AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Solapur : शेतकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नावर ‘स्वाभिमानी’ची हुंकार यात्रा,राजू शेट्टींनी सांगितले ऊस शेतीचे गणित!

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा लढा हा शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठीच आहे. आतापर्यंत विविध आंदोलन, मोर्चे आणि परिषदा ह्या केवळ शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊनच पार पडलेल्या आहेत. सध्या निसर्गाच्या लहरीपणाबरोबर शेतकऱ्यांना सुल्तानी संकटाचा देखील सामना करावा लागत आहे. त्याच अनुशंगाने बळीराजा हुंकार यात्रेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी हे पश्चिम महाराष्ट्र पिंजून काढत आहेत.

Solapur : शेतकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नावर 'स्वाभिमानी'ची हुंकार यात्रा,राजू शेट्टींनी सांगितले ऊस शेतीचे गणित!
राजू शेट्टी, अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटनाImage Credit source: TV9
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Apr 20, 2022 | 12:48 PM
Share

संदीप शिंदे : माढा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा लढा हा शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठीच आहे. आतापर्यंत विविध आंदोलन, मोर्चे आणि परिषदा ह्या केवळ शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊनच पार पडलेल्या आहेत. सध्या निसर्गाच्या लहरीपणाबरोबर शेतकऱ्यांना सुल्तानी संकटाचा देखील सामना करावा लागत आहे. त्याच अनुशंगाने (Baliraja Yatra) बळीराजा हुंकार यात्रेच्या माध्यमातून (Farmer Issue) शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी संघटनेचे सर्वेसर्वा (Raju Shetti) राजू शेट्टी हे पश्चिम महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. बुधवारी माढा तालुक्यातील म्हैसगाव येथे राजू शेट्टी यांची जाहीर सभा झाली असून शेतकऱ्यांच्या मूलभूत सोडवण्याचे आवाहन त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारला केले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यास या सरकारला वेळ नाही तर भोंग्यावरुन केवळ राजकारण होत असल्याची टिकाही त्यांनी यावेळी केली.

काय आहेत स्वाभिमानी संघटनेच्या मागण्या?

रबी हंगामाच्या सुरवातीपासून शेतीसाठी दिवसा विद्युत पुरवठा करण्याची मागणी ही या संघटनेने केलेली आहे. शिवाय याकरिता आंदोलन, आमरण उपोषण करुनही सरकारने यासंदर्भात निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे या हुंकार यात्रेत कृषीपंपासाठी दिवसा विद्युत पुरवठा, एक रकमी एफआरपी अदा करावी, शेतीसाठी किमान 10 तास विद्युत पुरवठा आणि तो ही खंडित न होता, रासायनिक खतांच्या किंमतीवर नियंत्रण ठेवावे तसेच पीक विम्यासाठी शेतकऱ्यांची परवड होत आहे. विमा कंपन्यावर नियंत्रण ठेवावे अशा मागण्या या हुंकार यात्रेतून मांडल्या जात आहेत.

ऊस हेच शाश्वत पीक, पवारांना केवळ कारखानदारांचे हित

उसाचे पीक हे आळशी शेतकरी घेत असल्याचे विधान खा. शरद पवार यांनी केले होते. याचा समाचार राजू शेट्टी घेत असून उसासारखे शाश्वत पीक नाही. भले उसाला दर नसला तरी उत्पन्नाची हमी आहे. ज्यांनी सातत्याने कारखानदारांचे हीत जोपासले त्यांना काय माहित शेतकऱ्यांच्या व्यथा असे म्हणत त्यांनी शरद पवार यांच्य़ा विधानाचा समाचार घेतला. शिवाय उसामुळे शेतकरी हे समृध्द झाले आहेत. उस हे सर्वात मोठे नगदी पीक असून आतापर्यंत पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना याच पिकाचा आधार मिळाला असल्याचेही त्यांनी सांगितले.

पवारांच्या बालेकिल्ल्यात बळीराजा हुंकार यात्रा…

महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यानंतर राजू शेट्टी पवारांच्या बालेकिल्ल्यात पहिल्यांदाच राजू शेट्टी यांची सभा होत. बुधवारी इंदापूर तालुक्यातील भवानी नगर येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्यावर शेट्टींची सभा होणार आहे. यामध्ये राज्यात विजेचा लपंडाव, रात्रीची वीज, अतिरिक्त ऊस प्रश्न याच बरोबर महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडल्यानंतर पवारांवर ते काय बोलतात याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

संबंधित बातम्या :

Grape Season : द्राक्ष हंगाम कडूच, फळबागायत शेतकरीही कर्जबाजारी, हंगामाच्या अंतिम टप्प्यात चित्र काय?

Chickpea Crop : ‘नाफेड’ चा उद्देश साध्य, शेतकरी उत्पादक कंपन्याच्या माध्यमातून विक्रमी हरभरा खरेदी

Amravati : सोयाबीन बहरुनही उत्पादन घटण्याचा धोका, हंगामाच्या अंतिम टप्प्यात शेतकरी हवालदिल

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.