AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Agricultural : 2050 मध्ये शेती व्यवसायाचे काय असेल चित्र? ‘आयपीसीसी’चा धक्कादायक अहवाल

वातावरणातील बदलाचे परिणाम हा केवळ भारतीयांसाठीच नाही तर संपूर्ण जगासाठीचा चिंतेचा विषय झालेला आहे. आयपीसीसी अर्थात (Impact Of Climate Change) ने वर्तवलेला अंदाज धक्कादायक आहे. आयपीसीसी एआर 6 डब्ल्यूजीआयआयएसल क्लायमेट चेंज 2022 या नावाने प्रसिद्ध केलेल्या सहाव्या मूल्यांकन अहवालात हवामान बदलाचे परिणाम येत्या काही वर्षांत काय राहतील व शेती व्यवसायाला कोणत्या बाबींचा सामना करावा लागेल याबद्दल उल्लेख केले आहे.

Agricultural : 2050 मध्ये शेती व्यवसायाचे काय असेल चित्र? 'आयपीसीसी'चा धक्कादायक अहवाल
वातावरणातील बदलामुळे 2050 मध्ये मका उत्पादनात घट होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Mar 08, 2022 | 10:54 AM
Share

मुंबई :  (Climate change) वातावरणातील बदलाचे परिणाम हा केवळ भारतीयांसाठीच नाही तर संपूर्ण जगासाठीचा चिंतेचा विषय झालेला आहे. आयपीसीसी अर्थात (Impact Of Climate Change) ने वर्तवलेला अंदाज धक्कादायक आहे. आयपीसीसी एआर 6 डब्ल्यूजीआयआयएसल क्लायमेट चेंज 2022 या नावाने प्रसिद्ध केलेल्या सहाव्या (Assessment Report) मूल्यांकन अहवालात हवामान बदलाचे परिणाम येत्या काही वर्षांत काय राहतील व शेती व्यवसायाला कोणत्या बाबींचा सामना करावा लागेल याबद्दल उल्लेख केले आहे. याचा सर्वाधिक परिणाम हा भारतामध्ये होणार असून कारण आजही शेती व्यवसयावरच येथील लोकसंख्या ही अवलंबून आहे. हवामान बदलामुळे समुद्राची पातळी वाढेल, असं या अहवालात म्हटलं आहे. भारतात त्याचा मोठा परिणाम होईल. पाण्याची पातळी वाढल्याने जमीन पाण्याखाली जाणार आहे. याशिवाय किनारपट्टीच्या भागात पुराचा सामना करावा लागणार असून खारे पाणी शेतात शिरणार आहे. ज्यामुळे शेतीयोग्य जमीन खराब होईल. यामुळे मका आणि इतर पिकांच्या उत्पादनात मोठी घट होणार असल्याचा अंदाज आहे.

आर्थिक नुकसानीचाही करावा लागणार सामना

आयपीसीसी अहवालानुसार, भारतातील सुमारे 3 कोटी 50 लाख किनारपट्टीलगतच्या नागरिकांना पुराचा सामना करावा करावा लागु शकतो. जर पाण्याचे उत्सर्जन मोठ्या प्रमाणात झाले तर शतकाच्या अखेरीस 4 कोटी 50 लाख लोकांना धोका निर्माण होईल, असे सांगण्यात आले आहे. समुद्रसपाटीपासूनचा भाग आणि नदीला येणाऱ्या पुरामुळे सर्वाधिक हानी ही भारताचीच होणार आहे. मात्र, ही प्रक्रिया अटोक्यात आली नाही आणि बर्फाची चादर स्थिर राहिली तरी भारताला थेट 2 लाख 72 हजार कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागणार आहे. मात्र, दिलेल्या आश्वासनानुसार उत्सर्जन कमी झाले तर 1 लाख 81 हजार कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे.

तापमानात होणार वाढ

वातावरणातील बदलामुळे भारताला तीव्र उन्हाचा सामना करावा लागणार आहे. या अहवालात याला ‘बल्ब तापमान’ असं नाव देण्यात आलं आहे. अहवालातील अंदाजित आकडा 31 अंश सेल्सिअस आहे. अहवालानुसार, भारतातील अनेक भागात ओल्या बल्बचे तापमान केवळ 25 ते 30 अंश सेल्सिअस आहे.तर ती कधीही 31 अंशांची हीथर नसते. मात्र, या शतकाच्या अखेरीस अधिक उत्सर्जनामुळे पाटणा आणि लखनऊमध्ये ओल्या बल्बचे तापमान 35 अंशांपर्यंत पोहोचेल, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. वातावणात अधिकचा बदल झाला तर भुवनेश्वर, चेन्नई, इंदूर आणि अहमदाबाद येथील ओल्या बल्बचे तापमानही वाढेल.

पिकांच्या उत्पादनावरही होणार परिणाम

Weather.com दिलेल्या माहितीनुसार, तापमानात तर वाढ होणारच आहे पण थंडी आणि पावसाचे प्रमाणही वाढणार आहे. यामुळे पिकांचे नुकसान होऊन उत्पादनात घट होणार आहे. तापमान असेच वाढत राहिले तर जगभरात पीक उत्पादनात घट होईल. यात सर्वाधिक नुकसान भारतालाच होणार आहे. 2050 पर्यंत तांदूळ, गहू, डाळी आणि धान्याचे उत्पादन 9 टक्क्यांनी कमी होईल. दक्षिण भारतातील मक्याचे उत्पादन 17 टक्क्यांनी घटणार आहे. यामुळे देशभरातील अन्नधान्याचे भाव वाढून याचा परिणाम आर्थिक बाबींवर होणार आहे.

संबंधित बातम्या :

दोन्ही कर्जमाफी योजनांमधून सुटलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार का? : पटोलेंचा अधिवेशनात सवाल

शेतकऱ्यांच्या तक्रारींचे झाले तरी काय? कृषी मंत्र्यांचे भाकीत खरे ठरले पण विमा कंपन्यांनी नाही जुमानले..!

कृषी विभागाच्या एका निर्णयामुळे हळदीला चढणार ‘पिवळा’ रंग, नेमके धोरण काय ? वाचा सविस्तर

Follow Us
खड्डे, बंद कंपन्या आणि बेरोजगारी! वाजेंनी सरकारला एकाच वेळी घेरलं
Rajabhau Waje | खड्डे, बंद कंपन्या आणि बेरोजगारी! राजाभाऊ वाजेंनी सरकारला एकाच वेळी घेरलं
शिवसेनेच्या आमदारांना पवईच्या हॉटेलमध्ये... नरेश म्हस्के काय म्हणाले?
शिवसेनेच्या आमदारांना पवईच्या हॉटेलमध्ये... नरेश म्हस्केंनी सांगितलं पक्ष फुटीच्या अगदी काही दिवसांपूर्वी काय काय घडलं होतं?
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन.... शिंदे गटातील नेत्याचं विधान
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन नाहीतर.... शिंदे गटातील बड्या नेत्याचं राऊतांना खुलं चॅलेंज
मुंबईत मध्यरात्री मोठी दुर्घटना! घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली....
मुंबईत मध्यरात्री मोठी दुर्घटना! घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली, ५-६ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
संजय राऊतांची सुप्रीम कोर्टाकडे मोठी मागणी! चुकीच्या लोकांच्या...
संजय राऊतांची सुप्रीम कोर्टाकडे मोठी मागणी! चुकीच्या लोकांच्या हातात शिवसेनेचं चिन्ह...
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? राऊतांचं मोठं विधान; म्हणाले…
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? निकालाआधी राऊतांचं मोठं विधान; म्हणाले…
राऊतांनी म्हस्केंना बोलावलं अन् पुढे जे घडलं ते पाहून सगळेच हसले!
Sanjay Raut - Naresh Mhaske | सुप्रीम कोर्टाबाहेर राऊतांनी म्हस्केंना बोलावलं अन् पुढे जे घडलं ते पाहून सगळेच हसले!
राज ठाकरे अचानक फडणवीसांच्या भेटीला! भेटीचं नेमकं कारण काय?
मोठी बातमी! भाजपवर टीका अन् अचानक मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला! राज ठाकरेंच्या भेटीचं नेमकं कारण काय?
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?