बाईकची इंधन टाकी भरून ठेवण्याचे ‘हे’ फायदे जाणून घ्या
इंधनाची टाकी रिकामी ठेवून तुम्ही बाईक चालवत असाल तर तुमची बाइक धोक्यात आहे, याची जाणीव तुम्हाला असायला हवी. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घ्या

तुम्ही अजूनही बाईकची टाकी अर्धी भरलेली किंवा अर्ध्यापेक्षा कमी भरलेली घेऊन बाईक चालवत असाल तर तुमच्या बाइकमध्ये मोठा बिघाड होऊ शकतो. खरं तर बहुतांश लोकांना याचे तोटे माहित नसले तरी दीर्घकाळात यामुळे बाइकचे नुकसान होऊ शकते. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला बाइकची टाकी भरून ठेवण्याचे फायदे सांगणार आहोत. चला तर मग जाणून घ्या.
1. जोरदार मायलेज
- टाकी भरली की इंजिनातील इंधनाचा दाब स्थिर राहतो.
- यामुळे इंजिन पूर्ण ताकदीने चांगले काम करते आणि मायलेज अधिक चांगले मिळू शकते.
- अर्धी किंवा त्यापेक्षा कमी टाकी असेल तर इंधन पंपाला जास्त मेहनत घ्यावी लागते, ज्याचा परिणाम मायलेजवर होतो.
2. इंधन पंपाची सुरक्षा
- पूर्ण टाकी असल्याने इंधन पंप थंड राहतो.
- इंधन कमी असल्यास पंप गरम होऊन त्याचे आयुर्मान कमी होऊ शकते.
3. पाण्याचा धोका
- रिकाम्या टाकीतील हवेच्या संपर्कामुळे संघनन (पाण्याचे थेंब) तयार होण्याचा धोका असतो.
- हे पाणी इंधनासह इंजिनची कार्यक्षमता बिघडवू शकते.
4. लांब पल्ल्याच्या प्रवासात आराम
- पूर्ण टाकी असताना पुन्हा पुन्हा थांबण्याची गरज नसते.
- वेळेची बचत होते आणि प्रवास अधिक सुरळीत होतो.
5. किंमतीत बचत
- इंधनाचे दर वाढण्यापूर्वी आपण टाकी भरू शकता.
- यामुळे भविष्यात वाढलेल्या किमतींचा तुम्हाला कमी फटका बसेल.
टॉप स्पीड किती?
4 स्ट्रोक एअर कूल्ड इंजिनसह येणाऱ्या या बाईकचा टॉप स्पीड किती आहे, तुम्हालाही या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्यायचं असेल तर बजाज ऑटोनुसार या बाईकसोबत तुम्हाला पेट्रोलवर 93.4 किमी प्रति तास आणि सीएनजीवर 90.5 किमी प्रति तास टॉप स्पीड मिळेल.
सर्व्हिसिंग कोणत्या केएमवर केले जाईल?
बजाज ऑटोच्या म्हणण्यानुसार, जर तुम्ही ही सीएनजी बाईक खरेदी केली तर तुम्हाला दर 5000 किलोमीटरवर बाईकची सर्व्हिसिंग करावी लागेल. सुरक्षिततेबाबत बोलायचे झाले तर अपघात झाला आणि सिलिंडरचा स्फोट झाला, अशी भीती सर्वांनाच वाटत आहे, या भीतीवर मात करण्यासाठी कंपनीने ही बाईक लाँच करण्यापूर्वी या बाईकची क्रॅश टेस्टही केली होती, ज्यात या बाईकने ताकद दाखवली होती.
देखभाल आणि बॅटरी खर्च
हायब्रीड कारचे इंजिन कमी काम करते. यामुळे त्याचे आयुर्मान वाढते. बॅटरी रिप्लेसमेंटचा खर्च जास्त (दीड ते दोन लाख रुपये) असला तरी तो 8-10 वर्ष टिकू शकतो.
