flower farming : केंद्रीय कृषी मंत्र्यांनीच दिले फुलशेतीमधून उत्पादन वाढीच धडे, वाचा सविस्तर

फुलशेतीचे क्षेत्र वाढत आहे पण त्याप्रमाणात उत्पादन नाही. आजही फुलशेती ही केवळ छंद म्हणूनच केली जात आहे. मात्र, काळाच्या ओघात आता ग्राहकांची मागणी आणि बाजारपेठेचे सुत्र हे बदलत आहे. त्यामुळे वाढत्या क्षेत्राबरोबर या फुलशेतीच्या माध्यमातून उत्पादन वाढीसाठीही प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे मत केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी व्यक्त केले आहे.

flower farming : केंद्रीय कृषी मंत्र्यांनीच दिले फुलशेतीमधून उत्पादन वाढीच धडे, वाचा सविस्तर
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Jan 04, 2022 | 3:53 PM

पुणे : (Flower farming) फुलशेतीचे क्षेत्र वाढत आहे पण त्याप्रमाणात उत्पादन नाही. आजही फुलशेती ही केवळ छंद म्हणूनच केली जात आहे. मात्र, काळाच्या ओघात आता ग्राहकांची मागणी आणि बाजारपेठेचे सुत्र हे बदलत आहे. त्यामुळे वाढत्या क्षेत्राबरोबर या फुलशेतीच्या माध्यमातून (increase in production) उत्पादन वाढीसाठीही प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे मत केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी व्यक्त केले आहे. मंगळवारी पुण्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फ्लॉवर रिसर्चमध्ये पायाभूत सुविधा म्हणून प्रयोगशाळेच्या इमारतीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. तोमर म्हणाले की, देशाच्या परंपरा, धार्मिक-सामाजिक -राजकीय इत्यादी घटनांनुसार फुलांची गरज अजूनही आहे. निर्यातीच्या दृष्टीकोनातून फुलांच्या व्यापारातही बरीच व्याप्ती आहे. त्याचबरोबर आपल्या देशाचे वैविध्यपूर्ण वातावरण इतके समृद्ध आहे की फुलशेती बऱ्यापैकी वाढू शकते.

केंद्र सराकारकडून फुलशेतीला प्रोत्साहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी क्षेत्राच्या विकासासाठी अनेक योजना आखल्या आहेत. त्याचा फायदा थेट शेतकऱ्यांना होत आहे. केवळ अथक परिक्षमानेच उत्पादनात वाढ होईल असे नाही तर त्याला तंत्रज्ञानाची जोड लागतेच. म्हणून फुलशेती हा तरुण शेतकऱ्यांसाठी चांगला पर्याय आहे. फुलशेतीला चालना देण्यासाठी सरकार नियोजित पद्धतीने ही काम करत आहे. कृषी उत्पादनांनी जागतिक मानकांची पूर्तता केली पाहिजे असेही यावेळी कृषी मंत्री यांनी सांगितले.

फुलांचा सुगंध कमी करू नका, संशोधन शास्त्रज्ञांमध्ये लक्षात ठेवा

नवनविन संशोधनातून शेती व्यवसयाचा विकास साधला जात आहे. त्यामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञान समोर येत असून अनेकांच्या हाताला कामही मिळत आहे. या कार्यक्रमाच्या दरम्यान त्यांनी संशोधकांना सांगितले की, नवीन वाणांच्या विकासात आणि संशोधनात फुलांचा सुगंध कमी होऊ नका. फुले भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवून देण्यासाठी महत्वाची आहेत. याची काळजी घेतली पाहिजे, कारण सुगंधाला स्वतःचे महत्त्व आहे.

नवीन वाण शेतकऱ्यांच्या बांधावर जाणे गरजेचे : चौधरी

प्रयोगशाळांमध्ये नवनविन वाणांचे संशोधन केले जाते पण त्या तुलनेत त्याचा वापर होत नाही. अनेकवेळा संशोधनाच्या दरम्यान मोठा गाजावाजा होतो पण ऐन वेळी हे वाण अडोश्यालाच असते. त्यामुळे संशोधन झालेले वाण थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाईल अशी व्यवस्था करण्याची त्यांनी मागणी केली. नविन वाणांचे संशोधन ही अभिमानाची बाब असून त्याचा शेतकऱ्यांनी उपयोग केला तरच त्याचे चीज होणार असल्याचे राज्यमंत्री कैलास चौधरी यांनी सांगितले. यावेळी आयसीएआरचे महासंचालक डॉ. त्रिलोचन महापात्रा, उपमहासंचालक डॉ. के.व्ही. प्रसाद, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फ्लॉवर रिसर्च अँड हॉर्टिकल्चर फार्मर्सचे संचालक डॉ. के. व्ही. प्रसाद यावेळी उपस्थित होते.

संबंधित बातम्या :

Pik Vima : रब्बी हंगाम मध्यावर तरी शेतकऱ्यांना प्रतीक्षा खरिपातील पीक विम्याचीच, बीडमध्ये निदर्शने

शेतकऱ्यांची मंदीत संधी, लॉकडाउनच्या काळातही शेती व्यवसयात कोट्यावधींची गुंतवणूक..!

आता निर्णायक टप्पा, सोयबीन ठेवायचे की विकायचे ! बाजारपेठेतले वास्तव काय ?

Non Stop LIVE Update
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?.
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग.
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला.
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग.