AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dosa King : केवळ 18 रुपयांच्या पगारावर हॉटेलमध्ये घासली भांडी,  आज कोट्यवधींचे मालक, डोसा किंगची प्रेरणादायी कहाणी

Dosa King : 'वाळूचे कण रगडता तेलही गळे!' ही म्हण आपण रोज वापरतो. पण खरंच प्रयत्न केले तर तुमचेही आयुष्य बदलू शकते. कधीकाळी केवळ 18 रुपये पगारावर भांडी घासणाऱ्या माणसाने आज स्वतःचे साम्राज्य उभारल्याचे वाचून तुम्हालाही प्रेरणा मिळले.

Dosa King : केवळ 18 रुपयांच्या पगारावर हॉटेलमध्ये घासली भांडी,  आज कोट्यवधींचे मालक, डोसा किंगची प्रेरणादायी कहाणी
| Updated on: Mar 03, 2023 | 9:01 PM
Share

नवी दिल्ली : प्रयत्नांती परमेश्वर! प्रयत्न करणाऱ्यांची आणि परिस्थितीशी दोन हात करणाऱ्यांना यश मिळतेच. पण त्यासाठी मेहनत आणि सहनशीलता आवश्यक आहे. ‘वाळूचे कण रगडता तेलही गळे!’ ही म्हण आपण रोज वापरतो. पण खरंच प्रयत्न केले तर तुमचेही आयुष्य बदलू शकते. कधीकाळी केवळ 18 रुपये पगारावर भांडी घासणाऱ्या माणसाने आज स्वतःचे साम्राज्य उभारल्याचे वाचून तुम्हालाही प्रेरणा मिळले. जयराम बानन (Jayaram Banan) यांचा गरिबीतून श्रीमंतीकडचा हा प्रवास खडतर असला तरी प्रेरणादायी आहे. ते सागर रत्ना (Sagar Ratna) रेस्टॉरंटचे मालक आहे. आज भारतात त्यांचे 50 हून अधिक हॉटेल्स आहेत. अनेक उद्योजकांच्या अशाच प्रेरणादायी कथा आहेत.

साऊथ इंडियन फूडसाठी त्यांचे हॉटेल नावाजलेले आहे. जयराम बानन यांनी कधीकाळी हॉटेलमध्ये पडेल ते काम केले आहे. त्यांनी भांडीपण घासली आहेत. त्यात त्यांना कसलाच कमीपणा वाटला नाही. हे काम करत असतानाच त्यांनी स्वतःचे हॉटेल सुरु करण्याचा मनाशी करार केला आणि त्यासाठी आवश्यक ती मेहनत आणि सहनशीलता अंगी बानली. आज त्यांना नॉर्थचा डोसा किंग असे म्हणतात.

कर्नाटक राज्यातील मंगळुर जवळील उड्डपीमध्ये बानन यांचा जन्म झाला. मीडिया रिपोर्टसनुसार, त्यांचे वडील ड्रायव्हर होते. रागीट असल्याने जयराम यांना वडिलांची भीती वाटत होती. परीक्षा नापास झाल्यावर वडील त्यांना फटकारत. या भीतीमुळे त्यांनी 13 व्या वर्षी घर सोडले. त्यापूर्वी वडिलांच्या खिशातून काही पैसे घेतले. मंगळुरातून त्यांनी थेट मुंबई गाठली. ही गोष्ट 1967 सालामधली होती.

मुंबईत त्यांच्या अडचणी उलट वाढल्या. वय एकतर लहान, त्यांच्याकडे उदरनिर्वाहाचे कोणतेही साधन नव्हते. राहण्यासाठी जागा नव्हती. पण त्यांना एका हॉटेलमध्ये वेटरचे काम मिळाले. टेबल साफ करणे, स्वच्छता ठेवणे, भांडी घासणे, असे कामे त्यांनी केली. या हॉटेलमध्ये त्यांनी जवळपास 6 वर्षे काम केले. वेटरपासून ते मॅनेजरपर्यंत पोहचले. परंतु, त्यांच्या डोक्यात स्वतःचे हॉटेल असावे, असे स्वप्न होते. हे स्वप्न त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते.

त्याचवेळी मुंबईत साऊथ इंडियन हॉटेल्स सुरु होत असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर ते दिल्लीला गेले. तिथे त्यांचा एक भाऊ उड्डपी हॉटेलमध्ये होता. काही दिवस शाकाहारी हॉटेलमध्ये काम केल्यानंतर 1974 मध्ये त्यांनी सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्‍सची कॅन्टीन चालवली. त्यानंतर 1986 साली त्यांचे स्वतःचे सागर हॉटेल सुरु केले. या हॉटेलच्या जागेचे आठवड्याचे भाडे 3,250 रुपये होते. पहिल्याच दिवशी त्यांना 408 रुपयांची कमाई झाली.

काही दिवसातच त्यांनी या व्यवसायात जम बसवला. त्यांच्या हॉटेलची लोकप्रियता वाढली. दिल्लीत दक्षिण खाद्यपदार्थांच्या या हॉटेलने लवकरच नाव काढले. त्यानंतर बानन यांनी मागे वळून पाहिले नाही. आज सागर या रेस्टॉरंटच्या शाखा भारतातच नाही तर कॅनाडा, सिंगापूर, बँकॉक आणि इतर ठिकाणी आहे.

Follow Us
2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?
मोठी बातमी! 2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी? कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा युक्तिवाद
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर, चार मुद्यामध्येच... कोर्टात नेमकं काय घडलं?
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! खासगी अकॅडमी चालकाला अटक
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! सोलापुरातून खासगी अकॅडमी चालकाला अटक
रेवती सुळेंच्या रिसेप्शन सोहळ्यातील सर्वात खास व्हिडीओ!
रेवती सुळेंच्या रिसेप्शन सोहळ्यातील सर्वात खास व्हिडीओ! पंतप्रधान आणि रोहित पवारांच्या संवादादरम्यानच...
जरांगेंनी विशिष्ट समाजाच्या भावना दुखावू नये! अभ्यासपूर्ण बोला
Sachin Kharat | विशिष्ट समाजाच्या भावना दुखावू नका! अभ्यासपूर्ण बोला; सचिन खरातांचा जरांगेंना थेट इशारा
उबाठाचा मोठा डाव! शिवसेना पक्षाच्या 2018च्या घटनेनुसार...
उबाठाचा मोठा डाव! शिवसेना पक्षाच्या 2018च्या घटनेनुसार... ठाकरेंचे वकील थेट निवडणुक आयोगालाच घेरणार?
वसई-विरारमध्ये पावसाचा धुमाकूळ! विवा कॉलेज परिसर जलमय, रस्त्यांना...
Vasai-Virar | वसई-विरारमध्ये पावसाचा धुमाकूळ! विवा कॉलेज परिसर जलमय, रस्त्यांना नदीचं स्वरूप
स्वातंत्र्यादिनी लाल किल्ल्यावर घडणार इतिहास! पहिल्यांदाच...
स्वातंत्र्यादिनी लाल किल्ल्यावर घडणार इतिहास! पहिल्यांदाच... एकनाथ शिंदेंनी काय सांगितलं?
राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण?
राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण? अनिल पाटलांनी स्पष्टच सांगितलं!
हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! पवार संतापले
Rohit Pawar Tweet | हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या मृत्यूवर रोहित पवार संतापले