AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…अखेर आठवडाभराने शेतकऱ्यांना मिळाला दिलासा, सोयाबीनच्या दरामध्ये असा काय बदल झाला? जाणून घ्या

सर्वकाही पोषक असतानाही गेल्या आठ दिवसांपासून सोयाबीनचे दर हे स्थिर राहत होते किंवा त्यामध्ये घसरण होत होती. अखेर आठ दिवसांनी का होईना सोयाबीनच्या दरात सुधारणा झाली आहे. शुक्रवारी दर कमी तर झाले नाहीत पण यामध्ये 300 रुपयांनी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे.

...अखेर आठवडाभराने शेतकऱ्यांना मिळाला दिलासा, सोयाबीनच्या दरामध्ये असा काय बदल झाला? जाणून घ्या
सोयाबीन हे खरीप हंगामातील मुख्य पीक आहे. पुन्हा सोयाबीनच्या दरात मोठी घसरण झाली आहे.
| Edited By: | Updated on: Dec 17, 2021 | 3:50 PM
Share

लातूर : सर्वकाही पोषक असतानाही गेल्या आठ दिवसांपासून सोयाबीनचे दर हे स्थिर राहत होते किंवा त्यामध्ये घसरण होत होती. अखेर आठ दिवसांनी का होईना सोयाबीनच्या दरात सुधारणा झाली आहे. शुक्रवारी दर कमी तर झाले नाहीत पण यामध्ये 300 रुपयांनी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. कारण सोयापेंडच्या आयातीला पूर्णविराम मिळाला असताना देखील दरात वाढ होत नव्हती उलट घसरण सुरु होती. एकीकडे आवक वाढत असताना दर घटत असल्याने नेमका काय निर्णय घ्यावा या द्विधा मनस्थितीमध्ये शेतकरी होते. शुक्रवारच्या दरामुळे काहीशा प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे.

सोमवार पासून सोयाबीनचे दोन सौदे

लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन आणि बियाणेसाठी वापरले जाणारे सोयाबीन या दोन्हीची आवक सुरु झाली आहे. आगामी हंगामाची तयारी आतापासूनच सुरु झाली आहे. बियाणाच्या सोयाबीनला 7 हजार रुपये क्विंटल दर मिळत आहे तर नियमित असलेल्या सोयाबीनच्या दरात शुक्रवारी 300 रुपयांनी वाढ झाली आहे. आता सोमवारपासून नियमित सोयाबीन आणि बियाणांसाठी वापरले जाणारे सोयाबीन यांचे वेगवेगळे सौदे होणार आहेत. शुक्रवारी आवक कमी झाली असली तरी दरात वाढ झाली आहे. आतापर्यंत आवक अधिकेची होत होत तर दर कमी आता मात्र, आवक कमी झाली आणि दर हे वाढले असल्याने समाधान व्यक्त होत आहे.

बाजारपेठेत रेलचेल वाढली

लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या सोयाबीन, तूर तसेच सोयाबीन बियाणेची आवक ही वाढलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून केवळ सोयाबीनची आदक सुरु होती. आता खरीप हंगामातील तुरही बाजारात दाखल झाली आहे. त्यामुळे रेलचेल वाढली असून सोयाबीनच्या दरात अणखीन वाढ होण्याची अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. अजूनही अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक केलेली आहे. आता उन्हाळी सोयाबीन दाखल होण्यापूर्वी खरीपातील सोयाबीनला अपेक्षित दर मिळाला तर झालेले नुकसान भरुन निघणार आहे.

इतर शेतीमालाचे कसे आहेत दर

लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुपारी 12 च्या दरम्यान शेतीमालाचे सौदे होतात. शुक्रवारी लाल तूर- 6400 रुपये क्विंटल, पांढरी तूर 6150 रुपये क्विंटल, पिंकू तूर 6200 रुपये क्विंटल, जानकी चना 4925 रुपये क्विंटल, विजय चणा 4850, चना मिल 4750, सोयाबीन 6500, चमकी मूग 7200, मिल मूग 6150 तर उडीदाचा दर 7450 एवढा राहिला होता.

संबंधित बातम्या :

शेतकऱ्यांना दिलासा ग्राहकांना मात्र लाल मिरचीचा ठसका, नंदुरबार मुख्य बाजारपेठेत विक्रमी दर

निर्णय झाला आता दरही ठरणार, द्राक्ष बागायत संघाकडे राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष

तूर आयातीमुळे हमीभावापर्यंतही पोहचले नाहीत दर, काय राहणार खरिपातील शेवटच्या पिकाचे भवितव्य

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.