AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sugarcane : ऊस गाळपात पश्चिम महाराष्ट्र अव्वलस्थानी, ‘विठ्ठल’ च्या दोन युनिटचे गाळप 30 लाख मेट्रीक टन

यंदा अतिरिक्त उसाचा प्रश्न राज्यात गाजत आहे. असे असताना शेतकऱ्यांना फडातील उभ्या उसाबाबत चिंता असताना त्यांना धीर देणेच हेच महत्वाचे आहे. प्रशासकीय स्तरावर प्रयत्न होत असले तरी अंमलबजावणी करणे हे साखर कारखान्यांच्या हातामध्येच आहे. त्यामुळेच कारखान्याची भूमिका स्थानिक पातळीवर महत्वाची आहे. मराठवाड्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर झाला आहे.

Sugarcane : ऊस गाळपात पश्चिम महाराष्ट्र अव्वलस्थानी, 'विठ्ठल' च्या दोन युनिटचे गाळप 30 लाख मेट्रीक टन
साखऱ कारखाना
| Edited By: | Updated on: May 01, 2022 | 9:35 AM
Share

माढा : यंदाचा (Sugarcane Sludge) ऊस गाळप हंगाम सुरु होऊन 7 महिन्याचा कालावधी लोटला तरी अजून हंगाम सुरुच आहे. वाढत्या क्षेत्रामुळे यंदा अतिरिक्त उसाचा प्रश्न कायम आहे. पण याची तीव्रता (Western Maharashtra) पश्चिम महाराष्ट्रात कमी आहे. कारखाना प्रशासनाचे नियोजन आणि (Sugar Factory) उसाच्या नोंदीनुसार तोड यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे नुकसान टळले आहे. देशात ऊस गाळपात आघाडीवर असलेल्या विठ्ठलराव शिंदे या कारखान्याने आपले वेगळेपण यंदाही कायम ठेवले आहे. विक्रमी गाळप तर झालेच आहे पण कार्यक्षेत्र सोडून या भागातील एकाही शेतकऱ्याच्या उसाचे टिपरु हे शिल्लक ठेवणार नसल्याचे आश्वासन कारखान्याचे चेअरमन तथा आ. बबनराव शिंदे यांनी दिले आहे. हंगाम अतिम टप्प्यात असला तरी शेवटच्या शेतकऱ्याचा उसतोड झाल्याशिवाय धुराडी बंद होणार नाही असेही त्यांनी सांगितले आहे.

युनिट 2 गाळप 30 लाख मेट्रीक टनाचे

माढा तालुक्यात विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचे 2 युनिट आहेत. शिवाय या भागात वाढते उसाचे क्षेत्र यामुळे क्षमतेपेक्षा अधिकचे गाळप हे ठरलेले आहे. देशात सर्वाधिक उसाचे गाळप हे विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचे राहिलेले आहे. यंदाही गाळपात सातत्य राहिल्याने पिंपळनेर आणि कुर्डवाडी येथील कारखान्यातून 30 लाख मेट्रीक टनाचे उत्पादन झाले आहे. या भागातील शेतकऱ्यांसाठी हे दोन्ही साखर कारखाने हे वरदान ठरले आहेत. शेतकऱ्यांच्या उसाची वेळेत तोड झाल्याने संभाव्य नुकसान टळले आहे.

उसाच्या फडात टिपूरही राहणार नाही

यंदा अतिरिक्त उसाचा प्रश्न राज्यात गाजत आहे. असे असताना शेतकऱ्यांना फडातील उभ्या उसाबाबत चिंता असताना त्यांना धीर देणेच हेच महत्वाचे आहे. प्रशासकीय स्तरावर प्रयत्न होत असले तरी अंमलबजावणी करणे हे साखर कारखान्यांच्या हातामध्येच आहे. त्यामुळेच कारखान्याची भूमिका स्थानिक पातळीवर महत्वाची आहे. मराठवाड्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर झाला आहे. असे असतानाही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचे काम येथील कारखान्यांकडून होत आहे. तर दुसरीकडे सभासदांच्या उसाची तर तोड झालीच आहे पण लगतच्या भागातील उस तोडणीची जबाबदारी पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी घेतली आहे..

लोकप्रतिनिधींचा शेतकऱ्यांना आधार

ऊस गाळपाची जबाबदारी केवळ प्रशासनाची नाही तर स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनीधींचीही आहे. शेतकऱ्यांच्या समस्या ओळखून आ. बबनराव शिंदे यांनी शेतकऱ्यांनी गाळपाअभावी नुकसान होणार नाही असे आश्वासन तर दिलेच पण त्याची पूर्तताही केली. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा निपटारा होत असून साखर कारखान्याचे गाळपही देशात अव्वल क्रमांकावर आहे.

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.