AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयात शुल्क कपातीचा परिणाम, खाद्य तेल झाले स्वस्त; सर्वसामान्यांना दिलासा

गेल्या काही महिन्यांमध्ये खाद्य तेलाचे दर गगनाला भिडले होते. तेलाचे दर वाढल्याने याचा मोठा आर्थिक फटका हा सर्वसामान्यांना सहन कारावा लागत होता. तेलाचे दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्राकडून तेलावरील आयात शुल्कात कपात करण्यात आली होती. आता त्याचा सकारात्मक परिणाम होताना दिसून येत आहे.

आयात शुल्क कपातीचा परिणाम, खाद्य तेल झाले स्वस्त; सर्वसामान्यांना दिलासा
संग्रहित छायाचित्र
| Edited By: | Updated on: Dec 26, 2021 | 1:54 PM
Share

नवी दिल्ली: गेल्या काही महिन्यांमध्ये खाद्य तेलाचे दर गगनाला भिडले होते. तेलाचे दर वाढल्याने याचा मोठा आर्थिक फटका हा सर्वसामान्यांना सहन कारावा लागत होता. तेलाचे दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्राकडून तेलावरील आयात शुल्कात कपात करण्यात आली होती. आता त्याचा सकारात्मक परिणाम होताना दिसून येत आहे. देशातील काही प्रमुख बाजारपेठांमध्ये तेलाचे दर कमी होताना दिसत आहेत. सोयाबीन तेलासह, सुर्यफूल तेल, मोहरीचे तेल आणि पाम तेल देखील काही प्रमाणात स्वस्त झाले आहे. पुढील काही दिवसांमध्ये तेलाच्या किमती आणखी कमी होऊ  शकतात असा अंदाज अर्थ तज्ज्ञांकडून वर्तवला जात आहे.

सोयाबीन स्वस्त झाले

सोयाबीनच्या किमती स्वस्त झाल्या आहेत. सोयाबीनचा मागणीपेक्षा पुरवठा वाढल्याने सोयाबीनचे भाव पडले आहेत. त्यामुळे तेल निर्मिती कंपन्यांना सध्या सोयाबिन स्वस्तात उपलब्ध होत आहे. तसेच दुसरीकडे केंद्राकडून देखील तेलावर आकारण्यात येणारे आयात शुक्ल कमी केल्याने तेलाच्या किमती या काहीप्रमाणात कमी झाल्याचे दिसून येत आहे. तेलाच्या किमती कमी झाल्याने सर्वासामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मोहरीच्या दरात देखील घट

सोयाबीनपाठोपाठ मोहरीच्या दरात देखील मोठ्याप्रमाणात घट झाली आहे. मोहरीचे दर प्रति क्विटंल मागे तब्बल 600 रुपयांनी घसरले आहेत.  गेल्या आठवड्यात मोहरीला प्रति क्विटंल 8500-8525  रुपयांचा भाव मिळत होता. मात्र चालू आठवड्यात त्यामध्ये घसर होऊन मोहरीचे दर प्रति क्विटंल 7975-8025  च्या दरम्यान आले आहेत. मोहरी स्वस्त झाल्याने मोहरीच्या तेलाचे दर देखील घसरले आहेत. गेल्या आठवड्यात मोहरीच्या तेलाचा भाव  2390 रुपये प्रति पाच लिटर होता. तर चालू आठवड्यामध्ये  तेलाच्या दरामध्ये 75 रुपयांची घट होऊन तेलाचे दर 2315 रुपयांवर पोहोचले आहेत.

संबंधित बातम्या 

‘या’ कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल; 1 लाखाचे झाले 11 लाख, टाटा केमिकललाही टाकले मागे

लहान मुलांसाठी आधार कार्ड का आहे महत्त्वाचे?, कितव्या वर्षी होते अपडेट जाणून घ्या

PF Withdrawal: पीएफ कधी काढता येतो?; जाणून घ्या पीएफबाबतच्या महत्त्वाच्या अटी

Follow Us
भाजपाकडून राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, महाराष्ट्रातून कोणाला संधी,
भाजपाकडून राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, महाराष्ट्रातून कोणाला संधी, वाचा नेमकं काय बदललं?
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांनी घेतली वित्तमंत्र्यांची भेट, बैठकीत...
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांनी घेतली वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांची भेट; बैठकीत बड्या प्रकल्पांवर चर्चा
तरुणांसाठी शासनाची खास योजना! 1 कोटीच्या गुंतवणुकीवर 50 लाखांची...
तरुणांसाठी शासनाची खास योजना! उद्योगातील 1 कोटीच्या गुंतवणुकीवर 50 लाखांची सबसिडी, तब्बल...
मानेवाडीच्या मैदानावर रंगली भन्नाट बैलगाडा शर्यत; गावातीला आणवणींना...
मानेवाडीच्या मैदानावर रंगली भन्नाट बैलगाडा शर्यत; गावातील आठणवणींना उजाळा देणारा जबरदस्त व्हिडीओ
नुसती धावपळ...धुराचा कल्लोळ...आयकर विभागाच्या कार्यालयाला भीषण आग!
नुसती धावपळ... धुराचा लोट...आयकर विभागाच्या कार्यालयाला आग! अग्निशमनच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल
उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात मोठा गोंधळ! त्या अफवेने भाविकांमध्ये
उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात मोठा गोंधळ! त्या अफवेने भाविकांमध्ये धवपळ, 13 हुन अधिक...
गोल्डन नेस्टजवळ मेट्रोचा स्लॅब कोसळल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
गोल्डन नेस्टजवळ मेट्रोचा स्लॅब कोसळल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; मोठी दुर्घटना टळली
मनोज जरांगे पाटील यांची २९ ऑगस्टपासून पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा
मनोज जरांगे पाटील यांची २९ ऑगस्टपासून पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा
तर तुमच्या मागे रेडा लावणार', गिरीश महाजनांबाबत राऊतांचं विधान...
तर तुमच्या मागे रेडा लावणार', गिरीश महाजनांबाबत राऊतांचं अगदी जिव्हारी लागणारं वक्तव्य
राज्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली पंतप्रधानांची भेट
मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली पंतप्रधानांची भेट: राज्याच्या विकासासाठी मागितले सहकार्य