AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Saving Account : खातेदाराच्या मृत्यूनंतर या व्यक्तीला मिळतो बचतीचा पैसा, पण त्यासाठी ही कागदपत्रे हवीत जवळ..

Saving Account : खातेदाराच्या मृत्यूनंतर बँकेतील रक्कम कोणाला मिळते? त्यासाठी काय करावी लागते कसरत..

Saving Account : खातेदाराच्या मृत्यूनंतर या व्यक्तीला मिळतो बचतीचा पैसा, पण त्यासाठी ही कागदपत्रे हवीत जवळ..
रक्कम मिळणार कोणाला?Image Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Oct 22, 2022 | 5:05 PM
Share

नवी दिल्ली : आता जवळपास प्रत्येकाचं बँकेत खाते (Bank Account) असतेच असते. खातेदारच्या (Account Holder) मृत्यूनंतर (Death) त्याच्या खात्यातील रक्कम (Saving Amount) कोणाला मिळते? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. घरातील कर्त्या व्यक्तीकडे ही रक्कम देण्यात येईल असा जर तुमचा समज असेल तर सपशेल खोटा आहे. कारण ही रक्कम मिळते..

बँकेत खाते उघडताना तुमच्याकडून वारसदाराची (Nominee) माहिती असलेला अर्ज भरून घेण्यात येतो. या अर्जामध्ये वारसदाराचे नाव, वय आणि त्याचा तपशील आणि संबंधित कागदपत्रे (KYC) जमा केलेली असतात.

बँक खातेदाराच्या मृत्यूनंतर ही रक्कम त्याच्या वारसाला देण्यात येते. त्यासाठी वारसाकडून खातेदाराशी संबंधित कागदपत्रांचा पडताळा घेण्यात येतो. त्याची खात्री झाल्यावर ही रक्कम वारसाच्या सुपूर्द करण्यात येते.

बचत खाते उघडताना अर्जामध्ये वारसाचे नाव, त्याचे खातेदाराशी नाते, त्याचे वय, पत्ता आणि ओळखपत्र क्रमांक यांची माहिती समाविष्ट करण्यात येते. त्याआधारे खातेदाराचे वारस म्हणून त्या व्यक्तीचे नाव नोंदविण्यात येते.

बचत खातेदार कोणालाही त्याचा वारस नेमू शकतो. यामध्ये आई-वडिल, बहिण, भाऊ, पत्नी, मुलं यांचा समावेश आहे. तसेच त्याला वारसदार बदलविता ही येतो. वारसदार निवडीचा अधिकार खातेदाराचा असतो.

वारसाऐवजी दुसरा व्यक्ती बँकेकडे सदर रक्कमेची मागणी करु शकत नाही. त्रयस्थ व्यक्तीने मागणी जरी केली तरी बँक अशा व्यक्तीला ही रक्कम देत नाही. खातेदाराच्या मृत्यूनंतर सदर रक्कम एकतर बँकेतून काढता येते अथवा ती वारसदाराच्या खात्यात हस्तांतरीत करता येते.

खातेदाराच्या मृत्यूनंतर वारसदाराला त्याचे ओळखपत्र दाखवावे लागते. खातेदाराचे मृत्यू प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्रे दाखवावी लागतात. त्याआधारे बचत खात्यातील रक्कम वारसाच्या खात्यात वळती करण्यात येते.

जर खातेदाराने पती,पत्नी, आई-वडिल, भाऊ, बहिण यांना वारसदार नेमले नसेल. तर त्याच्या कुटुंबातील मोठ्या व्यक्तीला या रक्कमेवर हक्क सांगता येतो. पतीच्या मृत्यूनंतर पत्नीला वारस म्हणून दावा सांगता येतो. पण ही प्रक्रिया वेळ खाऊ आहे.

Follow Us
बारामती-राहुरी पोटनिवडणूक एक्झिट पोल; नेमकं कोण जिंकणार?
बारामती-राहुरी पोटनिवडणूक एक्झिट पोल; नेमकं कोण जिंकणार?.
पश्चिम बंगालमध्ये सत्तांतराची चाहूल; ममता बॅनर्जींचा गड धोक्यात.....
पश्चिम बंगालमध्ये सत्तांतराची चाहूल; ममता बॅनर्जींचा गड धोक्यात......
तामिळनाडूत सत्तांतर नाही?; पिपल्स इन्साईटच्या एक्झिट पोलनुसार DMK....
तामिळनाडूत सत्तांतर नाही?; पिपल्स इन्साईटच्या एक्झिट पोलनुसार DMK.....
केरळमध्ये काँग्रेसची सत्ता? बंगालमध्ये ममता दीदींना धक्का!
केरळमध्ये काँग्रेसची सत्ता? बंगालमध्ये ममता दीदींना धक्का!.
ममता बॅनर्जींना जबर धक्का? पश्चिम बंगालमध्ये यंदा भाजपाची सत्ता?
ममता बॅनर्जींना जबर धक्का? पश्चिम बंगालमध्ये यंदा भाजपाची सत्ता?.
पश्चिम बंगालमध्ये विक्रमी मतदान, आता नेमकी कोणाची सत्ता येणार?
पश्चिम बंगालमध्ये विक्रमी मतदान, आता नेमकी कोणाची सत्ता येणार?.
उद्धव ठाकरे उमेदवार नसल्याने मविआत नाराजी, भाजप या नाराजीचा घेणार फायद
उद्धव ठाकरे उमेदवार नसल्याने मविआत नाराजी, भाजप या नाराजीचा घेणार फायद.
विधानपरिषदेची उमेदवारी मिळताच दानवेंचं मोठं विधान, म्हणाले मी त्यावर..
विधानपरिषदेची उमेदवारी मिळताच दानवेंचं मोठं विधान, म्हणाले मी त्यावर...
मविआचं ठरलं! ठाकरे नाही तर उमेदवार कोण? आदित्य ठाकरेंनी सांगितला अंतिम
मविआचं ठरलं! ठाकरे नाही तर उमेदवार कोण? आदित्य ठाकरेंनी सांगितला अंतिम.
आता रिक्षा चालकांना तीन महिन्यांची मुदत, मराठी न आल्यास...
आता रिक्षा चालकांना तीन महिन्यांची मुदत, मराठी न आल्यास....