AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खरिपातील सोयाबीनचा असा झाला उपयोग, शेतकऱ्यांना मिळाले नाही उत्पन्न पण मार्गी लागला जनावरांच्या..

खरिपातील असे एक पीक आहे ज्याच्या उत्पादनातून फायदा झाला नाही पण आता चारा म्हणून होत आहे. होय, खरिपातील मुख्य पीक असलेल्या सोयाबीनच्या बुस्कटाचा वापर आता चारा म्हणून वाढत आहे. सोयाबीनची मळणी केल्यानंतर जे बुस्कट मशिनद्वारे बाहेर फकले जाते त्याचाच आधार शेतकरी चारा म्हणून करीत आहेत.

खरिपातील सोयाबीनचा असा झाला उपयोग, शेतकऱ्यांना मिळाले नाही उत्पन्न पण मार्गी लागला जनावरांच्या..
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: | Updated on: Jan 10, 2022 | 1:21 PM
Share

लातूर : खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे केवळ पिकांचेच नुकसना झाले असे नाही तर चारा पीकही पाण्यातच होते. त्यामुळे भर हिवाळ्यात आता (Cattle feed) वैरणीचा टंचाई निर्माण झाली आहे. पण (Kharif Season) खरिपातील असे एक पीक आहे ज्याच्या उत्पादनातून फायदा झाला नाही पण आता चारा म्हणून होत आहे. होय, खरिपातील मुख्य पीक असलेल्या (Soybean crop) सोयाबीनच्या बुस्कटाचा वापर आता चारा म्हणून वाढत आहे. सोयाबीनची मळणी केल्यानंतर जे बुस्कट मशिनद्वारे बाहेर फकले जाते त्याचाच आधार शेतकरी चारा म्हणून करीत आहेत. सोयाबीनमधून भरीव उत्पन्न मिळाले नसले तरी चारा म्हणून का होईना त्याचा वापर होऊ लागला आहे.

40 रुपयांना बुस्कटाचा कट्टा

सोयाबीनची मळणी होत असताना जे बुस्कट बाहेर पडते त्यावर जनावरांची गुजरान होत असते. मात्र, यंदा खरीप हंगामापासून अवकाळी आणि अतिवृष्टीचे संकट कायम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हे बुस्कटाची साठवणूक केली होती. आता ऐन गरजेच्या प्रसंगी हे बुस्कटच जनावरांना चारा म्हणून वापरले जात आहे. सध्या सोयाबीन बुस्कटाच्या 1 कट्ट्यासाठी 40 रुपये मोजावे लागत आहेत. दरही नियंत्रणात असल्यामुळे ज्या शेतकऱ्याकडे अधिकची दुभती जनावरे आहेत त्यांच्यासाठी या बुस्कटाची देखील खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहे. पावसात न भिजलेले बुस्कट जनावरेही मोठ्या चवीने खातात शिवाय यामुळे दूध उत्पादनातही वाढ होते.

रब्बीतील चारा पिकेही धोक्यात

जनावरांसाठी चारा म्हणून ज्वारीचा पेरा केला जातो. मात्र, यंदा शेतकऱ्यांनी नगदी पिकांवरच भर दिला आहे. रब्बी हंगामातील सर्वात मुख्य पीक असलेल्या ज्वारीचा सर्वात कमी पेरा मराठवाड्यात झाला आहे. शिवाय अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे ज्वारीची पडझड झाली आहे. आता पावसळ्याशिवाय चाराच उपलब्ध होणार नाही म्हणून शेतकरी सोयाबीनचे बुस्कट घेऊन त्याची साठणूक करीत आहेत.

बुस्कटापासून कंपोस्ट खत निर्मिती

काही दिवसांपूर्वीच सोयाबीन मळणीची कामे पार पडलेली आहेत. त्यामुळे शेतशिवारात आजही बुस्कटाचे ढिगारे पाहवयास मिळतात. आता हे ढिगारे एक तर चारा म्हणून जनावरांच्या दावणीला जाणार किंवा मशरूम उगवण्यासाठी तर काही ठिकाणी भट्टीमध्ये जाळण्यासाठी सोयाबीन कुटार वापरात आणले जाते. याकरिता एका ट्रॅक्टरला तीनशे ते पाचशे रुपये मिळतात तर काही शेतकरी हा कुटार पेटवून देतात. ज्यामुळे संपर्कात आलेली जमीन निर्जीव होते.

संबंधित बातम्या :

कापूस दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना का व्यापाऱ्यांना? साठवणूक केली मात्र विक्रीचे टायमिंग चुकले..!

Orange fruit: नागपूरी संत्रीची फळगळ रोखण्यासाठी कृषी विभागाचा काय आहे ‘मेगा प्लॅन’, वाचा सविस्तर

Grape : द्राक्ष बागांमध्येच कशामुळे पेटत आहेत शेकोट्या ? लागवडीपासून तोडणीपर्यंत जीवघेणी कसरत

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.