Rabi Season : हरभरा उत्पादनात मराठवाडा अन् विदर्भातील 5 जिल्हे ‘टॉप’वर, जोडपिकालाच प्राधान्य

यंदा रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी असा काय बदल केला आहे की, हरभरा उत्पादनात इतिहासच घडलायं. मराठवाड्यात केवळ ऊस क्षेत्रामध्येच वाढ झाली नाही हंगामी पिकांनाही शेतकरी महत्व देत आहेत. सध्या हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरु आहे. शिवाय 'नाफेड'ने उभारलेल्या हमीभाव केंद्राचा शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. विशेष म्हणजे हरभरा खरेदी केंद्रावरील एकूण खरेदीच्या 70 टक्के खरेदी ही राज्यातील 5 जिल्ह्यांची आहे.

Rabi Season : हरभरा उत्पादनात मराठवाडा अन् विदर्भातील 5 जिल्हे 'टॉप'वर, जोडपिकालाच प्राधान्य
हरभऱ्याच्या आयातीमध्ये मोठी घट झाली आहे.
Follow us
| Updated on: Apr 22, 2022 | 5:31 AM

लातूर : यंदा (Rabi Season) रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी असा काय बदल केला आहे की, हरभरा उत्पादनात इतिहासच घडलायं. मराठवाड्यात केवळ ऊस क्षेत्रामध्येच वाढ झाली नाही (Seasonable Crop) हंगामी पिकांनाही शेतकरी महत्व देत आहेत. सध्या (Chickpea Crop) हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरु आहे. शिवाय ‘नाफेड’ने उभारलेल्या हमीभाव केंद्राचा शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. विशेष म्हणजे हरभरा खरेदी केंद्रावरील एकूण खरेदीच्या 70 टक्के खरेदी ही राज्यातील 5 जिल्ह्यांची आहे. यामध्ये मराठवाड्यातील 3 तर विदर्भातील 2 जिल्ह्यांचा समावेश आहे. यंदा पोषक वातावरणामुळे हरभऱ्याची उत्पादकता तर वाढली शिवाय क्षेत्रही वाढल्याचा परिणाम हरभरा उत्पादनावर झाला आहे.

या 5 जिल्ह्यांचा समावेश

कृषी विभागाने केलेल्या आवाहनाला शेतकऱ्यांनी प्रतिसाद देत रबी हंगामात हरभरा पिकावर भर दिला होता. त्यामुळे क्षेत्र तर वाढले पण पोषक वातावरणामुळे उत्पादकताही वाढली आहे. त्यामुळे खरेदी केंद्रावरील एकूण खरेदीच्या 70 टक्के ही हरभरा हा लातूर, हिंगोली, नांदेड, अमरावती आणि बुलडाणा या जिल्ह्यातील आहे. खरिपातील सोयाबीन, उडीद, मूगानंतर लागलीच हरभऱ्याचे उत्पादन घेतले जाते. खरिपातील उत्पादनानंतर लागलीच रब्बीत येणाऱ्या हरभरा पिकाच्या उत्पादनातून शेतकरी चांगला परतावा मिळवत आहे. त्यामुळे जोडपिकाला महत्व दिले जात आहे.

खरेदी केंद्रावरील दराचा लाभ

गेल्या महिन्याभरापासून हरभऱ्याची आवक सुरु झाली आहे. पण बाजारभावापेक्षा नाफेड ने उभारलेल्या हमीभाव केंद्रावरीलच दर अधिकचा राहिलेला आहे. सध्या खुल्या बाजारपेठेत हरभऱ्याला 4 हजार 600 असा दर आहे तर नाफेडने ठरवून दिलेला दर हा 5 हजार 230 एवढा आहे. हरभऱ्याचे दर वाढतील असा अंदाज आहे पण गेल्या महिन्याभरात खुल्या बाजारपेठेत दर हे स्थिरच आहेत. त्यामुळे शेतकरी हमीभाव केंद्र जवळ करीत आहेत. शिवाय हमीभाव केंद्रवरील व्यवहारही आता चोख होत आहेत.

बाजारपेठेतील दर स्थिर, नोंदणीमध्ये वाढ

हंगाम सुरु झाल्यापासून बाजारपेठेतील दरात फरक झालेला नाही. शेतकऱ्यांना दर वाढतील अशी आशा होती पण आवक वाढल्याने दर स्थिर राहिले आहेत. बाजारपेठ आणि खरेदी केंद्रातील दरात 600 रुपयांचा फरक आहे. त्यामुळे शेतकरी आता खरेदी केंद्रावरच हरभरा विक्रीला प्राधान्य देत आहेत. कागदपत्रांची पूर्तता करुन शेतकरी हरभरा विक्रीची नोंदणी आणि त्यानंतर विक्री करीत आहेत.

संबंधित बातम्या :

Latur Market: तुरीच्या दराला उतरती कळा, शेतकऱ्यांसमोर आता एकच पर्याय..!

PM Kisan Yojna : सर्वात मोठ्या कृषी योजनेत अनियमितता, लाखो अपात्र शेतकऱ्यांनी घेतला लाभ, आता वसुलीचे उद्दीष्ट

State Government : मेंढपाळांची भटकंती थांबणार, पशुधनविमा योजनेबाबत सरकारची भूमिका काय?

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.