AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vidarbha Farmer: ‘आमच्याकडे लक्ष देणारं खरोखरच कुणी जन्मलेलं नाहीये अजूनही’ पाहणी करायला आलेल्या अजित पवारांसमोर शेतकऱ्यांची कैफियत

पीककर्ज योजनेपूर्वी आणि आताही शेतकऱ्यांना सावकाराकडून कर्ज घेतल्याशिवाय मार्गच नाही. प्रत्येक शेतकऱ्याला पीककर्ज मिळते असे नाही. त्यामुळे 3 टक्के व्याज दराने किंवा दोन धानाच्या पोत्याला तीन पोते धान द्यावे लागते. आजही शेतकऱ्यांवर कर्जाचा वाढता डोंगर यामुळेच आहे तर दुसरीकडे खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची लूट केली जात आहे.

Vidarbha Farmer: 'आमच्याकडे लक्ष देणारं खरोखरच कुणी जन्मलेलं नाहीये अजूनही' पाहणी करायला आलेल्या अजित पवारांसमोर शेतकऱ्यांची कैफियत
विदर्भातील शेतकऱ्यांनी समस्यांचा पाढाच विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वाचून दाखवला
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Jul 28, 2022 | 10:52 AM
Share

नागपूर : (Farming) शेती व्यवसाय हा पूर्णत: निसर्गावर अवलंबून आहे. दरवर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकांचे नुकसान हे ठरलेलं आहे. त्यानंतर पीक पाहणी, पंचनामे, शेतकऱ्यांच्या भेटीगाठी होतात पण ना कोणती मदत ना यावर काही तोडगा. (Crop Loan) पीक कर्जापूर्वी तर शेतकरी हे सावकाराकडून कर्ज घेऊन शेती कामे करीत होता. शेतकरी हा सर्वकाही दुसऱ्यासाठी करतो पण त्याच्या प्रश्नकडे लक्ष देणारा अजून जन्मलेलाच नाही असे म्हणत एका शेतकऱ्याने सांगा शेती करायची कशी ? असा सवाल त्याने थेट (Ajit Pawar) विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या समोर उपस्थित केला. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेऊन त्यावर तोडगा काढला जावा अशी मागणी शेतकऱ्यांनी विरोधी पक्षनेतने अजित पवार यांच्याकडे केली आहे.

सावकाराकडून कर्ज अन् व्यापाऱ्यांकडून लूट

पीककर्ज योजनेपूर्वी आणि आताही शेतकऱ्यांना सावकाराकडून कर्ज घेतल्याशिवाय मार्गच नाही. प्रत्येक शेतकऱ्याला पीककर्ज मिळते असे नाही. त्यामुळे 3 टक्के व्याज दराने किंवा दोन धानाच्या पोत्याला तीन पोते धान द्यावे लागते. आजही शेतकऱ्यांवर कर्जाचा वाढता डोंगर यामुळेच आहे तर दुसरीकडे खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची लूट केली जात आहे. खरेदी केंद्रावर केवळ व्यापाऱ्यांच्या धानालाच महत्व दिले जाते. व्यापाऱ्यांकडील धान खरेदी करुन केंद्र हे उद्दिष्टपूर्ती करतात. त्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय तर होतोच पण पुन्हा कमी दरात धान हे खुल्या बाजारपेठेत विकण्याची नामुष्की येत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.

दरवर्षीची औपचारिकता, मदतीचे काय?

पीक नुकसान झाले की स्थानिक नेत्यांपासून ते मंत्री, आमदार हे बांधावर येतात. पाहणी, पंचनामे ही औपचारिकता केली जाते पण प्रत्यक्षात भरपाईबाबत कमालीची उदासिनता आहे. धान पिकासाठी शेतकऱ्याला एकरी 25 हजार रुपये एवढा खर्च असतो तर शासकिय मदत ही केवळी 10 ते 12 हजार. त्यामुळे दरवर्षी शेती व्यवसायातून शेतकऱ्यांचा घाटाच झालेला आहे. मदत आणि कायमस्वरुपी तोडगा याकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचेही शेतकऱ्यांनी सांगितले.

अजित पवारांनी ऐकले शेतकऱ्यांची गऱ्हाणे

केवळ पीक पाहणीची औपचारिकता न करता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विदर्भातील शेतकऱ्यांच्या नेमक्या समस्या काय हे देखील जाणून घेतले आहे. केवळ धान पिकांचीच लागवड केली जाते का? वातावरण चांगले असल्यावर उतारा किती पडतो? आता धान लागवडीसाठी रोपे दिली तर काय स्थिती राहिल? या सबंध प्रश्नांची उकल शेतकऱ्यांनीच केली आहे. त्यामुळे केवळ पाहणी नाही तर शेतकऱ्यांचे नेमके गऱ्हाणे काय हे त्यांनी जाणून घेतले आहे. एवढेच नाही तर विदर्भातील शेतकऱ्यांच्या खाण्यापिण्यापासून त्यांनी जाणून घेतले आहे.

Follow Us
ठाकरेंची शिवसेना हाच राजकीय पक्ष, सिब्बल यांचा कोर्टात सर्वात मोठा...
ठाकरेंची शिवसेना हाच राजकीय पक्ष, सिब्बल यांचा कोर्टात सर्वात मोठा युक्तिवाद!
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत मोठा ट्वीस्ट, निवडणुक आयोगाने...
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत मोठा ट्वीस्ट, आमदारांच्या अपात्रतेची वाट पाहयला... कोर्टात नेमका युक्तीवाद काय?
मी आमदारांच्या अपात्रतेबाबत... शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत...
मी आमदारांच्या अपात्रतेबाबत... शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीच्या सुरुवातीलाच कपिल सिब्बल यांनी मांडला महत्त्वाचा मुद्दा
फडणवीसांना दिल्लीत... CM देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याबाबत...
फडणवीसांना दिल्लीत... CM देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याबाबत अमृता फडणवीसांच सर्वात मोठं विधान
हिंजवडीच्या वाहतूक समस्येवर आदित्य ठाकरेंचे लक्ष
आदित्य ठाकरे यांनी केली हिंजवडीतील वाहतूक कोंडी आणि मेट्रो कामाची पाहणी
संजू परब यांचे शिंदे सेना-भाजप संबंधांवर स्पष्टीकरण: वैभव नाईकांना जोर
शिंदे सेना-भाजप संघर्ष आणि निलेश राणे यांच्या कामांवरून वैभव नाईकांना प्रत्युत्तर
पुण्यातील खड्डे, औद्योगिक समस्यांचा पवारांकडून आढावा
पुण्यातील खड्डे, वाहतूक कोंडी आणि औद्योगिक समस्यांवर सुनेत्रा पवारांचे बारिक लक्ष, आढावा घेणार
नाना पटोले यांचा सरकारवर गंभीर आरोप
कुंपणच शेत खातंय.जनतेच्या पैशांची लूट, नाना पटोलेंचा घणाघात
अभिजीत दिपके यांच्या ठीक करो स्कूल अभियानाला गती
अभिजीत दीपकेंच्या स्कूल अभियानाला गती, मागण्या पूर्ण
बर्णे यांची सरकार, निवडणूक आयोगावर बौद्धिक नक्षलवादावरून टीका
बौद्धिक नक्षलवाद आणि निवडणूक प्रक्रियेतील त्रुटींवर श्यामकुमार बर्णे यांची टीका