Budget 2022 : अर्थसंकल्पात हवा रोजगार निर्मितीवर भर, गव्हर्नर सुब्बाराव का म्हणत आहेत देशात आर्थिक विषमता

रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर डी. सुब्बाराव यांनी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाबाबत आपले मत व्यक्त करताना म्हटले आहे की, महामारीमुळे आर्थिक असमानता प्रचंड वाढली आहे. या अर्थसंकल्पामध्ये ही असमानता दूर करायची असेल तर त्यासाठी नव्या रोजगार निर्मितीवर भर देणे गरजेचे आहे.

Budget 2022 : अर्थसंकल्पात हवा रोजगार निर्मितीवर भर, गव्हर्नर सुब्बाराव का म्हणत आहेत देशात आर्थिक विषमता
D.Subbarao
Follow us
| Updated on: Jan 27, 2022 | 8:57 PM

दिल्लीः देशाच्या सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाबाबत (Budget 2022) रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर डी. सुब्बाराव (RBI former Governor D. Subbarao) यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले आहे की, येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये रोजगार निर्मिती आणि अर्थव्यवस्थेतील असमानता दूर करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. शिक्षण (Education), आरोग्य (Health) आणि पायाभूत व्यवस्थेवर अधिक भर दिला गेला पाहिजे. वाढत्या खर्चाबाबत त्यांचे मत आहे की,कर सवलतीचे चित्र जास्त आशादायी नाही. सुब्बाराव यांनी सांगितेल की, सुरक्षिततेची काळजी घेतल्यानंतर निर्यातीला चालना देण्याचे धोरण क्वचितच स्पर्धात्मक असते.त्यामुळे आयात शुल्क कमी करण्याची गरज आहे.

वाढीचा वेग वाढविणे हे प्रत्येक अर्थसंकल्पाचे उद्दिष्ट असले पाहिजे. परंतु या अर्थसंकल्पात अर्थव्यवस्थेत असलेली व्यापक विषमता दूर करण्यावर भर दिला पाहिजे. कोरोनामुळे देशातील अनेक लोकांची अर्थव्यवस्था ढासळली आहे. श्रीमंत अधिक श्रीमंत अधिक झाला आहे तर गरीब या काळात अतिगरीब झाला आहे. यामुळे देशात आर्थिक विषमता निर्माण झाली आहे. या अर्थसंकल्पातून तो दूर करण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.

कोविड-19 च्या महामारीमध्ये अर्थव्यवस्थेत तिसऱ्या वर्गातील काम करणारे आर्थिक संकटात सापडले आहेत. तर बरोबर याविरोधात उच्च वर्ग आहे, तो फक्त आपली संपत्ती वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे त्यांची बचत तर झाली आहेच आणि संपत्तीतही वाढ झाली आहे. अर्थव्यवस्थेत निर्माण झालेली असमानता ही नैतिकतेत बसणारी नाही तर राजकीयदृष्ट्याही नुकसानकारक आहे. त्यामुळे दीर्घकालीन वाढीचा वेगावर त्याचा परिणाम होणार आहे.

वाढीचा वेग वाढविणे हेच ध्येय

अर्थमंत्री निर्मला सीतारमन 2022-23 सालातील अर्थसंकल्प सादर करणार आहेत. वाढीचा वेग वाढविणे हा प्रत्येक अर्थसंकल्पाचे ध्येय असते. त्याचप्रमाणे या अर्थसंकल्पाचाही तोच उद्देश्य पाहिजे. मात्र यावेळी अर्थव्यवस्थेत वाढलेली असमानता कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी आपल्याला गरज आहे ती, रोजगारावर आधारित वाढीचा वेग. या अर्थसंकल्पासाठी जर कोणती संकल्पना हवी असेल तर ती पाहिजे रोजगार निर्मिती.

निर्यात वाढला तरच रोजगार

आर्थिक मंदीमुळे रोजगार कमी झाला आहे. रोजगार निर्मितीसाठी विकास आवश्यक आहे, परंतु तो पुरेसा नाही. निर्यात वाढल्याने परकीय चलन तर मिळेलच, पण रोजगाराच्या संधीही वाढणार असल्याचे मत सुब्बाराव यांनी व्यक्त केले.

संंबंधित बातम्या

Budget 2022 : शेतकऱ्यांसाठी यंदाचा अर्थसंकल्प महत्वाचा, कृषी कर्जाच्या रकमेत होऊ शकते 18 लाख कोटीपर्यंतची वाढ

Home Loan Tax Rebate: स्वप्नातील घराला कर सवलतीचा नजराणा, 5 लाखांपर्यंत मिळू शकते कर सवलत

Budget 2022 : कृषी क्षेत्राच्या नजरेतून अर्थसंकल्प ; सरकारच्या भूमिकेवरच सर्वकाही अवलंबून..!

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.