AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rabi Season : हरभरा उत्पादनात मराठवाडा अन् विदर्भातील 5 जिल्हे ‘टॉप’वर, जोडपिकालाच प्राधान्य

यंदा रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी असा काय बदल केला आहे की, हरभरा उत्पादनात इतिहासच घडलायं. मराठवाड्यात केवळ ऊस क्षेत्रामध्येच वाढ झाली नाही हंगामी पिकांनाही शेतकरी महत्व देत आहेत. सध्या हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरु आहे. शिवाय 'नाफेड'ने उभारलेल्या हमीभाव केंद्राचा शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. विशेष म्हणजे हरभरा खरेदी केंद्रावरील एकूण खरेदीच्या 70 टक्के खरेदी ही राज्यातील 5 जिल्ह्यांची आहे.

Rabi Season : हरभरा उत्पादनात मराठवाडा अन् विदर्भातील 5 जिल्हे 'टॉप'वर, जोडपिकालाच प्राधान्य
हरभऱ्याच्या आयातीमध्ये मोठी घट झाली आहे.
| Updated on: Apr 22, 2022 | 5:31 AM
Share

लातूर : यंदा (Rabi Season) रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी असा काय बदल केला आहे की, हरभरा उत्पादनात इतिहासच घडलायं. मराठवाड्यात केवळ ऊस क्षेत्रामध्येच वाढ झाली नाही (Seasonable Crop) हंगामी पिकांनाही शेतकरी महत्व देत आहेत. सध्या (Chickpea Crop) हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरु आहे. शिवाय ‘नाफेड’ने उभारलेल्या हमीभाव केंद्राचा शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. विशेष म्हणजे हरभरा खरेदी केंद्रावरील एकूण खरेदीच्या 70 टक्के खरेदी ही राज्यातील 5 जिल्ह्यांची आहे. यामध्ये मराठवाड्यातील 3 तर विदर्भातील 2 जिल्ह्यांचा समावेश आहे. यंदा पोषक वातावरणामुळे हरभऱ्याची उत्पादकता तर वाढली शिवाय क्षेत्रही वाढल्याचा परिणाम हरभरा उत्पादनावर झाला आहे.

या 5 जिल्ह्यांचा समावेश

कृषी विभागाने केलेल्या आवाहनाला शेतकऱ्यांनी प्रतिसाद देत रबी हंगामात हरभरा पिकावर भर दिला होता. त्यामुळे क्षेत्र तर वाढले पण पोषक वातावरणामुळे उत्पादकताही वाढली आहे. त्यामुळे खरेदी केंद्रावरील एकूण खरेदीच्या 70 टक्के ही हरभरा हा लातूर, हिंगोली, नांदेड, अमरावती आणि बुलडाणा या जिल्ह्यातील आहे. खरिपातील सोयाबीन, उडीद, मूगानंतर लागलीच हरभऱ्याचे उत्पादन घेतले जाते. खरिपातील उत्पादनानंतर लागलीच रब्बीत येणाऱ्या हरभरा पिकाच्या उत्पादनातून शेतकरी चांगला परतावा मिळवत आहे. त्यामुळे जोडपिकाला महत्व दिले जात आहे.

खरेदी केंद्रावरील दराचा लाभ

गेल्या महिन्याभरापासून हरभऱ्याची आवक सुरु झाली आहे. पण बाजारभावापेक्षा नाफेड ने उभारलेल्या हमीभाव केंद्रावरीलच दर अधिकचा राहिलेला आहे. सध्या खुल्या बाजारपेठेत हरभऱ्याला 4 हजार 600 असा दर आहे तर नाफेडने ठरवून दिलेला दर हा 5 हजार 230 एवढा आहे. हरभऱ्याचे दर वाढतील असा अंदाज आहे पण गेल्या महिन्याभरात खुल्या बाजारपेठेत दर हे स्थिरच आहेत. त्यामुळे शेतकरी हमीभाव केंद्र जवळ करीत आहेत. शिवाय हमीभाव केंद्रवरील व्यवहारही आता चोख होत आहेत.

बाजारपेठेतील दर स्थिर, नोंदणीमध्ये वाढ

हंगाम सुरु झाल्यापासून बाजारपेठेतील दरात फरक झालेला नाही. शेतकऱ्यांना दर वाढतील अशी आशा होती पण आवक वाढल्याने दर स्थिर राहिले आहेत. बाजारपेठ आणि खरेदी केंद्रातील दरात 600 रुपयांचा फरक आहे. त्यामुळे शेतकरी आता खरेदी केंद्रावरच हरभरा विक्रीला प्राधान्य देत आहेत. कागदपत्रांची पूर्तता करुन शेतकरी हरभरा विक्रीची नोंदणी आणि त्यानंतर विक्री करीत आहेत.

संबंधित बातम्या :

Latur Market: तुरीच्या दराला उतरती कळा, शेतकऱ्यांसमोर आता एकच पर्याय..!

PM Kisan Yojna : सर्वात मोठ्या कृषी योजनेत अनियमितता, लाखो अपात्र शेतकऱ्यांनी घेतला लाभ, आता वसुलीचे उद्दीष्ट

State Government : मेंढपाळांची भटकंती थांबणार, पशुधनविमा योजनेबाबत सरकारची भूमिका काय?

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...