AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रिलायन्स विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांविरोधात पहिला गुन्हा परभणीत, बुलढाण्यात काय होणार?

खरीप हंगामातील पिकांच्या नुकसानीबद्दल विविध निकषांआधारे विमा परतावा देण्याचे आदेश जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी दिले आहेत. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांविरुद्ध परभणी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रिलायन्स विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांविरोधात पहिला गुन्हा परभणीत, बुलढाण्यात काय होणार?
हरियाणातील पलवलमध्ये तीन मित्रांकडून मुस्लिम तरुणाची मारहाण करुन हत्या
| Edited By: | Updated on: Nov 19, 2021 | 3:08 PM
Share

परभणी : पीकविमा रकमेच्या परताव्यावरुन ( Reliance General Crop Insurance Company) रिलायन्स विमा कंपनी चांगलीच चर्चेत आहे. एकतर या विमा कंपनीने अद्यापपर्यंत एकाही शेतकऱ्याच्या खात्यावर अनुदान रक्कम अदा केलेली नाही. ( Kharif Crop Insurance) खरीप हंगामातील पिकांच्या नुकसानीबद्दल विविध निकषांआधारे विमा परतावा देण्याचे आदेश जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी दिले आहेत. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांविरुद्ध परभणी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे बुलढाण्यात पिक पंचनामे करण्यासाठी शेतकऱ्यांकडून 500 रुपये घेतल्याची तक्रार नमूद करण्यात आली आहे.

रिलायन्स जनरल क्रॉप इन्शुरन्स कंपनीकडे राज्यातील 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक विम्याची रक्कम अदा केली आहे. मात्र, केंद्र सरकारमधील मतभेदामुळे या कंपनीने एकाही शेतकऱ्याच्या खात्यावर रक्कम जमा केलेली नाही. तर दुसरीकडे याच कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे गैरप्रकार आता समोर येत आहेत.

परभणीत दोघांविरोधात गुन्हा दाखल

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक नुकसानीच्या अनुशंगाने रिलायन्स जनरल क्रॉप इन्शुरन्स कंपनीकडे विमा रक्कम भरलेली आहे. या पिकांच्या नुकसानीबद्दल विविध निकषांच्याआधारे विमा परतावा देण्याचे आदेश जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी दिले आहेत. मात्र, कंपनीचे कामकाज पाहणारे राज्य समन्वयक प्रमोद पाटील, विजय मोरे यांच्याकडून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाकडे कायम दुर्लक्ष होत आहे. त्यामुळेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा जिल्हा पीकविमा समितीचे सदस्य सचिव विजय लोखंडे यांनी परभणी येथील नवा मोंढा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून या दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

विमा परतावा देण्यास कंपनीची टाळाटाळ

जिल्ह्यातील 23 महसूल मंडळांतील सोयाबीनच्या उत्पादनात 50 टक्क्यांपेक्षा जास्त घट गृहित धरुन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी 24 ऑगस्ट रोजी अधिसूचना निर्गमित केली आहे. त्यानुसार एक महिन्याच्या आत पात्र शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रिम विमा परताव्याची रक्कम देण्याची तरतूद असताना देखील अद्याप एकाही शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळाली नाही. उभ्या पिकाच्या नुकसानीबाबत आणि काढणीपश्‍चात नुकसानीच्या 2 हजार शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे तक्रारी दाखल केलेल्या आहेत. यानंतर एक महिन्याच्या आतमध्ये शेतकऱ्यांना रक्कम अदा करणे हे बंधनकारक आहे. मात्र, याकडे कंपनीचे आणि येथील विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

बुलढाण्यामध्ये कर्मचाऱ्याने फसवणूक केल्याची तक्रार

एकीकडे केंद्र सरकार आणि विमा कंपनीच्या वादामुळे 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विमा अनुदानाचे रक्कम अद्यापही वितरीत केलेले नाही. एकीकडे नियमावर बोट ठेवत हे पाऊल उचलले असल्याचे कंपनीकडून सांगण्यात येत असले तरी दुसरी विमा कंपनीच्या प्रतिनीधीकडून शेतकऱ्यांची लूट होत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शिरपूर, माळवंडी येथे पंचनामे करण्याच्या बदल्यात 19 शेतकऱ्यांकडून 500 रुपये घेण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला होता. त्यानुसार रायपूर पोलीस ठाण्यात फसवणूक केल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. याची चौकशी ही सुरु असून आता कारवाई काय होणार हे पहावे लागणार आहे.

संबंधित बातम्या :

Farm Laws: आंदोलनजिवी, परजिवी ते देशाची माफी, मोदींचा तो राज्यसभेतला व्हिडीओ पुन्हा का चर्चेत? काय आहे त्यात?

शेती व्यवसयात सौरकृषी पंपाचे महत्व, योग्य नियोजनामुळे उत्पादनातही वाढ

‘ई-पीक पाहणी’ नंतर आता राज्य सरकारचे नवे धोरण, शेतकऱ्यांची वाढणार जाबाबदारी

Follow Us
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण...
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण....
सोलापुरात महापुरुषांच्या पुतळ्यावरून वाद; पोलीस आणि आंदोलकांमध्ये तणाव
सोलापुरात महापुरुषांच्या पुतळ्यावरून वाद; पोलीस आणि आंदोलकांमध्ये तणाव.
राज्यभरात हनुमान जयंतीचा उत्साह, अंजनेरी मंदिरात भाविकांची गर्दी
राज्यभरात हनुमान जयंतीचा उत्साह, अंजनेरी मंदिरात भाविकांची गर्दी.
हा आयोग चोर आहे... राऊतांची निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावर टीका
हा आयोग चोर आहे... राऊतांची निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावर टीका.
अजितदादाच्या राष्ट्रवादीत मोठा भूकंप होणार? किती आमदार फुटणार?
अजितदादाच्या राष्ट्रवादीत मोठा भूकंप होणार? किती आमदार फुटणार?.
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुनील तटकरे यांचा यू-टर्न
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुनील तटकरे यांचा यू-टर्न.
अजब-गजब ऐतिहासिक दावे जैन मुनीच्याच अंगलट; जैन समाजातूनच तीव्र विरोध
अजब-गजब ऐतिहासिक दावे जैन मुनीच्याच अंगलट; जैन समाजातूनच तीव्र विरोध.
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार.
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण.
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक...
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक....