन नव्हे तर सहा गोठे जळून खाक झाले आहेत. सुदैवाने यामध्ये जनावरे बांधलेली नव्हती. या घटनेत गोठ्याचे तर नुकसान झालेत पण इतर शेती साहित्याचीही होळी झाली आहे. गोठ्याला लागूनच शेतकऱ्यांनी कडब्याच्या गंजी लावल्या होत्या. रखरखते ऊन आणि वाऱ्यामुळे या आगीने लगतच्या गंजीही कवेत घेतल्या. त्यामुळे आता जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

चार महिने राबून उत्पादन तर नाहीच पण नुकसान अधिक

ज्वारी पेरणीपासून काढणीसाठी चार महिन्याचा कालावधी लागतो. मशागत, पाण्याचे नियोजन एवढे सर्व करुन पुन्हा काढणी, मोडणी आणि मळणीचे काम करुन ज्वारीचे उत्पन्न शेतकऱ्यांच्या पदरी पडते. मात्र, पदरी पडलेले उत्पादन कसे हिरावून घेतले जाते याचे उत्तम उदाहरण समोर आले आहे. या पाड्यावरील शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगाम झालाच नाही असे चित्र आहे.

संबंधित बातम्या :

Nanded : पीक विम्याचा प्रश्न चिघळला, कृषिमंत्र्यांचे भाकीत अखेर खरे ठरले, नांदेडमध्ये असे काय घडले?

Solapur : अतिरिक्त उसामुळे नव्हे तर थकीत बिलासाठी शेतकरी आक्रमक, शेतकऱ्यांकडून गोकूळ शुगरचे गाळपच बंद

Vegetable Market: इंधन दरवाढीमुळे भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले, वाढत्या उन्हामुळे लिंबाचं मार्केट वाढलं

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
नीट पेपरफुटीत सरकारचे मोठे पाऊल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा, थेट मोठे आदेश...

नीट पेपरफुटीत सरकारचे मोठे पाऊल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा, थेट मोठे आदेश..

पोलीस आंदोलकांना वॅन मध्ये भरुन घेऊन जात होते, पण एकाने गेट उघडला आणि..व्हिडिओ तुफान व्हायरल, चेंबूरमधील घटना.

पोलीस आंदोलकांना वॅन मध्ये भरुन घेऊन जात होते, पण एकाने गेट उघडला आणि..व्हिडिओ तुफान व्हायरल, चेंबूरमधील घटना

Maharashtra Rains, Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, या जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर, 16 गावांचा संपर्क तुटला, 48 तास धोक्याची...

Maharashtra Rains, Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, या जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर, 16 गावांचा संपर्क तुटला, 48 तास धोक्याची..

Dharmendra Pradhan: इथे राजीनाम्यासाठी आंदोलनं पेटली असताना तिथे धर्मेंद्र प्रधान ‘या’ कामात व्यस्त.

Dharmendra Pradhan: इथे राजीनाम्यासाठी आंदोलनं पेटली असताना तिथे धर्मेंद्र प्रधान ‘या’ कामात व्यस्त

CJP Protest: धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार नाही पण… मोदी सरकारच्या मनात काय? मोठी अपडेट.

CJP Protest: धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार नाही पण… मोदी सरकारच्या मनात काय? मोठी अपडेट

Sharad Pawar : आधी जंतरमंतरवर विद्यार्थ्यांशी संवाद, नंतर पंतप्रधानांची भेट; शरद पवारांच्या दुहेरी चालीने विरोधकही धास्तावले?.

Sharad Pawar : आधी जंतरमंतरवर विद्यार्थ्यांशी संवाद, नंतर पंतप्रधानांची भेट; शरद पवारांच्या दुहेरी चालीने विरोधकही धास्तावले?