AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Positive News: थंडी कमी होताच केळीच्या दरात वाढ, काय आहे खानदेशातले चित्र?

उत्पादनावरील खर्च आणि प्रत्यक्षात बागांची अवस्था यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. शिवाय मध्यंतरीच्या गारठ्यामुळे केळीच्या मागणीतही घट झाली होती. मात्र, आता परस्थिती बदलतेय. थंडी कमी पडत असल्याने पुन्हा केळीच्या मागणीत सुधारणा होत आहे. एवढेच नाही आवकही वाढत असल्याने बदलत्या परस्थितीचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

Positive News: थंडी कमी होताच केळीच्या दरात वाढ, काय आहे खानदेशातले चित्र?
केळी बागांचे संग्रहीत छायाचित्र
| Updated on: Feb 04, 2022 | 1:24 PM
Share

जळगाव : केळी लागवडीनंतर सर्वकाही प्रतिकूल परस्थिती असताना आता ऐन महत्वाच्या वेळी तरी सकारात्मक बाब समोर येत आहे. खानदेशासह मराठवाड्यातील (Banana Orchard) केळी बागांवर बदलत्या वातावरणाचा आणि करप्या रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे उत्पादनात घट झाली आहे. मध्यंतरी जालना य़ेथील शेतकऱ्यांनी बागाच जमिनदोस्त केल्या होत्या. उत्पादनावरील खर्च आणि प्रत्यक्षात बागांची अवस्था यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. शिवाय मध्यंतरीच्या (Winter) गारठ्यामुळे केळीच्या मागणीतही घट झाली होती. मात्र, आता परस्थिती बदलतेय. थंडी कमी पडत असल्याने पुन्हा (Banana Arrival) केळीच्या मागणीत सुधारणा होत आहे. एवढेच नाही आवकही वाढत असल्याने बदलत्या परस्थितीचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. केळी उत्पादनाबद्दल प्रथमच सकारात्मक वातावरण तयार झाले असून असेच कायम रहावे अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.

आवकही वाढली आणि दरातही सुधारणा

मध्यंतरी थंडीत वाढ झाल्याने मागणी घटली परिणामी शेतकऱ्यांनी सावध भूमिका घेत विक्री करण्याचे टाळले होते. अखेर आता वातावरणात बदल होताच केळाची मागणी वाढली आहे. त्यामुळे बाजारपेठेत आवकही वाढली आहे. मध्यंतरी आवक वाढूनही दर हे कमीच होते. पण आता चित्र बदलतेय किमान 430 रुपये ते 850 पर्यंत प्रतिक्विटलचा दर आहे. जळगावमध्ये दररोज 16 टन केळीची आवक सुरु आहे. गेल्या 4 दिवसांपासून आवक वाढली असल्याचे व्यापारी सांगत आहेत.

परदेशातील निर्यातही लवरच सुरू होणार

सध्या खानदेशातील केळीला दिल्ली, पंजाब, काश्मीर या उत्तरेकडील राज्यातून मागणी होऊ लागली आहे. त्यामुळे दरात काही प्रमाणात का होईना सुधारणा होत आहे. चांगल्या प्रतीच्या केळींना प्रती क्विंटल 850 रुपयांपर्यंतचा दर आहे. शिवाय असेच दर राहिले तर लवकरच परदेशातही निर्यात केली जाणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे निर्यातीवर अंकूश आले होते. मात्र, आता सर्वकाही सुरळीत होईल असा आशावाद शेतकऱ्यांना आहे.

काय होती परस्थिती?

शेतीमालाच्या गुणवत्तेवरच त्याचा दर अवलंबून आहे. यंदा तर सातत्याने वातावरणातील बदलाचा परिणाम थेट उत्पादनावर तर झालेला आहेच शिवाय मालावर झालेला आहे. त्यामुळे खरिपातील सोयाबीन, कापूस, तूर या पिकांना दर्जानुसारच दर मिळाला आहे. आता चांगल्या केळीला 600 रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर खराब झालेल्या मालाला 250 रुपये पर्यंतचा दर मिळत होता. वर्षभर उत्पादन घेण्यासाठी होत असलेला खर्च आणि आता प्रत्यक्ष व्यापाऱ्यांकडून होत असलेली खरेदी यामध्ये मोठी तफावत असल्याने झालेला खर्च कसा काढावा हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.

संबंधित बातम्या :

Seed Production : जे शासनाला जमलं नाही ते कृषी सहायकाने करुन दाखवंल अन् सोयाबीनच्या बाबतीत गाव स्वयंपूर्ण झालं

Cotton Rate: पांढर सोनं अजूनही घरातच, दरावरुन शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम कायम, काय आहे सल्ला?

Pomegranate : खोडकिडीचा परिणाम थेट डाळिंब निर्यातीवर, किडीमुळे उत्पादनात घट नाही तर बागाच नष्ट, वाचा सविस्तर

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.