AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्यांनो केवळ तक्रारी करा, थकीत ‘एफआरपी’ तो ही व्याजासकट पदरात पडेल

ऊसाचा गाळप हंगाम सुरु होऊन आता दोन महिन्यांचा कालावधी लोटलेला आहे. आता एफआरपी अदा करण्याची वेळ कारखान्यांवर आलेली आहे. त्यानुसार काही पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी एफआरपी रक्कम दिली आहे. मात्र, ही संख्या केवळ 47 एवढीच आहे. आता ज्या साखऱ कारखान्यांनी एफआरपी रकमेमध्ये मोडतोड केली आहे अशा कारखान्यांवर कारवाई करुन व्याजासहित उर्वरीत रक्कम देण्यात येणार असल्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले आहे.

शेतकऱ्यांनो केवळ तक्रारी करा, थकीत 'एफआरपी' तो ही व्याजासकट पदरात पडेल
साखर कारखाना
| Edited By: | Updated on: Dec 18, 2021 | 10:58 AM
Share

अहमदनगर : (Sugarcane Sludge Season) ऊसाचा गाळप हंगाम सुरु होऊन आता दोन महिन्यांचा कालावधी लोटलेला आहे. आता एफआरपी अदा करण्याची वेळ कारखान्यांवर आलेली आहे. त्यानुसार काही पश्चिम महाराष्ट्रातील (Sugar Factory) साखर कारखान्यांनी एफआरपी रक्कम दिली आहे. मात्र, ही संख्या केवळ 47 एवढीच आहे. आता ज्या साखऱ कारखान्यांनी एफआरपी रकमेमध्ये मोडतोड केली आहे अशा कारखान्यांवर कारवाई करुन व्याजासहित उर्वरीत रक्कम देण्यात येणार असल्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले आहे. एफआरपीच्या मुद्द्यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटेनेचे नेते राजू शेट्टी यांनी वेगवेगळ्या मागण्यांच्या निवेदन त्यांना दिल्यानंतर हे आश्वासन देण्यात आले आहे.

शेतकऱ्यांना काय आहे आवाहन

आता एफआरपी रक्कम अदा करण्याच्या प्रसंगी साखर कारखान्यांकडून वेगवेगळी आश्वासने ही शेकऱ्यांना दिली जाऊ शकतात. केवळ कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांनी वेळेत एफआरपी रक्कम अदा केलेली आहे. उर्वरीत साखर कारखान्यांना 30 डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी केवळ तक्रार जरी केली तरी त्यांना थकीत एफआरपी रक्कम तर मिळणारच आहे पण त्यावरील व्याजही मिळवून दिले जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनो तुम्ही केवळ तक्रारी करा असे आवाहन साखर आय़ुक्त यांनी केले आहे.

इथेनॅाल निर्मितीचा परिणाम एफआरपी रकमेवर

आता अनेक साखऱ कारखान्यांवर इथेनॅाल निर्मितीचे प्रकल्प उभारले गेले आहेत. यामाध्यामतून इथेनॅालची निर्मितीही सुरु झाली आहे. त्यामुळे त्याचा परिणाम साखरेच्या उतारावर आणि एफआरपी रकमेवर झाला असल्याची बाब राजू शेट्टी यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली आहे. शिवाय ज्या साखऱ कारखान्यांनी एफआरपी रकमेचे टप्पे केले आहेत त्यांच्यावर ‘आरआरसी’ ची कारवाई करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली आहे. ऊसाच्या रसापासून बी हेवी मोलॅसीस, इथेनॅालची निर्मीती होत असल्याने उतार कमी येत आहे. त्याचा परिणाम आता एफआरपी रकमेवरही होणार आहे.

30 नोव्हेंबर अखेरची मुदत

कायद्यानुसार ऊस खेरेदी केल्यानंतर 14 दिवसांच्या आतमध्ये शेतकऱ्यांना ‘एफआरपी’ रक्कम देणे बंधनकारक असते मात्र, अनेक कारखाने याचे पालनच करीत नाहीत. सन 2021-22 मधील गाळप हंगाम 15 ऑक्टोंबरपासून सुरु झाला आहे. पहिल्या टप्प्यात 155 साखर कारखाने हे सुरु झाले होते. यापैकी केवळ 47 साखर कारखान्यांनी ही रक्कम शेतकऱ्यांना दिली आहे. राज्यातील 108 साखर कारखान्यांनी ही रक्कम थकवली असून आता 15 दिवसांमध्ये हे थकीत साखर कारखाने काय भूमिका घेतात हे पहावे लागणार आहे.

संबंधित बातम्या :

बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठली अन् खिलार बैलांची हजारांची किंमत लाखोंवर पोहचली

रब्बी हंगामात हरभरा पिकाचा सर्वाधिक पेरा, ‘असे’ करा व्यवस्थापन तरच उत्पादनात वाढ

महावितरण अन् शेतकऱ्यांचीही आर्थिक स्थिती बिकटच, अशोक चव्हाणांनी सांगितला मधला मार्ग

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.