AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अवकाळीची अवकृपा : अहवाल मागवला पण पंचनाम्यांशिवाय भरपाई मिळणार तरी कशी? शेतकरी चिंताग्रस्त

मध्यंतरीच्या अवकाळी पावसामुळे फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. नुकसानीची तीव्रता लक्षात घेता कृषि मंत्री दादा भुसे यांनी केवळ कागदावर नुकसानीची आकडेवारी देण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले होते तर आठ दिवसांमध्ये पंचनामे पूर्ण होतील असेही सांगितले होते. पण आता अवकाळी पावसाने उघडीप देऊन 15 दिवसांचा कालावधी लोटलेला आहे.

अवकाळीची अवकृपा : अहवाल मागवला पण पंचनाम्यांशिवाय भरपाई मिळणार तरी कशी? शेतकरी चिंताग्रस्त
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Dec 17, 2021 | 1:10 PM
Share

सोलापूर : मध्यंतरीच्या (Untimely rains) अवकाळी पावसामुळे (crop damage) फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. नुकसानीची तीव्रता लक्षात घेता कृषि मंत्री दादा भुसे यांनी केवळ कागदावर नुकसानीची आकडेवारी देण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले होते तर आठ दिवसांमध्ये पंचनामे पूर्ण होतील असेही सांगितले होते. पण आता अवकाळी पावसाने उघडीप देऊन 15 दिवसांचा कालावधी लोटलेला आहे. मात्र, अद्यापही (Solapur)  सोलापूर जिल्ह्यातील नुकसानीचे पंचनामेच करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे भरपाई मिळणार तरी कशी असा सवाल आता शेतकरी विचारत आहेत. जिल्ह्यात 40 हजार हेक्टरावरील पिकांना अवकाळीचा फटका बसलेला आहे तर 21 हजार 356 हजार हेक्टरावरील फळबागा ह्या उध्वस्त झाल्या आहेत.

1 लाख 36 हजार हेक्टरावरील पिकांना अवकाळीचा तडाका

नोव्हेंबरच्या शेवटी आणि डिसेंबर महिन्याच्या सुरवातीला झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्यातील तब्बल 1 लाख 36 हजार हेक्टरावरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसान हे नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष बागांचे झाले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर वगळता सर्वच जिल्ह्यातील नुकसनीचे पंचनामे करुन अहवाल प्रशासनाकडे पाठविण्यात आलेला आहे. मात्र, सोलापूर जिल्ह्यातीलच हा अहवाल पंचनाम्यांशिवायच पाठविण्यात आल्याने नेमकी नुकसानभरपाई दिली तरी कशी जाणार हा सवाल आहे. अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका हा द्राक्ष बागांना बसलेला आहे. जिल्ह्यातील पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा येथील बागांचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. त्यामुळे पंचनामे करुन मदतीची मागणी शेतकरी करीत आहेत.

पालकमंत्र्याकडेही पाठपुरावा

सोलापूर जिल्ह्यात हजारो एकर द्राक्ष, डाळिंब बागांसह कांदा पिकाचे नुकसान झालेले आहे. कृषीमंत्र्यांच्या आदेशानंतर का होईना पंचनामे करणे अपेक्षित होते. मात्र, महसूल आणि कृषी विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे. इतर जिल्ह्यांमध्ये नुकसानीचे पंचनामे पूर्ण करुन अहवाल सादर करण्यात आला आहे तर सोलापूर जिल्ह्यात पीक नुकसानीचे पंचनामेच झालेले नाहीत. त्यामुळे तातडीने पंचनामे पूर्ण करुन प्रशासनाकडे पुन्हा अहवाल सादर करण्याची मागणी आमदार बबनराव शिंदे यांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली आहे.

शासन दरबारी मदतीची मागणी

अवकाळीचा फटका सर्वच पिकांना बसलेला आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसान झाले आहे ते द्राक्ष आणि आंबा पिकाचे. द्राक्ष तोडणी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली होती. याच दरम्यान, सबंध राज्यभर झालेल्या अवकाळी पावसामुळे घडकुज झाली आहे. त्यामुळे बागायत शेतकऱ्यांना येणारा खर्च व त्या तुलनेत न मिळणाऱ्या उत्पादनाची सांगड घालून शासनाकडे मदतीची मागणी केली जाणार असल्याचे द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष शिवाजी पवार यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

Marathwada : पैसेवारीचे महत्व काय असते ? शेतकऱ्यांचा फायदा अन् तोटा वाचा सविस्तर

Rabi Season | शेतकऱ्यांनो स्पर्धेत भाग घ्या अन् हजारोंची बक्षीसे मिळवा, जाणून घ्या सर्वकाही

Positve News | रब्बीवरील संकटाची मालिका संपुष्टात, थंडीच्या कडाक्यात बहरतोय हरभरा

Follow Us
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा...

धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा..

इतिहासात पहिल्यांदाच विद्यार्थ्यांवर बॅलेट गनचा वापर झाल्याचा आरोप, दिल्ली पोलिसांचं खंडन.

इतिहासात पहिल्यांदाच विद्यार्थ्यांवर बॅलेट गनचा वापर झाल्याचा आरोप, दिल्ली पोलिसांचं खंडन

यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा.

यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा

एका साडीपायी संसार उद्ध्वस्त, पतीच्या डोक्यात थेट घातला कुकर; एका चुकीने सुनिताचं बिंग फुटलं !.

एका साडीपायी संसार उद्ध्वस्त, पतीच्या डोक्यात थेट घातला कुकर; एका चुकीने सुनिताचं बिंग फुटलं !

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले.

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप.

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप