AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महावितरण अन् शेतकऱ्यांचीही आर्थिक स्थिती बिकटच, अशोक चव्हाणांनी सांगितला मधला मार्ग

शेतकऱ्यांकडील थकबाकीचा आकडा हा वाढतच आहे. महावितरणची 57 हजार कोटींची थकबाकी असून वसुलीसाठी एक ना अनेक पर्याय खुले करण्यात आले आहेत. मात्र, अपेक्षित वसुली होत नाही. आता ऐन रब्बी हंगामातच धडक वसुली मोहीम सुरु केल्याने शेतकऱ्यांची अडचण होत आहे.

महावितरण अन् शेतकऱ्यांचीही आर्थिक स्थिती बिकटच, अशोक चव्हाणांनी सांगितला मधला मार्ग
सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Dec 17, 2021 | 6:27 PM
Share

नांदेड : शेतकऱ्यांकडील थकबाकीचा आकडा हा वाढतच आहे. महावितरणची 57 हजार कोटींची थकबाकी असून वसुलीसाठी एक ना अनेक पर्याय खुले करण्यात आले आहेत. मात्र, अपेक्षित वसुली होत नाही. आता ऐन रब्बी हंगामातच धडक वसुली मोहीम सुरु केल्याने शेतकऱ्यांची अडचण होत आहे. वाढत्या थकबाकीमुळे महावितरण कंपनी अडचणीत आहे तर दुसरीकडे शेतकऱ्यांचीही आर्थिक स्थिती नाजूक असून आता वीजबिलात सवलत देऊन मधला मार्ग काढण्याचा सल्ला सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिला आहे. मात्र, प्रत्यक्षात असा प्रयोग राज्यात राबवला जात असताना देखील शेतकरी योजनेमध्ये सहभागी होत नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांनी चालू 2 वीज बिले भरून सहकार्य करण्याचे आवाहन ऊर्जामंत्री डॉ. नितिन राऊत त्यांनी केले आहे.

महावितरण कंपनीवर 57 हजार कोटींचे कर्ज

महावितरण कंपनी ही सुध्दा एक ग्राहक आहे. महावितरण कंपनी वीज निर्मिती कंपनीसह खाजगी वीज निर्मिती कडून वीज विकत घेवून सर्वस्तरातील ग्राहकांना वीज पुरवठा करते. अतिवृष्टी, कोरोना व सतत वाढत असलेल्या थकबाकीमुळे 57 हजार कोटी रूपयांचे कंपनीवर कर्ज झाले आहे. कर्जाचे हप्ते, व्याज, विकत घेतलेल्या विजेचे पैसे दिले तरच वीज विकत घेवून वीज पुरवठा करणे शक्य आहे. त्यामुळे वीज ग्राहकांनी वेळेत बील अदा करणे हाच एकमेव पर्याय असल्याचे ऊर्जामंत्री राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

….तरच महावितरण कंपनी सुरु राहील

सर्वाधिक थकबाकी ही कृषीपंप धारकांकडे आहे. गेल्या काही वर्षांपासून हा थकबाकीचा आकडा हा वाढतच गेलेला आहे. अनेक योजना राबवूनही जैसे थें परस्थिती आहे. या वेळी शेतकऱ्यांकडून  चालू एक बिल भरून घेण्यासंबंधी लोकप्रतिनिधींनी मागणी केली. राज्याकडून शेतीपंपांच्या वीज बिलासाठी विशेष आर्थिक मदत दिली तर सवलत देता येईल. अन्यथा कंपनी चालवयाची असेल तर किमान चालू दोन वीज बिले भरून घेणे आवश्यक असल्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितिन राऊत यांनी स्पष्ट केले.

अन्यथा राज्य अंधारात जाईल

शेतकऱ्यांप्रमाणेच महावितरण कंपनीची स्थिती झालेली आहे. कर्जाचा डोंगर वाढत आहे. शिवाय वीज ही आवश्यक असल्याने त्याचा पुरवठा सुरु ठेवावा लागत आहे. रब्बी हंगामात वीज कपात केली जात आहे. त्यामुळे ना शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागणार आहे ना महावितरणचा. त्यामुळे टप्प्याटप्प्याने का होईना महावितरणची थकबाकी अदा करणे ही ग्राहकांची जबाबदारी आहे. असाच थकबाकीचा अकडा वाढत राहिला तर मात्र, एक दिवस राज्य अंधारात जाईल असे म्हणत अशोक चव्हाण यांनी शेतकऱ्यांची व्यथा आणि महावितरणची स्थिती अशा दोन्हीही बाजू मांडलेल्या आहेत.

संबंधित बातम्या :

अवकाळीचा परिणाम : द्राक्ष बागा वाचवण्यासाठी एकरी 20 हजाराचा खर्च, शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी

…अखेर आठवडाभराने शेतकऱ्यांना मिळाला दिलासा, सोयाबीनच्या दरामध्ये असा काय बदल झाला? जाणून घ्या

शेतकऱ्यांना दिलासा ग्राहकांना मात्र लाल मिरचीचा ठसका, नंदुरबार मुख्य बाजारपेठेत विक्रमी दर

Follow Us
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या...
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला
दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मारो... मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा.

Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा

Gold Price Today : टेन्शन टेन्शन.. सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचे भाव चढेच; आज 10 ग्रॅमचा दर...

Gold Price Today : टेन्शन टेन्शन.. सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचे भाव चढेच; आज 10 ग्रॅमचा दर..

वाट लागली… भारताला मोठा फटका, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, तब्बल 200 टक्के टॅरिफ...

वाट लागली… भारताला मोठा फटका, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, तब्बल 200 टक्के टॅरिफ..

Navi Mumbai : तलवार-चॉपरचा धाक दाखवत तरूणावर जीवघेणा हल्ला, आई वाचवायला आली पण… कोपरखैरणे हादरलं.

Navi Mumbai : तलवार-चॉपरचा धाक दाखवत तरूणावर जीवघेणा हल्ला, आई वाचवायला आली पण… कोपरखैरणे हादरलं

हतबल झालोय, असहाय्य वाटतंय, माणसाची किंमतच..; CJP आंदोलनावर मराठी कलाकार व्यक्त.

हतबल झालोय, असहाय्य वाटतंय, माणसाची किंमतच..; CJP आंदोलनावर मराठी कलाकार व्यक्त

Sunetra Pawar post for Ajit Pawar : तुम्ही माझी सर्वात मोठी ताकद, आज हे सगळं हरवून गेलंय.. अजित पवारांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवारांची भावनिक पोस्ट.

Sunetra Pawar post for Ajit Pawar : तुम्ही माझी सर्वात मोठी ताकद, आज हे सगळं हरवून गेलंय.. अजित पवारांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवारांची भावनिक पोस्ट