AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निर्णय झाला आता दरही ठरणार, द्राक्ष बागायत संघाकडे राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष

शेतकऱ्यांच्या एकजूटीपुढे झुकावे लागते हे कृषी कायद्यांचा निर्णय मागे घेण्यावरुन समोर आलेच आहे. अशीच एकजूट आता द्राक्ष बागायत शेतकऱ्यांची दिसून येत आहे. उत्पादनावरील खर्च, नैसर्गिक संकटामुळे होणारे नुकसान आणि द्राक्षांचे घटते दर यामुळे आता उत्पादक ठरवतील तोच दर निश्चित केला जाणार असल्याची भूमिका द्राक्ष बागायत संघाने घेतलेली आहे.

निर्णय झाला आता दरही ठरणार, द्राक्ष बागायत संघाकडे राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Dec 17, 2021 | 2:36 PM
Share

नाशिक : शेतकऱ्यांच्या एकजूटीपुढे झुकावे लागते हे कृषी कायद्यांचा निर्णय मागे घेण्यावरुन समोर आलेच आहे. अशीच एकजूट आता ( Grape farmers) द्राक्ष बागायत शेतकऱ्यांची दिसून येत आहे. उत्पादनावरील खर्च, नैसर्गिक संकटामुळे होणारे नुकसान आणि (Grape Rate) द्राक्षांचे घटते दर यामुळे आता उत्पादक ठरवतील तोच दर निश्चित केला जाणार असल्याची भुमिका द्राक्ष बागायत संघाने घेतलेली आहे. आतापर्यंत निर्णयावर ठाम होण्यासाठी बैठका पार पडल्या होत्या पण आता निर्णय तर झाला असून शनिवारी दरनिश्चितीसाठी अंतिम बैठक होणार आहे. त्यामुळे या बैठकीत जर द्राक्षाच्या दराबाबत निर्णय झाला तर त्याचा परिणाम इतर पीक उत्पादकांवर देखील होणार आहे.

द्राक्ष बागायत संघावर ही वेळ का आली?

अवकाळी पावसामुलळे दरवर्षी द्राक्ष बागांचे नुकसान हे ठरलेलेच आहे. असे असताना शासनाच्यावतीने सुरक्षतेच्या अनुशंगाने अनुदानाचे वाटप होत नाही. क्रॅाप कव्हरसाठी अनुदान आहे. शिवाय याची पुर्तता करण्याची मागणी शेतकरी हे दरवर्षी करीत आहेत मात्र, याकडे दुर्लक्ष होत आहे. तर दुसरीकडे निर्यातीवर शुल्क आणि द्राक्ष पॅकिंगसाठी होणारा खर्च ही उत्पादकांवरच लादला जात आहे. हा खर्च ग्राहकांवर किंवा बाजारपेठेतून काढण्याची मागणी हे द्राक्ष उत्पादक शेतकरी आहेत. यावर कोणताही निर्णय होत नसल्याने अखेर द्राक्ष उत्पादक हे एकत्र आले असून द्राक्षाला काय दर असावा त्याअनुशंगाने गेल्या दोन दिवसांपासून बैठका पार पडत आहेत. मात्र, दरावर शनिवारी शिक्कामोर्तब होणार आहे.

एका निर्णयाचा परिणाम अनेक घटकांवर

द्राक्ष उत्पादक संघाने जर एकच दर ठरवला तर आगामी काळात अनेक फळ उत्पादक किंवा वेगवेगळे पिकांचे उत्पादन घेणारे शेतकरीही असा निर्णय घेऊ शकतील. मात्र, हे दर ठरवताना उत्पादनावर झालेल्या खर्चाचा विचार करुनच ठरवला जाणार आहे. शिवाय एकदा दर ठरले तर मात्र, त्याच्या खालच्या दराने विक्री करता येणार नाही. महिन्याच्या प्रत्येक आठवड्यासाठी आणि द्राक्षाच्या वाणानुसार तपशीलनिहाय दर हे निश्चित केले जाणार आहेत.

काय आहे बागायतदार संघाचे अवाहन

हजारो द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा महत्वाचा निर्णय होणार आहे. त्यामुळे सर्व गोष्टींबाबत वस्तुनिष्ठ अभ्यास करुनच हे दर ठरवले जाणार आहेत. या बैठकीच्या दरम्यान शेतकऱ्यांना देखील आपली मते मांडता येणार आहेत. त्यामुळे शनिवारी दुपारी द्राक्ष भवन येथे शेतकऱ्यांनी तसेच संघाच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन उपाध्यक्ष कैलास भोसले यांनी केले आहे. त्यामुळे उद्याच्या बैठकीत काय निर्णय होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

संबंधित बातम्या :

तूर आयातीमुळे हमीभावापर्यंतही पोहचले नाहीत दर, काय राहणार खरिपातील शेवटच्या पिकाचे भवितव्य

अवकाळीची अवकृपा : अहवाल मागवला पण पंचनाम्यांशिवाय भरपाई मिळणार तरी कशी? शेतकरी चिंताग्रस्त

Marathwada : पैसेवारीचे महत्व काय असते ? शेतकऱ्यांचा फायदा अन् तोटा वाचा सविस्तर

Follow Us
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा...

धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा..

इतिहासात पहिल्यांदाच विद्यार्थ्यांवर बॅलेट गनचा वापर झाल्याचा आरोप, दिल्ली पोलिसांचं खंडन.

इतिहासात पहिल्यांदाच विद्यार्थ्यांवर बॅलेट गनचा वापर झाल्याचा आरोप, दिल्ली पोलिसांचं खंडन

यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा.

यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा

एका साडीपायी संसार उद्ध्वस्त, पतीच्या डोक्यात थेट घातला कुकर; एका चुकीने सुनिताचं बिंग फुटलं !.

एका साडीपायी संसार उद्ध्वस्त, पतीच्या डोक्यात थेट घातला कुकर; एका चुकीने सुनिताचं बिंग फुटलं !

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले.

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप.

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप