AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Budget 2026-27 : मुंबई-पुण्यासह महाराष्ट्राच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी काय महत्वाच्या घोषणा केल्यात?

Maharashtra Budget 2026-27 : कुठल्याही राज्याच्या, देशाच्या विकासात इन्फ्रास्ट्रक्चरचा रोल महत्वाचा असतो. महाराष्ट्राच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी देवेंद्र फडणवीस यांनी काय घोषणा केल्या आहेत ते जाणून घ्या.

Maharashtra Budget 2026-27 : मुंबई-पुण्यासह महाराष्ट्राच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी काय महत्वाच्या घोषणा केल्यात?
Devendra fadnavis
| Updated on: Mar 06, 2026 | 2:43 PM
Share

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज विधानसभेत वर्ष 2026-2027 साठीचा अर्थसंकल्प मांडत आहेत. अर्थसंकल्पात त्यांनी वेगवेगळ्या घोषणा केल्या आहेत. त्यात इन्फ्रास्ट्रक्चर एक महत्वाचा विषय आहे. कुठल्याही राज्याच्या, देशाच्या विकासात इन्फ्रास्ट्रक्चरचा रोल महत्वाचा असतो. कारण त्यामुळे जीडीपी, रोजगाराला गती मिळते. महाराष्ट्राच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी देवेंद्र फडणवीस यांनी काय घोषणा केल्या आहेत ते जाणून घ्या.

मुंबई-पुणे जलदगती ट्रेनसाठी तरतूद केली आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानतो. विकसित महाराष्ट्रात आपला वाटा सर्वात मोठा असेल.

महाराष्ट्र हे देशाचे आर्थिक इंजिन आहे. विकसित भारत 2047 च्या विकासात आपला मोठा वाटा असेल. 5 ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्था करणं हे आपलं ध्येय आहे. राज्याच्या सर्व अर्थसंकल्पात विकसित महाराष्ट्राचं प्रतिबिंब दिसणार आहे.

राज्याचे व्हिजन डॉक्युमेंट तयार केले आहे.

प्रादेशिक संतुलित विकासासाठी चार प्रमुख स्तंभ ठरवले आहे. चार केंद्रांखाली १६ उपकेंद्र ठरवले आहेत. प्रत्येक अर्थसंकल्पात त्याची छबी दिसेल.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा एक अंतर्गत ३० हजार किलोमीटर पर्यंत कामे झाली आहेत. उर्वरीत कामे मार्च अखेरीपर्यंत होत आहेत.

आम्ही टप्पा तीन घोषित करत आहोत. २३ हजार किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पुलांचे कामे करता येणार आहे.

चार वर्षांत भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील

मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा ३ अंतर्गत २३ हजार किमी रस्ते व पुलांची कामे हाती घेतली जातील.

१२३ अब्ज डॉलरवरून १५०० अब्ज डॉलर्स पर्यंत वाढविण्याचे उद्देश आहे. महाराष्ट्र हे जागतिक उत्पादन केंद्र बनविण्याचे उद्देश आहे.

इन्व्हेस्ट महाराष्ट्र हा व्यासपीठ तयार करत आहोत. ५० लाख प्रत्यक्ष रोजगार निर्माण होईल. सेवा क्षेत्रासाठी आयुक्तालय करण्याची घोषणा करत आहे.

राज्याचे नवीन गुंतवणूक व औद्योगिक सेवा धोरण जाहीर केलं आहे. इन्व्हेस्ट महाराष्ट्र हा एकसंघ डिजीटल प्लॅटफॉर्म तयार केला जात आहे. या धोरणातून ५० लाख रोजगार निर्माण होणार आहे. तसेच यासाठी आयुक्तालय स्थापन करण्याची घोषणा करण्यात येत आहे.

महाराष्ट्रातील पुणे हे जीसीसी साठी सर्वात पसंतीचे शहर ठरत आहे. 4 लाख उच्च कुशल रोजगार निर्मितीचे लक्ष आहे.

निवडक 50 पर्यटन स्थळी पायाभूत सुविधा तयार करण्यात येणार आहे. वासोटा किल्ला हा महाराजांच्या शौर्य आणि रणनीतीचे प्रतिक आहे. मुनावळे ते वासोटा किल्ला रोपवे सुरू करणार.

राज्यातील तिसरी चित्रनगरी नवरगा तालुका रामटेक येथे विकसित करण्यात येणार आहे. नवीन पिढीला महाकवी कालिदासांचा जीवनपट कळावा म्हणून चित्रपटासाठी अर्थसहाय्य देण्यात येईल.

वाढवण जवळ चौथी मुंबई विकसित करणार.

बुलेट ट्रेनच्या तीन स्थानकांची कामे 2027 पर्यंत पूर्ण करणार.

मुंबई दुबई सिंगारपूरमध्ये पर्यटन गुंतवणूक करणार.

मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गातील काम २०२७पर्यंत पाच स्थानकांचे काम पूर्ण होईल.

तिसऱ्या मुंबईत रायगड पेण व नवी मुंबई विमानतळ ही ग्रीन फिल्ड म्हणून विकसित करणार.

चौथी मुंबई वाढवण येथे होईल.एमएमआरमध्ये 10 लाख नवी घरे उभारणार. नवी अनधिकृत बांधकामे होणार नाहीत, याचा रोडमॅप तयार होणार.

राज्यात 1 हजार 200 किमीचे मेट्रो मार्ग व 6 हजार किमीचे द्रुतगती मार्ग विकसित केले जातील. 2019 पर्यंत 165 किमी मार्गाचे मेट्रो मार्गिका तयार केल्या जातील.

Follow Us
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत