AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केंद्र सरकारची मोठी घोषणा… रोजगार आणि कौशल्यविकासासाठी पेटारा उघडला; 4 कोटी लोकांना होणार फायदा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज आपला सातवा अर्थसंकल्प सादर करत आहेत. या अर्थसंकल्पातून त्यांनी विविध घोषणा केल्या आहेत. महिला, तरुण, गरीब आणि अन्नदाता यांच्यावर या बजेटमध्ये अधिक फोकस ठेवण्यात आला आहे. रोजगार निर्मिती आणि कौशल्य विकासासाठी सरकारने अधिकची तरतूद केली आहे.

केंद्र सरकारची मोठी घोषणा... रोजगार आणि कौशल्यविकासासाठी पेटारा उघडला; 4 कोटी लोकांना होणार फायदा
Nirmala SitharamanImage Credit source: संसद टीव्ही
| Updated on: Jul 23, 2024 | 11:36 AM
Share

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या केंद्रीय अर्थसंकल्प सादर करत आहेत. यावेळी त्यांनी मोठी घोषणा केली आहे. रोजगार आणि कौशल्यविकासाशी संबंधित 5 योजनांसाठी केंद्र सरकारने पेटारा उघडला आहे. या योजनांसाठी दोन लाख कोटींची तरतूद करण्यात येत असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. या योजनांचा एकूण चार कोटीहून अधिक लोकांना फायदा होणार असल्याचंही सीतरामन यांनी स्पष्ट केलं.

केंद्रातील मोदी सरकारचा हा 13 वा अर्थसंकल्प आहे. तर निर्मला सीतारामन याचा हा सातवा अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारामन यांनी मोठी घोषणा केली आहे. रोजगार आणि कौशल्य विकास प्रशिक्षणाशी संबंधित 5 योजनांसाठी 2 लाख कोटींची तरतूद करण्यात येत आहे. या योजनांतून 4.1 कोटी लोकांना रोजगार आणि कौशल्याची संधी मिळणार आहे. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेची मुदत 5 वर्षासाठी वाढवण्यात आली आहे, अशी माहितीही निर्मला सीतारामन यांनी केली आहे.

इकनॉमी चमकत आहे

जागतिक अर्थव्यवस्था अडचणीत आहे. पण भारतीय इकनॉमी चमकत आहे. गरीब, महिला आणि अन्नदाता यांना आम्ही हा बजेट अर्पण करत आहोत. आमच्या सरकारच्या कामांवर लोकांचा विश्वास आहे. भारतात महागाईचा दर 4 टक्के आहे. लोकांनी आमच्या सरकारवर विश्वास दाखवला आहे. लोकांना आमच्या धोरणांवर विश्वास आहे, असं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं.

9 प्राधान्य

1. कृषी

2. रोजगार

3. सामाजिक न्याय

4. विनिर्माण आणि सेवा

5. शहरी विकास

6. ऊर्जा सुरक्षा

7. नवाचार

8. अनुसंधान आणि विकास

9. पुढच्या पिढीसाठी सुधारणा

आंध्रप्रदेशसाठी विशेष घोषणा

आंध्रप्रदेश वेगळा झाल्यानंतर राज्यातील नव्या राजधानीसाठी विशेष योजना लागू करण्यात येणार आहे. आंध्रातील प्रकल्प आणि केंद्रातील प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार कटिब्ध आहे. आंध्रप्रदेशाला अतिरिक्त निधी देण्यात येणार आहे. आंध्रप्रदेशातही इंडस्ट्रीय कॉरिडोअर निर्माण करण्यात येणार आहेत. तसेच आंध्रप्रदेशाला 15 हजार कोटी देणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

महिलांच्या विकासाठी 3 लाख कोटी

महिलांचा विकास म्हणजे देशाचा विकास आहे, असं सांगतानाच महिलांच्या विकासासाठी 3 लाख कोटीची तरतूद करण्यात येणार आहे.

बिहारला भरभरून

आजच्या अर्थसंकल्पात बिहारला भरभरून निधी देण्यात आला आहे. बिहारमधील रस्ते बांधणीसाठी 26 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच बिहारमध्ये मेडिकल कॉलेजही उभारण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

Follow Us
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन अहिर असं काय म्हणाले?
सचिन आला तर त्याची टीमही येणारच...त्या बड्या नेत्याने केला मोठा खुलासा
सचिन आला तर त्याची टीमही येणारच...त्या बड्या नेत्याने केला मोठा खुलासा; ऑपरेशन टायगर पुन्हा अॅक्टिव्ह!
धक्कादायक! नवजात मुलांच्या विक्रीचं रॅकेट, बड्या पक्षातील 2 नेत्यांना
धक्कादायक! नवजात मुलांच्या विक्रीचं रॅकेट, बड्या पक्षातील 2 नेत्यांना अटक
शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण...
शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण... अमोल कोल्हेंचं मोठं विधान; चर्चांना मिळाला पूर्णविराम!
मुंबईकरांनो सावधान! पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन अलर्ट
Rain Alert | मुंबईकरांनो सावधान! पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन अलर्ट मोडवर
ठाकरेंच्या सेनेत मोठ्या घडमोडी! 130 ज्येष्ठ शिवसैनीकांचं मोठं पाऊल;
ठाकरेंच्या सेनेत मोठ्या घडमोडी! 130 ज्येष्ठ शिवसैनीकांचं मोठं पाऊल; पक्षातील...
'मविआ'ला आणखी मोठा धक्का! निकटवर्तीय आमदाराने पुन्हा उडवली झोप.. राज्य
'मविआ'ला आणखी मोठा धक्का! निकटवर्तीय आमदाराने पुन्हा उडवली झोप.. राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप?
ऑपरेशन कमळ होणारच!; संजय राऊतांचा भाजपला थेट इशारा, राजकारण तापलं
Sanjay Raut | ऑपरेशन कमळ होणारच!; संजय राऊतांचा भाजपला थेट इशारा, राजकारण तापलं
थलपती विजय यांचं सरकार पाडण्याचा कट? 15 आमदारांना कोट्यवधींचं आमिष!
Vijay Thalapathy | थलपती विजय यांचं सरकार पाडण्याचा कट? 15 आमदारांना कोट्यवधींचं आमिष!
मुंबई हळहळली! महिला ट्रेनखाली चिरडली गेली अगदी... धो धो पावसादरम्यान
मुंबई हळहळली! महिला ट्रेनखाली चिरडली गेली अगदी... धो धो पावसादरम्यान धक्कादायक घटना