AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maruti E Vitara : भारतासाठी आज मोठा दिवस, मोदी स्वत: मारुती सुझूकीच्या या प्लान्टमध्ये का गेले? असं काय खास घडलं?

Maruti E Vitara : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात अहमदाबाद येथील मारुती सुजुकीच्या प्लानंटमध्ये गेले होते. मारुतीच्या 'Maruti e Vitara' कारला त्यांनी फ्लॅग ऑफ केलं. मोदी आज खास इथे का गेले होते? या प्लान्टमध्ये असं काय आहे? जाणून घ्या.

Maruti E Vitara :  भारतासाठी आज मोठा दिवस, मोदी स्वत: मारुती सुझूकीच्या या प्लान्टमध्ये का गेले? असं काय खास घडलं?
Maruti E VitaraImage Credit source: Screengrab
| Updated on: Aug 26, 2025 | 12:02 PM
Share

देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुति सुजुकीची इलेक्ट्रिक कारची प्रतिक्षा आज संपली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 26 ऑगस्ट रोजी गुजरात हंसलपुर येथे मारुति सुजुकीच्या पहिल्या इलेक्ट्रिक कार ‘Maruti e Vitara’ ला फ्लॅग ऑफ केलं. भारतात तयार झालेली मारुती सुजुकीची ही पहिली इलेक्ट्रिक कार आहे. जपानसह 100 पेक्षा पण जास्त देशात ही कार निर्यात केली जाईल. या इलेक्ट्रिक कारकडून कंपनीला भरपूर अपेक्षा आहेत. कार बाजारपेठेत Maruti e Vitara चा नुकत्याच लॉन्च झालेल्या Hyundai Creta Electric शी सामना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय गुजरात दौऱ्यादरम्यान टीडीएस लिथियम-आयन बॅटरी प्लान्ट हायब्रिड बॅटरी इलेक्ट्रोड उत्पादनाच सुद्धा उद्घाटन केलं.

आज हंसलपुर येथील मारुतीच्या इलेक्ट्रिक कारच्या कार्यक्रमाला जाण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक खास टि्वट केलं होतं. “पर्यावरण अनुकूल वाहतूक व्यवस्था आणि स्वावलंबनाच्या शोधात असलेल्या भारतासाठी आजचा दिवस खास आहे. BEV म्हणजे बॅटरीवर चालणारी इलेक्ट्रिक मेड इन इंडिया कार तयार असून शंभरपेक्षा जास्त देशांमध्ये या कारची निर्यात होईल. यामुळे आपल्या बॅटरी आधारीत इकोसिस्टिमला उत्तेजना मिळणार आहे. गुजरातमधल्या प्लान्टमध्ये अशा कार निर्मितीचा आरंभ होईल” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलय.

आजपासून इलेक्ट्रिक एसयूवी लोकल प्रोडक्शन सुरु

पीएम मोदी यांनी मारुति सुजुकीच्या प्लांटमध्ये आजपासून कंपनीच्या पहिल्या इलेक्ट्रिक कार ‘Maruti e Vitara’ च्या उत्पादनासाठी प्रोडक्शन असेंबली लाइनच उद्घाटन केलं. म्हणजे आजपासून इलेक्ट्रिक एसयूवी लोकल प्रोडक्शन सुरु झालय. दुसऱ्या देशातही इथे बनलेल्या कार निर्यात होतील.

आपल्या देशाला याचा काय फायदा होणार?

यामुळे आता 80 टक्क्यापेक्षा जास्त बॅटरीची निर्मिती देशातच होईल. त्यामुळे भारताची क्लीन एनर्जी आणि मॅन्युफॅक्चरिंग टार्गेटला बळ मिळेल. इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात आपली स्थिती मजबूत करण्यासाठी भारताकडून सतत प्रयत्न सुरु आहेत. अशावेळी गुजरातमधील टीडीएस लिथियम-आयन बॅटरी प्लांटमुळे भारताला आपल्या लक्ष्याच्या दिशेने जाण्यात मोठी मदत होईल. जवळपास 7.5 लाख युनिट एवढी हंसलपुर येथील सुजुकी मोटर गुजरात (SMG) प्लांटची वार्षिक उत्पादन क्षमता आहे. नवीन असेंबली लाइन सुरु झाल्यानंतर ही क्षमता अधिक वाढेल. देशातंर्गत आणि निर्यात बाजारपेठेची गरज भागवण्यासाठी हंसलपुर प्लांट मार्च 2014 मध्ये सुरु झालेला.

Follow Us
विद्यार्थ्यांनी नाही, भाजपच्या गुंडांनी केली दगडफेक! दीपकेंचा आरोप
Abhijeet Dipke | विद्यार्थ्यांनी नाही, भाजपच्या गुंडांनी केली दगडफेक! अभिजीत दीपकेंचा गंभीर आरोप
अभिजित दिपकेंच्या आई-वडिलांना उद्धव ठाकरेंचा फोन!
Uddhav Thackeray | अभिजित दिपकेंच्या आई-वडिलांना उद्धव ठाकरेंचा फोन! आंदोलनाच्या यशानंतर मोठी चर्चा
तुकाराम मुंढेंचा दणका थेट हायकोर्टापर्यंत; नो लायसन्स, नो बिझनेस
मोठी बातमी! तुकाराम मुंढेंचा दणका थेट हायकोर्टापर्यंत; नो लायसन्स, नो बिझनेस, कँटीन बंद करण्याचे आदेश
अमित शाह संसदेत का नाही?; प्रियांका गांधी, खर्गेंसह विरोधकांचा संसद...
Sansad Bhavan Park | अमित शाह संसदेत का नाही?; प्रियांका गांधी, खर्गेंसह विरोधकांचा संसद भवनाबाहेर आंदोलन
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सरकारचं मोठं पाऊल
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सरकारचं मोठं पाऊल; विखे पाटलांनी दिली मोठी अपडेट, म्हणाले...
रक्ताने माखलेल्या गणवेशाची कहाणी सांगताना कुटुंबीयांना अश्रू अनावर
NEET आंदोलनानंतर पोलिसांच्या कुटुंबीयांची पत्रकार परिषद; रक्ताने माखलेल्या गणवेशाची कहाणी सांगताना कुटुंबीयांना अश्रू अनावर
हिंगोलीत कयाधू नदीला पूर! पुढील 48 तास अतिमहत्त्वाचे; प्रशासनाचा इशारा
ब्रेकिंग: हिंगोलीत कयाधू नदीला पूर! पुढील 48 तास अतिमहत्त्वाचे; प्रशासनाचा इशारा
जळगावमध्ये पावसाचा कहर! हतनूर धरणाचे तब्बल 36 दरवाजे उघडले
Jalgaon | जळगावमध्ये पावसाचा कहर! हतनूर धरणाचे तब्बल 36 दरवाजे उघडले; नद्यांना पूर
राज्यात पावसाचा हाय अलर्ट! नाशिकला रेड अलर्ट, अनेक जिल्ह्यांना...
Maharashtra Rain Alert | राज्यात पावसाचा हाय अलर्ट! नाशिकला रेड अलर्ट, अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी
दगडावरून आधार शोधणाऱ्यांना नोबेल मिळालाच पाहिजे...
Sanjay Raut Press | दगडावरून आधार शोधणाऱ्यांना नोबेल मिळालाच पाहिजे; संजय राऊतांचा चंद्रकांत पाटलांवर खोचक निशाणा