Agricultural : चर्चा सोयाबीनची अन् क्षेत्र वाढणार कापसाचे, शेतकरीही होतोय कमर्शियल !

यंदा कृषी विभागाच्या दाव्यानुसार सोयाबीनच्या क्षेत्रात घट होणार असली तरी उत्पादकतेमध्ये सूतभरही कमी होणार नाही. सोयाबीनसाठी केवळ मध्य प्रदेशातीलच नव्हे तर महाराष्ट्रातही पोषक वातावरण आहे. त्यामुळे सोयाबीनची उत्पादकता कमी होणार नाही. गतवर्षी सोयाबीनच्या उत्पादकतेमध्ये प्रति हेक्टर 1289 किलो सोयाबीनची वाढ झाली होती तर यंदा हीच वाढ 1463 किलोने होणार आहे.

Agricultural : चर्चा सोयाबीनची अन् क्षेत्र वाढणार कापसाचे, शेतकरीही होतोय कमर्शियल !
कापूस पीक
Follow us
| Updated on: Jun 17, 2022 | 4:31 PM

मुंबई : सध्या (Kharif Season) खरीप हंगामाची लगबग सुरु असून चर्चा आहे ती पेरणीची. धान पीक हे खरीप हंगामातील मुख्य पीक आहे. असे असले तरी मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात सोयाबीन आणि कपाशीच्या उत्पादन क्षेत्रात दिवसेंदिवस वाढ होत आहे. महाराष्ट्रातही (Soybean Crop) सोयाबीनचाच बोलबाला असला तरी यंदा कापूस आणि मक्याचे क्षेत्र वाढणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. पीक पध्दतीमध्ये असाच बदल होत नाही तर त्यामागे कारणेही तशीच आहेत. ज्या पिकातून अधिकचे उत्पन्न मिळणार त्याच पिकांवर शेतकरी भर देणार आहेत. बाजारपेठीतील मागणी शेतीमालाचे दर हे पाहून शेतकरी (Crop Change) पीक पध्दती ठरवित आहे. महाराष्ट्रात तब्बल 51 लाख हेक्टरावर सोयाबीनचे पीक घेतले जाते तर मध्य प्रदेशातील उज्जैन विभागात 19. लाख 14 हजार हेक्टरावर लागवड करण्यात आली आहे तर यंदा 3 लाख हेक्टाराने घट होऊ शकते.

उत्पादकतेमध्ये मात्र, सोयाबीनच भारी

यंदा कृषी विभागाच्या दाव्यानुसार सोयाबीनच्या क्षेत्रात घट होणार असली तरी उत्पादकतेमध्ये सूतभरही कमी होणार नाही. सोयाबीनसाठी केवळ मध्य प्रदेशातीलच नव्हे तर महाराष्ट्रातही पोषक वातावरण आहे. त्यामुळे सोयाबीनची उत्पादकता कमी होणार नाही. गतवर्षी सोयाबीनच्या उत्पादकतेमध्ये प्रति हेक्टर 1289 किलो सोयाबीनची वाढ झाली होती तर यंदा हीच वाढ 1463 किलोने होणार आहे. यामध्ये सर्वात महत्वाचे सिंचनाची सोय या हंगामात असते तर आता खरीप हंगामात पिके ही पावसाच्या पाण्यावर वाढत असतात. असे असले तरी अजूनही शेतकऱ्यांना पावसाची प्रतिक्षा आहे.

कापूस पेरणीला सुरवात

सध्या पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांनी पेरणीसाठी शेतकऱ्यांनी हात आखडता घेतला असला तरी अधिकतर क्षेत्रावर कपाशीचा पेरा झाला आहे. हंगामपूर्व काळातच शेतकऱ्यांनी कापसाचा पेरा केला आहे. शिवाय ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता आहे ते शेतकरी कापसावरच भर देत आहेत. शिवाय गतवर्षी कापसाला विक्रमी दर मिळाला होता.14 हजार रुपये क्विंटल दर मिळाला असे असूनही कापसाला मागणी कायम आहे. तर दुसरीकडे सोयाबीनचे दर हे 7 हजार रुपये क्विंटलपेक्षा अधिक मिळाला नव्हता. दरातील या तफावतीमुळे कापसाचे क्षेत्र वाढणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे.

हे सुद्धा वाचा

खरीप हंगामाच्या क्षेत्रातच होणार वाढ

खरीप हंगामात प्रामुख्याने सोयाबीन, कापूस, मका, डाळींब या पिकांची लागवड करतात. या वेळी या भागातील एकूण खरीप पिकांच्या क्षेत्रात किरकोळ वाढ होऊ शकते असा अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे. मध्यप्रदेशातील इंदोर विभागात 22 लाख 47 हेक्टरावर खरीप पिके घेतली जातात. तर एकट्या महाराष्ट्रात जवळपास 51 लाख हेक्टरावर सोयाबीन हे एक पीक घेतले जाते. शिवाय अर्थार्जनाच्या दृष्टीने खरीप हंगामाच महत्वाचे असल्याने क्षेत्रात वाढ होईल असा अंदाज आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.