AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Fertilizer Rate: …म्हणून भारतामध्ये सर्वाधिक खताचे दर, काय आहेत कारणे..?

हंगाम कोणताही असो खत टंचाई ही ठरलेलीच आहे. यंदा तर रब्बी हंगामाच्या सुरवातीपासूनच खतासाठी ओरड सुरु झाली आहे. मागणीच्या तुलनेत होत असलेला पुरवठा हा नगण्य असल्यामुळे सरकारही हतबल होत आहे. खत निर्मितीसाठी आवश्यक असलेल्य कच्च्या मालाच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे.

Fertilizer Rate: ...म्हणून भारतामध्ये सर्वाधिक खताचे दर, काय आहेत कारणे..?
रशिया-युक्रेन युध्दामुळे भारतामध्ये होणाऱ्या खत आय़ातीवर परिणाम होणार आहे.
| Updated on: Feb 08, 2022 | 1:23 PM
Share

पुणे : हंगाम कोणताही असो खत टंचाई ही ठरलेलीच आहे. यंदा तर (Rabbi Season) रब्बी हंगामाच्या सुरवातीपासूनच (Fertilizer) खतासाठी ओरड सुरु झाली आहे. मागणीच्या तुलनेत होत असलेला पुरवठा हा नगण्य असल्यामुळे सरकारही हतबल होत आहे. खत निर्मितीसाठी आवश्यक असलेल्य कच्च्या मालाच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे. शिवाय दिवसेंदिवस मागणी वाढत आहे. भारत देशाला याची मोठी झळ बसत आहे कारण देशामध्ये (Fertilizer Production) खताचे उत्पादन होत नाही तर सर्वकाही आयातीवरच अवलंबून आहे. त्यामुळे खताची आयात प्रक्रिया ही महागडी होत आहे. शिवाय खत निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या पोटॅशची मोठी टंचाई निर्माण होत आहे. एकीकडे नैसर्गिक शेतीचे दाखले दिले जात असले तरी दुसरीकडे रासायनिक खतांची वाढती मागणी वाढत असलेले दर ही चिंतेची बाब आहे. शिवाय देशातील खतांचे चित्र सर्वकाही आयातीवरच अवलंबून आहे.

सर्वकाही आयातवरच अवलंबून

कच्च्या मालाची कमतरता आणि वाढत असलेली मागणी यामध्ये मोठी तफावत आहे. त्यामुळे खतांच्या किमतीमध्ये गतवर्षीच्या तुलनेत दुपटीने वाढ झालेली आहे. खताची गरज भागवण्यासाठी सर्वकाही आयातीवरच अवलंबून रहावे लागत आहे. देशात वर्षानिहाय खताचा वापर वाढत आहे. भारतामध्ये गेल्या 9 महिन्यांमध्ये 587 लाख टन खताची मागणी झाली आहे. तर प्रत्यक्ष आयात ही 203 लाख टन एवढी झाली आहे. म्हणजेच या 9 महिन्याच्या कालावधीतच वर्षाला लागणाऱ्या खताची मागणी झाली आहे. त्यामुळे 20 लाख टन खताची मागणी ही वाढलेली आहे. खतासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या दरात वाढ होत असल्याने शेतकऱ्यांना प्रतिकूल परस्थितीमध्ये अधिकच्या दराने खत खरेदी करावे लागत आहे.

आवश्यक असलेल्या पोटॅशची मोठी टंचाई

देशात सर्वाधिक डीएपी खताचा वापर होतो. तब्बल 12o लाख टनाच्या दरम्यान याची मागणी असते. यापैकी 60 टक्के गरज ही आयातीतून पूर्ण केली जाते. तर आयाती पैकी 40 टक्के खत हे चीनमध्ये आयात केले जाते. युरियाचा वापरही डीएपी प्रमाणेच वाढत आहे. त्यामुळे 30 टक्के गरज ही आय़ातीमधून भागवण्याची नामुष्की देशावर ओढावत आहे. मागणीच्या तुलनेच पोटॅशचा पुरवठा कमी असल्याने देशात मोठा तुटव़डा जाणवत आहे.

कृत्रिम टंचाईचाही शेतकऱ्यांना फटका

एकीकडे खताच्या दरात वाढ होत असली तरी स्थानिक पातळी कृत्रिम टंचाई निर्माण करुन अधिकच्या दराने खताची विक्री होत आहे. शेतकऱ्यांना वाढीव दराचा थेट फटका बसू नये म्हणून सरकारने अनुदान दिले. मात्र, युरिया वगळता इतर खतांच्या दरातील वाढ आणि टंचाईही कायमच आहे.

संबंधित बातमी:

Sugarcane Sludge: राज्यात ऊस गाळप अंतिम टप्प्यात, साखर आयुक्तांच्या काय आहेत सूचना? वाचा सविस्तर

Strawberry : चिखलदऱ्याची स्ट्रॉबेरी, मस्त अन् स्वस्तही, पिकतं तिथंच विकतं, शेतकऱ्यांचं कष्टही कमी होतं?

पीएम किसान योजनेतील निधीचा ‘असा’ हा उपयोग, अमरावतीमध्ये 22 कोटी 75 लाखांचा 10 हप्ता

अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण
अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण.
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान.
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!.
रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक...
रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक....
अजितदादांचा मृतदेह...रोहित पवारांचा खळबळजनक दावा, दिल्लीत मोठं विधान!
अजितदादांचा मृतदेह...रोहित पवारांचा खळबळजनक दावा, दिल्लीत मोठं विधान!.
बाळासाहेबांना अपेक्षित प्रशासन चालवू, भाजपचा महापौर होताच....
बाळासाहेबांना अपेक्षित प्रशासन चालवू, भाजपचा महापौर होताच.....
तो पूर्व विदर्भातील नेता कोण? नाव जाहीर करा... संजय राऊत यांचं आवाहन
तो पूर्व विदर्भातील नेता कोण? नाव जाहीर करा... संजय राऊत यांचं आवाहन.
मुंबई महापालिकेत महापौर राज सुरू; रितू तावडे महापौर तर...
मुंबई महापालिकेत महापौर राज सुरू; रितू तावडे महापौर तर....
रितू तावडे यांनी सांगितला मास्टर प्लान, मुंबईतून या लोकांना...
रितू तावडे यांनी सांगितला मास्टर प्लान, मुंबईतून या लोकांना....
तो फोन, विदर्भातील नेता आणि... रोहित पवारांनी मांडल्या तीन मोठ्या शंका
तो फोन, विदर्भातील नेता आणि... रोहित पवारांनी मांडल्या तीन मोठ्या शंका.