AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Fertilizer Rate: …म्हणून भारतामध्ये सर्वाधिक खताचे दर, काय आहेत कारणे..?

हंगाम कोणताही असो खत टंचाई ही ठरलेलीच आहे. यंदा तर रब्बी हंगामाच्या सुरवातीपासूनच खतासाठी ओरड सुरु झाली आहे. मागणीच्या तुलनेत होत असलेला पुरवठा हा नगण्य असल्यामुळे सरकारही हतबल होत आहे. खत निर्मितीसाठी आवश्यक असलेल्य कच्च्या मालाच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे.

Fertilizer Rate: ...म्हणून भारतामध्ये सर्वाधिक खताचे दर, काय आहेत कारणे..?
रशिया-युक्रेन युध्दामुळे भारतामध्ये होणाऱ्या खत आय़ातीवर परिणाम होणार आहे.
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: Feb 08, 2022 | 1:23 PM
Share

पुणे : हंगाम कोणताही असो खत टंचाई ही ठरलेलीच आहे. यंदा तर (Rabbi Season) रब्बी हंगामाच्या सुरवातीपासूनच (Fertilizer) खतासाठी ओरड सुरु झाली आहे. मागणीच्या तुलनेत होत असलेला पुरवठा हा नगण्य असल्यामुळे सरकारही हतबल होत आहे. खत निर्मितीसाठी आवश्यक असलेल्य कच्च्या मालाच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे. शिवाय दिवसेंदिवस मागणी वाढत आहे. भारत देशाला याची मोठी झळ बसत आहे कारण देशामध्ये (Fertilizer Production) खताचे उत्पादन होत नाही तर सर्वकाही आयातीवरच अवलंबून आहे. त्यामुळे खताची आयात प्रक्रिया ही महागडी होत आहे. शिवाय खत निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या पोटॅशची मोठी टंचाई निर्माण होत आहे. एकीकडे नैसर्गिक शेतीचे दाखले दिले जात असले तरी दुसरीकडे रासायनिक खतांची वाढती मागणी वाढत असलेले दर ही चिंतेची बाब आहे. शिवाय देशातील खतांचे चित्र सर्वकाही आयातीवरच अवलंबून आहे.

सर्वकाही आयातवरच अवलंबून

कच्च्या मालाची कमतरता आणि वाढत असलेली मागणी यामध्ये मोठी तफावत आहे. त्यामुळे खतांच्या किमतीमध्ये गतवर्षीच्या तुलनेत दुपटीने वाढ झालेली आहे. खताची गरज भागवण्यासाठी सर्वकाही आयातीवरच अवलंबून रहावे लागत आहे. देशात वर्षानिहाय खताचा वापर वाढत आहे. भारतामध्ये गेल्या 9 महिन्यांमध्ये 587 लाख टन खताची मागणी झाली आहे. तर प्रत्यक्ष आयात ही 203 लाख टन एवढी झाली आहे. म्हणजेच या 9 महिन्याच्या कालावधीतच वर्षाला लागणाऱ्या खताची मागणी झाली आहे. त्यामुळे 20 लाख टन खताची मागणी ही वाढलेली आहे. खतासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या दरात वाढ होत असल्याने शेतकऱ्यांना प्रतिकूल परस्थितीमध्ये अधिकच्या दराने खत खरेदी करावे लागत आहे.

आवश्यक असलेल्या पोटॅशची मोठी टंचाई

देशात सर्वाधिक डीएपी खताचा वापर होतो. तब्बल 12o लाख टनाच्या दरम्यान याची मागणी असते. यापैकी 60 टक्के गरज ही आयातीतून पूर्ण केली जाते. तर आयाती पैकी 40 टक्के खत हे चीनमध्ये आयात केले जाते. युरियाचा वापरही डीएपी प्रमाणेच वाढत आहे. त्यामुळे 30 टक्के गरज ही आय़ातीमधून भागवण्याची नामुष्की देशावर ओढावत आहे. मागणीच्या तुलनेच पोटॅशचा पुरवठा कमी असल्याने देशात मोठा तुटव़डा जाणवत आहे.

कृत्रिम टंचाईचाही शेतकऱ्यांना फटका

एकीकडे खताच्या दरात वाढ होत असली तरी स्थानिक पातळी कृत्रिम टंचाई निर्माण करुन अधिकच्या दराने खताची विक्री होत आहे. शेतकऱ्यांना वाढीव दराचा थेट फटका बसू नये म्हणून सरकारने अनुदान दिले. मात्र, युरिया वगळता इतर खतांच्या दरातील वाढ आणि टंचाईही कायमच आहे.

संबंधित बातमी:

Sugarcane Sludge: राज्यात ऊस गाळप अंतिम टप्प्यात, साखर आयुक्तांच्या काय आहेत सूचना? वाचा सविस्तर

Strawberry : चिखलदऱ्याची स्ट्रॉबेरी, मस्त अन् स्वस्तही, पिकतं तिथंच विकतं, शेतकऱ्यांचं कष्टही कमी होतं?

पीएम किसान योजनेतील निधीचा ‘असा’ हा उपयोग, अमरावतीमध्ये 22 कोटी 75 लाखांचा 10 हप्ता

Follow Us
नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
Nagpur :  नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
Pune Adivasi Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
Pune Adivasi Students Protest | पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
मराठा आरक्षणावर 12 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय!
मराठा आरक्षणावर 12 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय!
मुंबई उच्च न्यायालयाने अन्न व औषध प्रशासनाला फटकारले...
'तुम्ही स्वतःला देव समजता का?' मुंबई उच्च न्यायालयाचा तुकाराम मुंडेंच्या अन्न व औषध प्रशासनाला सवाल
'नमो सहकार टॅक्सी'अंतर्गत मुंबै बँकेमार्फत टॅक्सी खरेदीसाठी 95% कर्ज
प्रवीण दरेकर यांची मोठी घोषणा; नमो सहकार टॅक्सी अंतर्गत मुंबै बँकेमार्फत टॅक्सी खरेदीसाठी 95 टक्के कर्ज...
मुंबईत मोठ्या गणेश मंडळांच्या बाप्पांचे जल्लोषात आगमन!
मुंबईत मोठ्या गणेश मंडळांच्या बाप्पांचे जल्लोषात आगमन; गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात!
विठ्ठलवाडी आगाराच्या बस चालकाची दादागिरी; थेट ॲम्ब्युलन्सच अडवली...
कल्याणमध्ये विठ्ठलवाडी आगाराच्या बस चालकाची दादागिरी; ॲम्ब्युलन्स अडवली, नागरिकांचा संताप...
अस्वच्छतेमुळे सिंधुदुर्ग रुग्णालयाचे उपहारगृह बंद; परवाना निलंबित
सिंधुदुर्ग शासकीय रुग्णालयाच्या उपहारगृहात मिसळमध्ये आढळले झुरळ; एफडीएची कारवाई
नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली
नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली. २९ जणांना लुटमारीचा प्रयत्न करताना अटक