AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गोष्ट पडद्यामागची : राज्य सरकारचा मदतनिधी बॅंकेत, खात्यावर येण्यास का होतोय विलंब ?

ग्रामीण भागात गेल्या चार दिवसांपासून एकच चर्चा आहे ती नुकसान भरपाई रक्कम खात्यावर जमा झाली की नाही. एकीकडे राज्य सरकारकडून नुकसानभरपाईच्या अनुशंगाने रक्कम अदा केल्याचे सांगण्यात येत आहे तर दुसरीकडे बुधवारपर्यंतही ही रक्कम शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष खात्यावर जमा झालेली नव्हती.

गोष्ट पडद्यामागची : राज्य सरकारचा मदतनिधी बॅंकेत, खात्यावर येण्यास का होतोय विलंब ?
संग्रहीत छायाचित्र
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: Nov 03, 2021 | 12:56 PM
Share

राजेंद्र खराडे : लातूर : ग्रामीण भागात गेल्या चार दिवसांपासून एकच चर्चा आहे ती नुकसान भरपाई रक्कम खात्यावर जमा झाली की नाही. एकीकडे राज्य (State Gocernment) सरकारकडून नुकसानभरपाईच्या ( Compensation) अनुशंगाने रक्कम अदा केल्याचे सांगण्यात येत आहे तर दुसरीकडे बुधवारपर्यंतही ही रक्कम शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष खात्यावर जमा झालेली नव्हती. त्यामुळे राज्य सरकारने अदा केलेली रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत असताना नेमकी काय प्रक्रिया होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

अतिवृष्टीने खरिपातील पिकांचे नुकसान झाल्याने राज्य सरकारने 10 हजार कोटी रुपयांच्या मदतीचे पॅकेज जाहीर केले होते. शिवाय ही मदत दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मिळणार असल्याचा दावाही करण्यात आला होता. त्यानुसार 75 टक्के रक्कम ही अदा केली आहे पण अद्यापही काही शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा झालेली नाही. राज्य सरकारने जमा केलेले पैसे नेमके आहेत तरी कुठे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

राज्य सरकारने मदतनिधी जमा केला म्हणजे काय?

राज्य सरकारच्या मदतीमुळे ‘शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड’ हे फक्त ऐकायला बरं वाटत. राज्य सरकार जनतेची सहानभुती मिळवण्यासाठी मदत केल्याची घोषणा करीत असले तरी यामागे मोठी प्रक्रिया असल्याने सरकारने जाहीर केलेली मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर येण्यास किमान चार ते पाच दिवसाचा कालावधी लागतो. नुकसानभरपाईची मदत जाहीर होते म्हणजे राज्य सरकार हे त्यांच्या मुख्य बॅंकेत मदतीचे पैसे वर्ग करते. त्यानंतर त्या मुख्य बॅंकेतून राज्यातील शेतकऱ्यांची ज्या बॅंकेत खाती आहेत त्या बॅंकेमध्ये ठरवून दिल्यानुसार रक्कम अदा केली जाते. मात्र, हे करताना शेतकऱ्यांची यादी, खाते क्रमांक, नाव, बॅंकेचे नाव, रक्कम याची तपासणी करावी लागते. त्यामुळे सरकारने रक्कम जाहीर केली, नुकसानीची रक्कम अदा केली तरी त्यानंतरच्या प्रक्रियेला किमान चार ते पाच दिवसाचा कालावधी लागतो. म्हणूनच घोषणा करुन चार दिवस उलटले तरी प्रत्यक्षात अद्यापही मदतनिधी हा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला नाही.

‘बॅच पोस्टींग’ प्रक्रिया म्हणजे काय?

सरकारची जी बॅंक आहे त्या बॅंकेतील ही नुकसानभरपाईची मदतनिधी आहे तो शेतकऱ्यांची खाते असलेल्या सर्व बॅंकेत वर्ग करणे म्हणजेच बॅंक पोस्टींग होय. या दरम्यान, सराकरकडून संबंधित बॅंकेकडे रक्कम आणि शेतकऱ्यांची यादी ही सपूर्द केली जाते. त्यानंतर शेतकऱ्याची सर्व माहिती ही बरोबर आहे का नाही हे तपासून त्या-त्या बॅंकेत शेतकऱ्यांची एक संख्या ठरवून हे पैसे जमा केले जातात. यामध्ये काही चुकीचे झाले तर पैसे वर्ग होत नाहीत. जोपर्यत काय चुकले आहे याचा शोध लागत नाही तोपर्यंत पैसे हे वर्ग होत नाहीत. या तपासणीला आणि पैसे जमा करण्यास तीन ते चार दिवसाचा कालावधी लागतो. त्यामुळे प्रत्यक्ष मदत शेतकऱ्यांच्या पदरी पडण्यास विलंब होत आहे.

मराठवाड्यात 47 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर होणार मदत जमा

अतिवृष्टीने मराठवाड्यातील खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. पिकांचेच नाही तर शेतकऱ्यांची शेतजमिनही खरडून गेली होती. त्यामुळे या विभागातील तब्बल 47 लाख शेतकऱ्यांना या नुकसानभरपाईचा लाभ मिळणार आहे. मराठवाड्यातील 36 लाख 62 हजार हेक्टरावरील पिकाचे नुकसान झाले होते. राज्य सरकारने 10 हजार कोटी रुपयांचे पॅकेजची घोषणा केली असली तरी पहिल्या टप्प्यात 75 टक्केच रक्कम देण्यात आली आहे. शिवाय ही रक्कमही प्रक्रियेत असल्याने अजूनही प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाहीत.

संबंधित बातम्या :

‘पांढऱ्या सोन्या’च्या खरेदीसाठी परराज्यातील व्यापारी खानदेशात

खरीपातील पिकांना ढगाळ वातावरणाचा धोका, शेतकऱ्यांसाठी काय आहे कृषितज्ञांचा सल्ला ?

अनुदानित बियाणे विक्रेत्यांकडे उपलब्ध, या कागदपत्रांची पूर्तता करा अन् बियाणे घ्या..!

Follow Us
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा
Raj Thackeray | राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा; मोदींच्या मौनावर गंभीर सवाल
आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधान
Rohit Pawar | 'आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधानाने खळबळ
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात
मोठी बातमी! महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात; विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी
मुंबईत भीषण दुर्घटना! शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू
अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; सचिन अहिरांच्या प्रवेशानंतर शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही?
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
सोबत असलो तर चांगले, नाहीतर नालायक?; सचिन अहिरांचा ठाकरेंवर पलटवार
Sachin Ahir | सोबत असलो तर चांगले, नाहीतर नालायक?; शिंदे गटात जाताच सचिन अहिरांचा ठाकरेंवर पलटवार
पत्रकार परिषदेच्या पहिल्या वाक्यातच शिंदे म्हणाले 'असं काही' अन् पिकला
Eknath Shinde | पत्रकार परिषदेच्या पहिल्या वाक्यातच शिंदे म्हणाले 'असं काही' अन् पिकला हशा... सचिन अहिरदेखील... पहा व्हिडीओ
जे कधीच नव्हते आमचे, त्यांची वाट का पहावी?; राऊतांची पहिली प्रतिक्रिया
Sanjay Raut Post | जे कधीच नव्हते आमचे, त्यांची वाट का पहावी?; सचिन अहिरांच्या निर्णयानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
आदित्य ठाकरेंना झोप येणार नाही, पुढची निवडणूक... राणेंची बोचरी टीका
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना झोप येणार नाही, पुढची निवडणूक....सचिन अहिर यांच्या निर्णयानंतर नितेश राणेंची बोचरी टीका