AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अवकाळीचा परिणाम : द्राक्ष बागा वाचवण्यासाठी एकरी 20 हजाराचा खर्च, शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी

चार दिवसाचा अवकाळी पाऊस शेतकऱ्यांना किती महागात पडलेली आहे त्याचा प्रत्यय आता येऊ लागला आहे. द्राक्ष बागांचे विदारक चित्र पाहून आता त्या वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरु आहे. वर्षभर बागा जोपासण्यासाठी लाखोंचा खर्च करुन आता अंतिम टप्प्यत असलेल्या बागा वाचवण्यासाठी द्राक्ष बागायत शेतकऱ्यांना एकरी 15 ते 20 हजाराचा अतिरिक्त करावा लागणार आहे.

अवकाळीचा परिणाम : द्राक्ष बागा वाचवण्यासाठी एकरी 20 हजाराचा खर्च, शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: | Updated on: Dec 17, 2021 | 4:42 PM
Share

नाशिक : चार दिवसाचा ( Untimely rains) अवकाळी पाऊस शेतकऱ्यांना किती महागात पडलेली आहे त्याचा प्रत्यय आता येऊ लागला आहे.  (damage to vineyards) द्राक्ष बागांचे विदारक चित्र पाहून आता त्या वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरु आहे. वर्षभर बागा जोपासण्यासाठी लाखोंचा खर्च करुन आता अंतिम टप्प्यत असलेल्या बागा वाचवण्यासाठी द्राक्ष बागायत शेतकऱ्यांना एकरी 15 ते 20 हजाराचा अतिरिक्त करावा लागणार आहे. कारण पाऊस आणि त्यानंतर वातावरणातील बदलामुळे मणीगळ, घडकुज या समस्या निर्माण झाल्या आहेत. बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने एकट्या नाशिक जिल्ह्यातील दीड लाख एकरावरील पिकांना फटका बसला होता. आता खर्चाअभावी बागा सोडून दिल्या तर वर्षभराची मेहनत आणि पैसा वाया जाणार आहे तर दुसरीकडे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती नाजूक झाल्याने खर्च करायचा कसा असा सवाल उपस्थित होत आहे.

कृषी विभागाचा अहवाल जाहीर

नुकसानीचा अहवाल सादर करण्याचे आदेश कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिले होते. त्यानुसार नाशिक जिल्हा प्रशासनाच्यावतीने अहवाल सादर करण्यात आला आहे. यामध्ये जिल्ह्यात 1 लाख 54 हजार एकरावर द्राक्ष लागवड करण्यात आलीची नोंद आहे तर 26 हजार 500 एकरावरील द्राक्षांचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे. द्राक्षांच्या घडामध्ये पावसाचे पाणी शिरल्याने न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. तर आता फवारणीशिवाय शेतकऱ्यांकडे पर्यायच उरलेला नाही.

डाऊनीचा वाढतोय प्रादुर्भाव

पावसानंतर वातावरणातील बदलामुळे घडकुज तर होतच आहे पण नविन पानांच्या फुटीमध्ये डाऊनीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. डाऊनीचे व्यवस्थापन करण्यासाठी शेतकऱ्यांचा खर्च वाढला आहे. वर्षभर द्राक्ष जोपासण्यासाठी शेतकऱ्यांना आगोदरच 8 ते 10 फवारण्या कराव्या लागल्या आहेत. यातच बागा अंतिम टप्प्यात असताना अवकाळी पाऊस व त्यानंतर निर्माण झालेली स्थिती ही शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी आहे.

डाऊनी मिल्ड्यू चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी असे करा व्यवस्थापन

या रोगाचा परिणाम थेट द्राक्षांच्या घडावर होत आहे. त्यामुळे वेळेत उपाययोजना केली नाही तर थेट द्राक्ष तोडून फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे. हे नुकसान टाळाव्यासाठी अमिसूलब्रोम 17.7 % एस.सी. या स्पर्शजन्य बुरशीनाशकाची 0.38 मि.लि. प्रति लिटर या प्रमाणे फवारणी करावी. किंवा डायमिथोमॉर्फ 50 डब्ल्यू.पी. 0.50 ग्रॅम प्रति 1 लिटर किंवा मॅडीप्रोपॅमीड एस . सी. 0.8 मि.लि. प्रति लिटर पाण्यात मिसळून बुरशीनाशकांचाही वापर करता येईल.

संबंधित बातम्या :

…अखेर आठवडाभराने शेतकऱ्यांना मिळाला दिलासा, सोयाबीनच्या दरामध्ये असा काय बदल झाला? जाणून घ्या

शेतकऱ्यांना दिलासा ग्राहकांना मात्र लाल मिरचीचा ठसका, नंदुरबार मुख्य बाजारपेठेत विक्रमी दर

निर्णय झाला आता दरही ठरणार, द्राक्ष बागायत संघाकडे राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.