AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याची पहाट;केंद्र सरकारची मोठी आनंदवार्ता, 6 महत्त्वाचे फैसले एका क्लिकवर जाणून घ्या

Big Decision for Women: कामगार संहिता 2025 देशभरात लागू झाले आहे. कायद्यातील या नवीन सुधारणेमुळे महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याची पहाट उगवली आहे. या सहा मोठ्या निर्णयांमुळे त्यांना आता स्वतःच्या पायावर उभं राहता येईल. काय आहेत ते सहा महत्त्वाचे निर्णय?

महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याची पहाट;केंद्र सरकारची मोठी आनंदवार्ता, 6 महत्त्वाचे फैसले एका क्लिकवर जाणून घ्या
महिलांना आर्थिक बळ मिळणार
| Updated on: Nov 23, 2025 | 8:54 AM
Share

विविध संस्था,बँका,आस्थापना, कारखाना, कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या महिलांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. केंद्र सरकारने नुकतेच कामगार संहिता 2025(labour code) लागू केली. त्यातंर्गत महिलांना नोकरी, सुरक्षा आणि अधिकार मिळणार आहे. त्यासाठी मोठ्या सुधारणा लागू करण्यात आल्या आहेत. या बदलांमुळे कार्यस्थळावर महिलांना अधिक सुरक्षा, विश्वासू वातावरण आणि पारदर्शकता जाणवेल. काय आहेत हे महत्त्वाचे बदल, जाणून घेऊयात.

1. कार्यस्थळी सुरक्षेवर अधिक भर

500 अथवा अधिक कर्मचारी असलेल्या कंपन्यांमध्ये आता सुरक्षा समिती गठीत करण्यात येईल. यामध्ये महिला प्रतिनिधी असतील. रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे बदल करण्यात येतील. त्यांना सुरक्षित परिवहन, महिला सुरक्षा रक्षक, CCTV आणि या सर्वांचे व्यवस्थापन करणारी व्यवस्था या ठिकाणी तैनात असेल.

2. रात्र पाळीस मंजुरी

पहिल्यांदा देसात महिलांना सकाळी 6 वाजेपूर्वी आणि संध्याकाळी 7 वाजेनंतर कार्यालयात, कंपनी, कारखान्यात काम करता येईल. यामध्ये IT, आरोग्य सेवा, हॉस्पिटॅलिटी, विमान सेवा, ई-कॉमर्स, BPO सारख्या उद्योगात महिलांचा टक्का वाढेल. कंपन्या त्यांना सुरक्षित प्रवास, कंपनीत सुरक्षीत वातावरण पुरवतील. त्याची हमी घेतील.

3. समान वेतन आणि समान काम

नवीन कामगार कायदा संहितेत समान वेतन आणि समान काम यावर जोर देण्यात आला आहे. आता स्त्री आणि पुरुष असा भेदभाव करता येणार नाही. समान काम आणि समान वेतन ही संकल्पना कोणत्याही भेदभावाशिवाय राबवावी लागेल. तर पहिल्यांदाच ट्रान्सजेंडरसाठी सुरक्षा देण्याची तजवीज करण्यात आली आहे.

4. कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही ग्रॅज्युएटी

यापूर्वी फिक्स्ड टर्म वा कंत्राटी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटीचा लाभ मिळत नव्हता. ग्रॅज्युएटीसाठी सलग 5 वर्षांची नोकरी आवश्यक होती. आता केवळ एक वर्ष नोकरी करणाऱ्यांना पण ग्रॅज्युएटीचा लाभ देण्यात येणार आहे. यामुळे IT, BPO, हॉस्पिटॅलिटी आणि रिटेल सेक्टरमधील लाखो महिला कर्मचाऱ्यांना लाभ मिळेल.

5. सुरक्षा समितीत महिला कर्मचारी

आता रात्र पाळी अथवा कंपन्यांमधील लैंगिक अथवा इतर हिसेंविरोधात महिलांना दाद मागता येईल. जर सहकर्मचारी अथवा वरिष्ठ हेतुपुरस्पर त्रास देत असतील. त्यांचा छळ करत असतील तर त्याविषयीची तक्रार त्यांना सुरक्षा समितीकडे करता येईल. या समितीत आता महिला प्रतिनिधी पण असतील.

6. वर्षातून एकदा आरोग्य तपासणी

सर्व कर्मचाऱ्यांची वर्षभरात एकदा मोफत आरोग्य तपासणी करणे आवश्यक आहे. खासकरून महिलांसाठी ही आरोग्य तपासणी महत्त्वाची असते. कारण नोकरी आणि कुटुंब कबिला सांभाळताना त्या अनेकदा आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे त्यांना आता मोफत आरोग्य तपासणीचा लाभ होईल.

निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.