AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

द्राक्ष बाग जोपासण्यासाठी सोनं गहाण ठेवलं, पण अवकाळीमुळं सर्वकाही पाण्यात गेलं

सोलापूर जिल्ह्यातील बीबीदारफळच्या एका महिलेने तर द्राक्षाची बाग जोपासण्यासाठी पतीच्या निधनानंतर सोने गहाण ठेवले आणि मुलाला हाताशी घेऊन परिश्रम केले. मात्र, द्राक्षे तोडणी अवघ्या 10 दिवसावर असताना अवकाळीची अवकृपा झाली आणि सर्वकाही होत्याचे नव्हते झाले आहे.

द्राक्ष बाग जोपासण्यासाठी सोनं गहाण ठेवलं, पण अवकाळीमुळं सर्वकाही पाण्यात गेलं
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Dec 14, 2021 | 11:47 AM
Share

सोलापूर : अवकाळी पावसाने शेतकऱ्याचं कंबरडेच मोडले आहे. केवळ हंगामी पिकांचेच नाही तर फळबागायत (Farmer) शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. डिसेंबर महिन्याच्या सुरवातीला झालेल्या अवकाळीमुळे हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेतला आहे. सोलापूर जिल्ह्यातील बीबीदारफळच्या एका महिलेने तर द्राक्षाची बाग जोपासण्यासाठी पतीच्या निधनानंतर सोनं गहाण ठेवले आणि मुलाला हाताशी घेऊन परिश्रम केले. मात्र, (damage to vineyards) द्राक्षे तोडणी अवघ्या 10 दिवसावर असताना अवकाळीची अवकृपा झाली आणि सर्वकाही होत्याचे नव्हते झाले आहे. या पावसामुळे घडामध्ये कुजगळ झाली असून उभ्या देठांनाच मुळ्या आल्याचे चित्र बागांमध्ये पाहवयास मिळत आहे.

बीबीदारफळच्या शेतकरी महिलेची व्यथा

पतीच्या निधनानंतर द्राक्ष बाग मोडायची नाही तर जोपासायची असा निर्धार करुन बीबीदारफळच्या प्रतिभा चिकणे यांनी मुलाला हाताशी घेऊन बाग जोपासण्याचे काम केले. औषध फवारणीसाठी पैसाची गरज असताना त्यांनी सोनं गहाण ठेवलं पण निर्धार सोडला नाही. पण त्यांचे हे अथक परिश्रम नियतीलाही मान्य नव्हते. अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागेचे मोठे नुकसान झाले आहे. द्राक्षाच्या घडातच पाणी गेल्याने घडकुज झाली आहे. आता न भरुन निघणारे नुकसान झाले. उत्पादन तर सोडाच पण आता गहाण ठेवलेलं सोनं सोडवायचे कसे असा सवाल त्यांच्या समोर आहे.

2 लाख एकरांवरील बागांचे नुकसान

राज्यात 5 लाख एकरावर द्राक्षे बागांची लागवड केली जाते. गेल्या काही दिवसांपासून अधिकच्या उत्पादनामुळे शेतकऱ्यांचा कल याकडे वाढत आहे. मात्र, निसर्गाची साथ मिळत नाही. त्यामुळे उत्पादनावर झालेला खर्चही निघणे मुश्किल होत आहे. गेल्या 3 वर्षात अवकाळी पावसामुळे तब्बल 26 लाख हेक्टरावरील पिकांचे नुकसान झालेले आहे. तर मध्यंतरी झालेल्या अवकाळीमुळे तब्बल 2 लाख एकरावरील बागांचे नुकसान झाले असल्याचे द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष शिवाजी पवार यांनी सांगितले आहे. त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील द्राक्ष बागांची पाहणी केली होती.

शासन दरबारी मदतीची मागणी

अवकाळीचा फटका सर्वच पिकांना बसलेला आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसान झाले आहे ते द्राक्ष आणि आंबा पिकाचे. द्राक्ष तोडणी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली होती. याच दरम्यान, सबंध राज्यभर झालेल्या अवकाळी पावसामुळे घडकुज झाली आहे. त्यामुळे बागायत शेतकऱ्यांना येणारा खर्च व त्या तुलनेत न मिळणाऱ्या उत्पादनाची सांगड घालून शासनाकडे मदतीची मागणी केली जाणार असल्याचे शिवाजी पवार यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

पुढे धोका आहे…! फरदड कापूस नुकसानीचा असतानाही का घेत आहेत शेतकरी उत्पादन?

शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी : कृषी पंपाच्या थकबाकीतून मुक्त होण्यासाठी महावितरणची भन्नाट योजना, 15 हजार कोटींची माफी

अवकाळीनंतर डाऊनी मिल्डयुचा वाढतोय प्रादुर्भाव, द्राक्ष खराब होण्यापूर्वी असे करा नियंत्रण

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक