AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Saving Account : खातेदाराच्या मृत्यूनंतर या व्यक्तीला मिळतो बचतीचा पैसा, पण त्यासाठी ही कागदपत्रे हवीत जवळ..

Saving Account : खातेदाराच्या मृत्यूनंतर बँकेतील रक्कम कोणाला मिळते? त्यासाठी काय करावी लागते कसरत..

Saving Account : खातेदाराच्या मृत्यूनंतर या व्यक्तीला मिळतो बचतीचा पैसा, पण त्यासाठी ही कागदपत्रे हवीत जवळ..
रक्कम मिळणार कोणाला?Image Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Oct 22, 2022 | 5:05 PM
Share

नवी दिल्ली : आता जवळपास प्रत्येकाचं बँकेत खाते (Bank Account) असतेच असते. खातेदारच्या (Account Holder) मृत्यूनंतर (Death) त्याच्या खात्यातील रक्कम (Saving Amount) कोणाला मिळते? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. घरातील कर्त्या व्यक्तीकडे ही रक्कम देण्यात येईल असा जर तुमचा समज असेल तर सपशेल खोटा आहे. कारण ही रक्कम मिळते..

बँकेत खाते उघडताना तुमच्याकडून वारसदाराची (Nominee) माहिती असलेला अर्ज भरून घेण्यात येतो. या अर्जामध्ये वारसदाराचे नाव, वय आणि त्याचा तपशील आणि संबंधित कागदपत्रे (KYC) जमा केलेली असतात.

बँक खातेदाराच्या मृत्यूनंतर ही रक्कम त्याच्या वारसाला देण्यात येते. त्यासाठी वारसाकडून खातेदाराशी संबंधित कागदपत्रांचा पडताळा घेण्यात येतो. त्याची खात्री झाल्यावर ही रक्कम वारसाच्या सुपूर्द करण्यात येते.

बचत खाते उघडताना अर्जामध्ये वारसाचे नाव, त्याचे खातेदाराशी नाते, त्याचे वय, पत्ता आणि ओळखपत्र क्रमांक यांची माहिती समाविष्ट करण्यात येते. त्याआधारे खातेदाराचे वारस म्हणून त्या व्यक्तीचे नाव नोंदविण्यात येते.

बचत खातेदार कोणालाही त्याचा वारस नेमू शकतो. यामध्ये आई-वडिल, बहिण, भाऊ, पत्नी, मुलं यांचा समावेश आहे. तसेच त्याला वारसदार बदलविता ही येतो. वारसदार निवडीचा अधिकार खातेदाराचा असतो.

वारसाऐवजी दुसरा व्यक्ती बँकेकडे सदर रक्कमेची मागणी करु शकत नाही. त्रयस्थ व्यक्तीने मागणी जरी केली तरी बँक अशा व्यक्तीला ही रक्कम देत नाही. खातेदाराच्या मृत्यूनंतर सदर रक्कम एकतर बँकेतून काढता येते अथवा ती वारसदाराच्या खात्यात हस्तांतरीत करता येते.

खातेदाराच्या मृत्यूनंतर वारसदाराला त्याचे ओळखपत्र दाखवावे लागते. खातेदाराचे मृत्यू प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्रे दाखवावी लागतात. त्याआधारे बचत खात्यातील रक्कम वारसाच्या खात्यात वळती करण्यात येते.

जर खातेदाराने पती,पत्नी, आई-वडिल, भाऊ, बहिण यांना वारसदार नेमले नसेल. तर त्याच्या कुटुंबातील मोठ्या व्यक्तीला या रक्कमेवर हक्क सांगता येतो. पतीच्या मृत्यूनंतर पत्नीला वारस म्हणून दावा सांगता येतो. पण ही प्रक्रिया वेळ खाऊ आहे.

Follow Us
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका.
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी.
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची...
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची....
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार.
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर.
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.