AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Budget 2022: अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी भरीव तरतूद, ‘एमएसपी’ अंतर्गत 2 लाख 70 हजार कोटी रुपये देणार

शेती पध्दतीमध्ये बदल त्याचबरोबर शेतीमालाच्या दराला घेऊन यंदाच्या संसदीय अर्थसंकल्पात मोठी तरतूद केली जात आहे. पुढील आर्थिक वर्षात सरकार शेतकऱ्यांना एमएसपी अंतर्गत 2.7 लाख कोटी रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात केली.

Budget 2022: अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी भरीव तरतूद, 'एमएसपी' अंतर्गत 2 लाख 70 हजार कोटी रुपये देणार
कृषी अर्थसंकल्प
| Updated on: Feb 01, 2022 | 2:56 PM
Share

मुंबई : शेती पध्दतीमध्ये बदल त्याचबरोबर शेतीमालाच्या दराला घेऊन यंदाच्या संसदीय अर्थसंकल्पात मोठी तरतूद केली जात आहे. पुढील आर्थिक वर्षात सरकार शेतकऱ्यांना (MSP) एमएसपी अंतर्गत 2.7 लाख कोटी रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा (Finance Minister) अर्थमंत्र्यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात केली. (Agricutural) कृषी क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळण्याची अपेक्षा असून, ते अधिक चांगल्या पद्धतीने उत्पादनवाढ करण्यात उपयोगी पडणार आहे. 24 जानेवारीच्या आकडेवारीनुसार केंद्राने सध्या सुरू असलेल्या विपणन सत्र 2021-22 मध्ये आतापर्यंत 606.19 लाख टन धान खरेदी केले आहे. सर्वाधिक धानाची खरेदी पंजाबमधून झाली आहे. मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, “आतापर्यंत सुमारे 77 लाख शेतकऱ्यांना 1,18,812.56 कोटी रुपयांच्या किमान आधारभूत किंमतीचा (एमएसपी) लाभ झाला आहे.”

शेती क्षेत्राने मोठी जबाबदारी पार पाडली आहे

2021-22 च्या आर्थिक सर्वेक्षणात मध्ये म्हटले आहे की, कृषी क्षेत्राने कोविड -19 च्या माहामारीच्या काळातही चांगली कामगिरी केली आहे. आर्थिक वर्षात 3.9 टक्के दराने वाढ होण्याचा अंदाज आहे. पीक विविधता, संलग्न कृषी क्षेत्र आणि नॅनो युरिया अशा पर्यायी खतांना प्राधान्य देण्याची सूचनाही या आढावामध्ये सरकारला करण्यात आली आहे. आर्थिक सर्वेक्षण 2021-22 मध्ये ड्रोनसारख्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासोबतच कृषी संशोधन आणि विकास आणि सेंद्रिय शेती वाढवण्यावरही भर देण्यात आला आहे. “कृषी आणि संबंधित क्षेत्रांनी कोविड -19 च्या धक्क्यासाठी जिजिविआचे प्रदर्शन केले आहे… पशुधन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यपालन यासह संबंधित क्षेत्रांमधील वाढ ही या क्षेत्रातील एकूण वाढीचे प्रमुख कारण आहे.” गेल्या दोन वर्षांत कृषी क्षेत्राची झपाट्याने वाढ झाली आहे. 2021-22 मध्ये ही वाढ 3.9 टक्के राहील असा अंदाज आहे, जो मागील आर्थिक वर्षात 3.6 टक्के होता, असेही यावेळी सांगण्यात आले आहे.

संबंधित बातम्या :

Budget 2022: ‘झिरो बजेट’ शेतीची जबाबदारी कृषी महाविद्यालयावर, काय आहे तरतूद?

Budget 2022: यंदाच्या अर्थसंकल्पात 25 वर्षाची ब्ल्यूप्रिंट, जीडीपी 9.2% टक्के राहणार; निर्मला सीतारामण यांचे बजेट भाषण सुरू

Budget 2022 : सरकार सर्वसामान्यांसाठी षटकार मारणार ? असे 6 निर्णय ज्याबाबत सर्वसामान्य जनतेला आहेत मोठ्या अपेक्षा

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.