Weather Alert | रत्नागिरी सिंधुदुर्गला रेड ॲलर्ट, पुढील चार दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा

भारतीय हवामान विभागाच्या मुंबई विभागानं राज्यातील पुढील पाच दिवसांचा हवामानाचा अंदाज जाहीर केला आहे. पुढील पाच दिवसात राज्यातील काही जिल्ह्यांना रेड अ‌ॅलर्ट तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.

Weather Alert | रत्नागिरी सिंधुदुर्गला रेड ॲलर्ट, पुढील चार दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Jul 10, 2021 | 8:04 PM

मुंबई: भारतीय हवामान विभागाच्या मुंबई विभागानं राज्यातील पुढील पाच दिवसांचा हवामानाचा अंदाज जाहीर केला आहे. पुढील पाच दिवसात राज्यातील काही जिल्ह्यांना रेड अ‌ॅलर्ट तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. ज्येष्ट हवामानतज्ज्ञ के. एस.होसाळीकर यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. (IMD Mumbai issue weather and monsoon alert for next five days in state)

रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला रेड अ‌ॅलर्ट भारतीय हवामान विभागानं रविवार 11 जुलैचा अ‌ॅलर्ट जारी करताना रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांना रेड अ‌ॅलर्ट जारी केला आहे. तर, पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अ‌ॅलर्ट जारी केला आहे. तर, पुणे सातारा, बीड, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम, बुलडाणा, अकोला, अमरावती, चंद्रपूर आणि गडचिरोलीसाठी येलो अ‌ॅलर्ट जारी केला आहे.

सोमवारी काही जिल्ह्यांना ऑरेंज अ‌ॅलर्ट

भारतीय हवामान विभागानं सोमवारी 12 जुलैसाठी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा दिला आहे. पालघर, ठाणे, मुंबई, पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांना ऑरेंज अ‌ॅलर्ट दिला आहे. तर या दिवशी नाशिक, बुलडाणा, वाशिम, परभणी, हिंगोली,नांदेड आणि लातूरमध्ये पावासाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

भारतीय हवामान विभागानं मंगळवारी 13 जुलैसाठी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा दिला आहे. पालघर, ठाणे, मुंबई, पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांना ऑरेंज अ‌ॅलर्ट दिला आहे. तर या दिवशी परभणी, हिंगोली,नांदेड पावासाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे या जिल्ह्यांना येलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.

भारतीय हवामान विभागानं बुधवारी 14 जुलैसाठी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा दिला आहे. पालघर, ठाणे, मुंबई, पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांना ऑरेंज अ‌ॅलर्ट दिला आहे. तर जालना परभणी, हिंगोली,नांदेड आणि लातूरमध्ये पावासाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार पाऊस झाल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

इतर बातम्या:

Weather Alert : राज्यात आजपासून मुसळधार, पुढील 4 दिवस कुठे-कधी पाऊस?

Weather Update: राज्यात पावसाचा मोठा खंड, पिकं करपू लागली, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट

(IMD mumbai issue weather and monsoon alert for next five days in state)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.