AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur : पंचनामेच अंदाजपंचे…! नुकसानभरपाईबाबत सर्वकाही संशयास्पद, शेतकऱ्यांच्या काय आहेत भावना?

पंचनामे करण्याचे आदेश शासन स्थरावरुन देण्यात आले असले तरी स्थानिक पातळीवर कोणत्याही नियमांची अंमलबजावणी न होता अधिकारी-कर्मचारी हे अंदाजपंचेच पंचनामे करीत आहेत. अनेक शेतकऱ्यांना तर आपल्या पिकांचा पंचनामा झाला आहे का नाही हे देखील माहिती नाही. शिवाय अनेक ठिकाणी तर एक हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रात नुकसान झाले असे दाखवण्यात आले आहे.

Nagpur : पंचनामेच अंदाजपंचे...! नुकसानभरपाईबाबत सर्वकाही संशयास्पद, शेतकऱ्यांच्या काय आहेत भावना?
पिकांचे नुकसान, पंचनाम्यांमध्ये अनियमितता असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Aug 12, 2022 | 3:27 PM
Share

नागपूर :  (Heavy Rain) अतिवृष्टीने होत्याचे नव्हते झाले आहे. उत्पन्नाच्या दृष्टीने (Kharif Season) खरीप हंगामाच महत्वाचा असतो पण यंदा पेरणी होताच सुरु झालेला पाऊस आता हंगाम मध्यावर असतानाही सुरुच आहे. विरोधकांचा रेटा आणि शेतकऱ्यांची परस्थिती पाहता राज्य सरकारने पंचनामे करण्याचे आदेश दिले मात्र, मुळात पंचनामेच अंदाजपंचे केले जात आहेत. त्यामुळे नुकसानभरपाई मिळणार तरी कशी असा सवाल आता शेतकरी उपस्थित करीत आहेत. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बऱ्याच (Nagpur Farmer) शेतकऱ्यांना 408 एवढी तोकडी मदत दाखविण्यात आलीय.नागपूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे जवळपास पूर्ण झाले आहेत. सर्वकाही पाण्यात असतानाही अशी क्रुरचेष्टा का असा सवाल आता शेतकरी उपस्थित करीत आहेत.

असे होतात पंचनाम..

पंचनामे करण्याचे आदेश शासन स्थरावरुन देण्यात आले असले तरी स्थानिक पातळीवर कोणत्याही नियमांची अंमलबजावणी न होता अधिकारी-कर्मचारी हे अंदाजपंचेच पंचनामे करीत आहेत. अनेक शेतकऱ्यांना तर आपल्या पिकांचा पंचनामा झाला आहे का नाही हे देखील माहिती नाही. शिवाय अनेक ठिकाणी तर एक हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रात नुकसान झाले असे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे कृषी अधिकाऱ्यांनी केलेल्या पंचनाम्यानुसार मदत ही 400 ते 700 रुपयांपर्यंतच मिळणार आहे. त्यामुळे पंचनाम्यांमध्ये नियमितता यावी आणि जे नुकसान झाले तेच दाखवण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.

मदत रक्कम वाढली, नियमिततेचे काय?

यंदा खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सततच्या पावसामुळे पिकांची वाढ तर खुंटलीच पण शेतकऱ्यांनी जेवढा खर्च आतापर्यंत झाला आहे तेवढा देखील उत्पादनातून पदरी पडणार नाही. असे असताना शिंदे सरकारने मदत रकमेत दुपटीने वाढ केली असली तरी झालेल्या नुकसानीच्या तुलनेत पिकांची नोंदच केली जात नाही. त्यामुळे मदत रक्कम घोषित करुनही शेतकऱ्यांना प्रत्यक्षात उपयोग काय असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत. राज्य सरकारने हेक्टरी 13 हजार 600 रुपये अशा मदतीची घोषणा केली आहे, पण पंचनामे नियमिततेत होत नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.

शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत

एका शेतकऱ्याचे एका हेक्टर पेक्षा कमी नुकसान दाखविण्यात आले आहे. त्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांना 408, 544, 612 रुपये अशी मदत दाखवण्यात आली आहे. मुळात 1 हजार रुपयांपेक्षा कमी मदत करू नये असे सरकारचे आदेश आहे. मात्र, तरीही त्याखाली मदत दाखविण्यात आलीय. त्यामुळं ही म्हणजे आमची थट्टा आहे, मदत नको पण थट्टा करू नका, अशा भावना शेतकरी व्यक्त करताहेत.

Follow Us
एक-एक टक्का देतो, आधी 40... शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; खळबळ
एक-एक टक्का देतो, आधी 40...  शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; एकच खळबळ
श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुला
Omraje Nimbalkar | श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले....
ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस
Omraje Nimbalakar | ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस... मोठा गोंधळ
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेम
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेमकं काय म्हणाले?
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच पोलिसांना...
तर नोकरी सोडून राजकारणात या, विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर
तर नोकरी सोडून राजकारणात या, IPS विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर राज ठाकरेंचा थेट हल्लबोल!
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय देशमुखांनी थेट हे काय सांगितलं?
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी सांगितला मास्टर प्लॅन
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल...
पुन्हा पेपरफुटी! TET परीक्षेचा पेपर फुटला, पुन्हा परिक्षा कधी होणार?
पुन्हा पेपरफुटी! TET परीक्षेचा पेपर फुटला, पुन्हा परिक्षा कधी होणार?