AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

द्राक्ष बाग जोपासण्यासाठी सोनं गहाण ठेवलं, पण अवकाळीमुळं सर्वकाही पाण्यात गेलं

सोलापूर जिल्ह्यातील बीबीदारफळच्या एका महिलेने तर द्राक्षाची बाग जोपासण्यासाठी पतीच्या निधनानंतर सोने गहाण ठेवले आणि मुलाला हाताशी घेऊन परिश्रम केले. मात्र, द्राक्षे तोडणी अवघ्या 10 दिवसावर असताना अवकाळीची अवकृपा झाली आणि सर्वकाही होत्याचे नव्हते झाले आहे.

द्राक्ष बाग जोपासण्यासाठी सोनं गहाण ठेवलं, पण अवकाळीमुळं सर्वकाही पाण्यात गेलं
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: | Updated on: Dec 14, 2021 | 11:47 AM
Share

सोलापूर : अवकाळी पावसाने शेतकऱ्याचं कंबरडेच मोडले आहे. केवळ हंगामी पिकांचेच नाही तर फळबागायत (Farmer) शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. डिसेंबर महिन्याच्या सुरवातीला झालेल्या अवकाळीमुळे हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेतला आहे. सोलापूर जिल्ह्यातील बीबीदारफळच्या एका महिलेने तर द्राक्षाची बाग जोपासण्यासाठी पतीच्या निधनानंतर सोनं गहाण ठेवले आणि मुलाला हाताशी घेऊन परिश्रम केले. मात्र, (damage to vineyards) द्राक्षे तोडणी अवघ्या 10 दिवसावर असताना अवकाळीची अवकृपा झाली आणि सर्वकाही होत्याचे नव्हते झाले आहे. या पावसामुळे घडामध्ये कुजगळ झाली असून उभ्या देठांनाच मुळ्या आल्याचे चित्र बागांमध्ये पाहवयास मिळत आहे.

बीबीदारफळच्या शेतकरी महिलेची व्यथा

पतीच्या निधनानंतर द्राक्ष बाग मोडायची नाही तर जोपासायची असा निर्धार करुन बीबीदारफळच्या प्रतिभा चिकणे यांनी मुलाला हाताशी घेऊन बाग जोपासण्याचे काम केले. औषध फवारणीसाठी पैसाची गरज असताना त्यांनी सोनं गहाण ठेवलं पण निर्धार सोडला नाही. पण त्यांचे हे अथक परिश्रम नियतीलाही मान्य नव्हते. अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागेचे मोठे नुकसान झाले आहे. द्राक्षाच्या घडातच पाणी गेल्याने घडकुज झाली आहे. आता न भरुन निघणारे नुकसान झाले. उत्पादन तर सोडाच पण आता गहाण ठेवलेलं सोनं सोडवायचे कसे असा सवाल त्यांच्या समोर आहे.

2 लाख एकरांवरील बागांचे नुकसान

राज्यात 5 लाख एकरावर द्राक्षे बागांची लागवड केली जाते. गेल्या काही दिवसांपासून अधिकच्या उत्पादनामुळे शेतकऱ्यांचा कल याकडे वाढत आहे. मात्र, निसर्गाची साथ मिळत नाही. त्यामुळे उत्पादनावर झालेला खर्चही निघणे मुश्किल होत आहे. गेल्या 3 वर्षात अवकाळी पावसामुळे तब्बल 26 लाख हेक्टरावरील पिकांचे नुकसान झालेले आहे. तर मध्यंतरी झालेल्या अवकाळीमुळे तब्बल 2 लाख एकरावरील बागांचे नुकसान झाले असल्याचे द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष शिवाजी पवार यांनी सांगितले आहे. त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील द्राक्ष बागांची पाहणी केली होती.

शासन दरबारी मदतीची मागणी

अवकाळीचा फटका सर्वच पिकांना बसलेला आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसान झाले आहे ते द्राक्ष आणि आंबा पिकाचे. द्राक्ष तोडणी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली होती. याच दरम्यान, सबंध राज्यभर झालेल्या अवकाळी पावसामुळे घडकुज झाली आहे. त्यामुळे बागायत शेतकऱ्यांना येणारा खर्च व त्या तुलनेत न मिळणाऱ्या उत्पादनाची सांगड घालून शासनाकडे मदतीची मागणी केली जाणार असल्याचे शिवाजी पवार यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

पुढे धोका आहे…! फरदड कापूस नुकसानीचा असतानाही का घेत आहेत शेतकरी उत्पादन?

शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी : कृषी पंपाच्या थकबाकीतून मुक्त होण्यासाठी महावितरणची भन्नाट योजना, 15 हजार कोटींची माफी

अवकाळीनंतर डाऊनी मिल्डयुचा वाढतोय प्रादुर्भाव, द्राक्ष खराब होण्यापूर्वी असे करा नियंत्रण

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.