AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Increase Car Average: ड्रायव्हिंग करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमध्ये कारचे चांगली Average असणं गरजेचं आहे. यासाठी तुम्ही गाडी चालवताना काही गोष्टी लक्षात ठेवू शकता. कारचे Average कसे वाढवायचे जाणून घ्या.

Increase Car Average: ड्रायव्हिंग करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
car driving tips
| Edited By: | Updated on: Aug 13, 2025 | 5:43 PM
Share

Increase Car Average: पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. अशावेळी आपल्या कारने चांगले Average द्यावे, जेणेकरून कमी पैशात जास्त प्रवास करता येईल, अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण, कळत-नकळत लोक अशा काही चुका करतात ज्यामुळे गाडीच्या Average वर परिणाम होतो

छोट्या गोष्टींची काळजी घ्या

चांगली गोष्ट म्हणजे ड्रायव्हिंग करताना काही छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेऊन तुम्ही तुमच्या कारचे मायलेज वाढवू शकता. यामुळे पेट्रोल किंवा डिझेलची बचत तर होईलच, शिवाय इंजिनचे आयुष्यही वाढेल. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं.

योग्य गिअरमध्ये वाहन चालवा

कार नेहमी योग्य गिअरमध्ये चालवा. कमी वेगात हाय गिअर वापरल्यास इंजिनवर दबाव येईल आणि मायलेज कमी होईल. त्याचप्रमाणे लो गिअरवर वेगात गाडी चालवल्यास इंजिनवरही परिणाम होईल. यामुळे इंजिनला अधिक इंधनाचा वापर करावा लागेल. त्यामुळे चांगल्या Average साठी योग्य गिअरमध्ये गाडी चालवणं खूप गरजेचं आहे.

अचानक ब्रेक टाळा आणि वेगवान वेग वाढवा

जेव्हा तुम्ही अचानक ब्रेक लावता किंवा वेगाने वेग घेता तेव्हा इंजिनवर अधिक दबाव येतो. त्यामुळे इंजिनला अधिक इंधनाची गरज भासते. म्हणजेच इंजिनजास्त इंधन खर्च करते आणि त्यामुळे सरासरी कमी होते. त्यामुळे वाहन चालवताना हळूहळू वेग वाढवा आणि हळूहळू ब्रेक लावा. यामुळे इंधनाची बचत तर होईलच, शिवाय तुमचा प्रवासही सुरक्षित होईल.

टायरमध्ये हवेचा योग्य दाब ठेवा

कारचे Average वाढवण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे चाकांमध्ये नेहमी योग्य हवेचा दाब असणे. टायरमध्ये हवा कमी असेल तर गाडी चालवणे टाळा, कारण त्याचा थेट परिणाम कारच्या इंजिनवर होतो. कार खेचण्यासाठी इंजिनला जास्त मेहनत घ्यावी लागणार असून त्यासाठी जास्त इंधन खर्च करावे लागणार आहे. इंधनाचा खर्च वाढल्याने कारचे Average कमी होईल. त्यामुळे गाडीच्या चाकांमध्ये हवेचा योग्य दाब ठेवा.

ओव्हरलोडिंग टाळा

कारमध्ये जास्त वस्तू किंवा लोक घेऊन जाणे टाळा. जेव्हा वाहन ओव्हरलोड होते तेव्हा इंजिनवरील दाब वाढतो आणि त्यात जास्त इंधन खर्च होते. आपल्या क्षमतेनुसार कार चालवण्याचा प्रयत्न करा. तसेच तुमच्याकडे इलेक्ट्रिक कार असेल तर ती अजिबात ओव्हरलोड करू नका. ईव्हीमधील ओव्हरलोडिंगमुळे रेंजवर परिणाम होईल. या गोष्टी फॉलो केल्यास तुमच्या गाडीचे Average वाढेल.

Follow Us
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच...
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच मोठी खळबळ; महापालिकेत काय घडलं?
सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं...शिंदे गटातील महिला नेत्याचा प्रचंड
सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं...शिंदे गटातील महिला नेत्याचा प्रचंड संताप; नाव न घेता राऊतांना थेट इशारा?
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा इशारा, काय म्हणाले?
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ, खासदर फुट
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने  खळबळ, खासदर फुटीनंतर आणखी मोठा धक्का!
अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ
मोठी बातमी! अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ; सोलापुरात नेमकं काय घडतंय?
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं;
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं; थेट इशाराच दिला!
मुंबईत पोलीस तैनात! दिना पाटील यांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त!
Operation Tiger | दिल्लीत बंड, मुंबईत पोलीस तैनात! संजय दिना पाटील यांच्या घराबाहेर अचानक वाढवला पोलिस बंदोबस्त!
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या...
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या... नेमकं कारण काय?
ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
Sushma Andhare | ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
6 खासदार कुठे गेले?; सामंतांच्या एका वक्तव्याने राजकारणत खळबळ!
Uday Samant | 6 खासदार कुठे गेले?; उदय सामंतांच्या एका वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ!