AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ethanol Fueled Car : इथेनॉलवर धावणार कार! लवकरच लागणार मुहूर्त

Ethanol Fueled Car : इंधनाचे बहुविविध पर्यायांवर सध्या देशात भर देण्यात येत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे त्यासाठी विशेष प्रयत्न सुरु आहे. यापूर्वी त्यांनी हायड्रोजन कारचा वापर केला होता. आता 100 टक्के इथेनॉलवर धावणारी कारचे ते उद्धाघाटन करणार आहेत.

Ethanol Fueled Car : इथेनॉलवर धावणार कार! लवकरच लागणार मुहूर्त
| Updated on: Aug 26, 2023 | 5:14 PM
Share

नवी दिल्ली | 26 ऑगस्ट 2023 : देशात पेट्रोल-डिझेलला (Petrol Diesel) पर्याय देण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यासाठी गेल्या काही वर्षांपासून केंद्र सरकार खास प्रयत्न करत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या तर त्यासाठी खास आग्रह आहे. त्यामुळे देशात ईव्ही वाहनाचं मोठे मार्केट तयार झालं आहे. पण दळणवळणासाठी एकाच पर्यायावर न राहता बहुविविध पर्याय शोधण्यावर भर देण्यात येत आहे. देशातील रस्त्यावर पहिल्यांदाच 100 टक्के इथेनॉलवर कार (Ethanol Fueled Car) धावेल. मीडिया रिपोर्टनुसार ही कार टोयोटाची इनोव्हा अथवा केमरी असू शकते. यापूर्वी केंद्रीय मंत्र्यांनी हायड्रोजन कारचा प्रवास केला होता. अनेक भाषणात गडकरी यांनी आपण पेट्रोल-डिझेलच्या कारचा प्रवास बंद केल्याचे सांगितले आहे. ते इलेक्ट्रिक कार, हायड्रोजन अथवा पर्यायी इंधनाचा वापर करणाऱ्या कारचा वापर करतात.

या दिवशी कार रस्त्यावर

दिल्लीतील एका कार्यक्रमादरम्यान गडकरी यांनी या कारची माहिती दिली. 29 ऑगस्टला टोयोटाच्या कारच्या उद्धघाटन करणार असल्याचे त्यांनी या कार्यक्रमात जाहीर केले होते. ही कार 100 टक्के बायोइथेनॉलवर धावेल. या कारचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे, ती इथेनॉलसह हायब्रिड प्रणालीवर 40 टक्के वीज निर्मिती करेल, त्याचाही प्रवासासाठी वापर करता येईल. ही कार जगातील पहिली BS6 फेज-2 इलेक्ट्रिफाइड फ्लेक्स-इंधन कार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

हायड्रोजन कार

अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांवर केंद्र भर देत आहे. ग्रीन एनर्जी कारसाठी खास प्रोत्साहन देण्यात येत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्यासाठी आग्रही आहेत. टोयोटाच्या फ्लेक्स-इंधन पायलट प्रकल्पाला त्यामुळेच हिरवा कंदिल मिळाला. त्यांनी टोयोटा मिराई या हायड्रोजन कारचे उद्धघाटन केले होते.

कसे तयार होते इथेनॉल

स्टार्च आणि साखरेच्या किण्वातून इथेनॉल तयार होते. हे एक प्रकारचे अल्कोहोल असते. पेट्रोलमध्ये मिसळून ते वापरण्यात येते. ऊसाच्या रसापासून, मका, बटाटे, कुजलेला भाजीपाला, स्टार्चयुक्त पदार्थातून इथेनॉल तयार करण्यात येते.

देशभरात इथेनॉल पंप

देशभरात इथेनॉल पंप सुरु करण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. या योजनेवर काम सुरु आहे. पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळण्याची योजना आहे. त्यासाठी 1,000 कोटी लिटर इथेनॉलची आवश्यकता आहे. दोन वर्षांनी देशभरात असे पंप मोठ्या प्रमाणात उभारण्यात येतील.

असा झाला फायदा

पेट्रोलमध्ये 10 टक्के इथेनॉल मिसळून 41,500 कोटी रुपयांहून अधिक परकीय चलन वाचले आहे. तसेच, हरित वायू उत्सर्जनात 27 लाख टनांनी घट झाली असून शेतकऱ्यांना 40,600 कोटींचा फायदा झाला आहे. आता 20% इथेनॉल मिश्रणासह पेट्रोलच्या पुरवठ्यामुळे वार्षिक 4 अब्ज डॉलर वाचण्याचा अंदाज आहे. सध्या पेट्रोलमध्ये 10.17 टक्के इथेनॉल मिसळले जात आहे, जे 2020-21 मध्ये 8.10 टक्के आणि 2019-20 मध्ये 5 टक्के होते. 2013-14 मध्ये तो 1.53 टक्के होता. पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळण्यासाठी 1000 कोटी लिटर इथेनॉलची गरज पडणार आहे.

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.